शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

ट्रकची ट्रॅव्हल्सला धडक, १३ जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:07 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क नांद : डाेळ्याच्या शस्त्रक्रियेसाठी रुग्णांना घेऊन जात असलेल्या ट्रॅव्हल्सला विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव ट्रकने जाेरात धडक ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

नांद : डाेळ्याच्या शस्त्रक्रियेसाठी रुग्णांना घेऊन जात असलेल्या ट्रॅव्हल्सला विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव ट्रकने जाेरात धडक दिली. त्यात ट्रॅव्हल्समधील ३२ रुग्णांपैकी १२ जण जखमी झाले. ही घटना भिवापूर पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील नांद-हिंगणघाट मार्गावरील नांद (ता. भिवापूर) नजीकच्या पांजरेपार शिवारातील वळणावर शुक्रवारी (दि. ५) दुपारी २.३० वाजताच्या सुमारास घडली. हे सर्व रुग्ण आरमाेरी (जिल्हा गडचिराेली) तालुक्यातील रहिवासी असून, ६० ते ८२ वर्षे वयाेगटातील आहेत.

जखमींमध्ये लक्ष्मण कावळे, गोपिका खेडकर, अण्णाजी ठाकरे, शारदा ठाकरे, सुनीता ठाकरे, सुनंदा कन्नाके, पुरुषोत्तम गजपुरे, यशवंता इंदूरकर, मीरा जनबंधू, जनाबाई तोरे, शकुंतला नेरकर यांच्यासह अन्य दाेघांचा समावेश आहे. या सर्वांसह एकूण ३२ रुग्णांवर डाेळ्याची शस्त्रक्रिया करावयाची असल्याने, त्यांना घेऊन एमएच-३२/क्यू-३७१० क्रमांकाची ट्रॅव्हल्स आरमाेरीहून भिवापूरमार्गे सावंगी (मेघे) (जिल्हा वर्धा) येथील आचार्य विनाेबा भावे हाॅस्पिटलमध्ये जात हाेती. दरम्यान, पांजरेपार शिवारातील वळणावर विरुद्ध दिशेने वेगात येणाऱ्या एमएच-३१/क्यू-६७४६ क्रमांकाच्या ट्रकने त्या ट्रॅव्हल्सला जाेरात धडक दिली. हा ट्रक मिरची आणण्यासाठी भिवापूरला जात हाेता.

या ट्रॅव्हल्समधील १३ जण जखमी झाले. माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठून जखमींना तातडीने नांद येथील प्राथमिक आराेग्य केंद्रात आणले. प्रथमाेपचार केल्यानंतर त्या सर्वांना आचार्य विनाेबा भावे हाॅस्पिटलच्या वाहनाने सावंगी (मेघे) येथे नेण्यात आले. याप्रकरणी भिवापूर पाेलिसांनी गुन्हा नाेंदवून ट्रकचालक सागर उमाशंकर तिवारी (३२, रा. वर्धा) यास ताब्यात घेतले, अशी माहिती ठाणेदार महेश भाेरटेकर यांनी दिली. या घटनेचा तपास पाेलीस उपनिरीक्षक प्रकाश आलम, उमेश झिंगरे, नागेश वाघाडे करीत आहेत.

....

धाेकादायक वळण

नांद-हिंगणघट मार्गावरील पांजरेपार शिवारातील वळण धाेकादायक बनले आहे. याच वळणावर २२ जानेवारी २०२१ राेजी दाेन माेटरसायकलींच्या धडकेत एकाचा मृत्यू तर तिघे गंभीर जखमी झाले हाेते. या वळणावर राेडच्या दाेन्ही बाजूला माेठ्या प्रमाणात झुडपे वाढली आहेत. त्यामुळे समाेरून येणारी वाहने सहसा दिसत नाही. ही झुडपे ताेडण्याची तसदीही सार्वजनिक बांधकाम विभाग घेत नाही.

...

रुग्णवाहिकेचा अभाव

नांद प्राथमिक आराेग्य केंद्र नागपूर जिल्ह्याच्या सीमावर्ती व दुर्गम भागात आहे. या आराेग्य केंद्रात राष्ट्रीय ग्रामीण आराेग्य अभियानांतर्गत (एनआरएचएम) रुग्णवाहिका देण्यात आली हाेती. ती रुग्णवाहिका दाेन महिन्यापासून आराेग्य केंद्राच्या सेवेत नाही. ती नेमकी कुठे नेण्यात आली, हे कळायला मार्ग नाही. या आराेग्य केंद्राला माता-बाल संगाेपन केंद्राची साधी रुग्णवाहिका असून, ती गंभीर रुग्ण व जखमींच्या कामी येत नाही.