शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

आदिवासी शाळांचे वेळापत्रक तापले; हायकोर्टाची राज्य सरकारला नोटीस

By राकेश पांडुरंग घानोडे | Updated: July 12, 2023 18:39 IST

Nagpur News अनुदानित रहिवासी आदिवासी आश्रम शाळांना लागू करण्यात आलेल्या नवीन वेळापत्रकाचा वाद दिवसेंदिवस तापत आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने तीन आठवड्यात उत्तर सादर करण्याचा आदेश दिला आहे.

राकेश घानोडेनागपूर : अनुदानित रहिवासी आदिवासी आश्रम शाळांना लागू करण्यात आलेल्या नवीन वेळापत्रकाचा वाद दिवसेंदिवस तापत आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी या प्रकरणात आदिवासी विकास विभागाचे प्रधान सचिव, नाशिक, ठाणे, अमरावती व नागपूरचे आदिवासी विकास आयुक्त आणि सर्व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकाऱ्यांना नोटीस बजावून यावर तीन आठवड्यात उत्तर सादर करण्याचा आदेश दिला.

नवीन वेळापत्रकाविरुद्ध विभागीय अनुदानित आदिवासी आश्रम शाळा कर्मचारी संस्कृती संघटनेने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याचिकेवर न्यायमूर्तिद्वय अतुल चांदूरकर व वृषाली जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. क्वालिटी एज्युकेशन सपोर्ट ट्रस्ट या अशासकीय संस्थेद्वारे करण्यात आलेल्या शिफारशीवरून सकाळी ८.४५ ते दुपारी ४ वाजेपर्यंतचे वेळापत्रक निर्धारित करण्यात आले आहे. हे वेळापत्रक १० जुलैपासून लागू झाले आहे.

हे वादग्रस्त वेळापत्रक निर्धारित करताना विद्यार्थी, पालक व कर्मचाऱ्यांच्या गैरसोयीचा व आरोग्याचा, तसेच आश्रम शाळा भागातील नैसर्गिक अडथळे व पायाभूत सुविधांच्या अभावाचा विचार करण्यात आला नाही, असा याचिकाकर्त्यांचा आरोप आहे. यापूर्वी डॉ. सुभाष साळुंके समितीने सर्व पैलूंचा विचार करून सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंतचे वेळापत्रक तयार केले होते. हे वेळापत्रक १२ जानेवारी २०१७ पासून लागू होते. हे वेळापत्रक सर्वांच्या सोयीचे होते, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. याचिकाकर्त्यांतर्फे ॲड. भूषण डफळे यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालय