शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
5
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
6
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
7
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
8
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
9
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
10
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
11
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
12
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
13
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
14
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
15
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
16
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
17
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
19
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?

आचार्य विद्यासागर महाराजांना सरसंघचालक, सरकार्यवाहांची श्रद्धांजली

By योगेश पांडे | Updated: February 18, 2024 16:36 IST

महान तीर्थंकरांच्या उत्कृष्ट परंपरांना आपल्या जीवनात मूर्त रूप देणारे जैन धर्माचे महान आचार्य पूज्य श्री विद्यासागरजी महाराज यांनी समाधी घेतली.

नागपूर : जैन धर्माचे आचार्य श्री विद्यासागरजी महाराज यांच्या समाधीनंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत व सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. आपण सर्वांनी अधिक दृढनिश्चयाने आणि समर्पणाने त्यांच्या मार्गावर चालत राहावे आणि त्या आदर्शांना जलद गती द्यावी, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

महान तीर्थंकरांच्या उत्कृष्ट परंपरांना आपल्या जीवनात मूर्त रूप देणारे जैन धर्माचे महान आचार्य पूज्य श्री विद्यासागरजी महाराज यांनी समाधी घेतली. त्यांनी १९६८ मध्ये दीक्षा ग्रहण केल्यापासून सातत्याने सत्य, अहिंसा, अपरिग्रह, आचार्य, ब्रह्मचर्य यांचे अविरत आचरण करून या पंचमहाव्रतांच्या देशव्यापी प्रचारासाठी स्वतःला समर्पित केले. लोककल्याणाच्या भावनेने प्रेरित होऊन, पूज्य आचार्यांनी आपल्या जीवनात शेकडो मुनी व आर्यिकांना दीक्षा दिली तसेच परोपकारी कार्यांसाठी नेहमीच प्रेरणा आणि आशीर्वाद दिले. त्यांनी भारतभर अनेक ठिकाणी गोशाळा, शैक्षणिक संस्था, हातमाग केंद्रे आणि विविध प्रकारच्या लोककल्याणकारी योजना सुरू केल्या.

तुरुंगात राहणाऱ्या हजारो लोकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणण्याचे अभूतपूर्व कार्य केवळ त्यांच्या आशीर्वादाने सुरू आहे. हा देश आपल्या उदात्त शिकवण तसेच जीवन आदर्श घेऊन पुन्हा उभा राहावा आणि सध्याच्या काळात जगाला नवी दिशा द्यावी, अशी त्यांची इच्छा होती. त्यांचे संपूर्ण जीवन या आदर्शांसाठी पूर्णपणे समर्पित होते. शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी आपले कठोर ध्यान चालू ठेवले. आज लाखो लोक त्या आदर्शांचे पालन करत आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने आम्ही त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो, असे प्रतिपादन सरसंघचालकांनी केले.

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवत