शहरं
Join us  
Trending Stories
1
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
2
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
3
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
4
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
5
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
6
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
7
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
8
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
9
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
10
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
11
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
12
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
13
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
14
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
15
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
16
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला
17
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास
18
फायद्याची गोष्ट! 'या' ३ गोष्टी फ्रिजमध्ये ठेवण्याची अजिबात करू नका चूक; कॅन्सरचा वाढेल धोका
19
सावधान! WhatsApp वर आला 'प्रोफाईल फोटो' स्‍कॅम; तुमच्या अकाऊंटमधून 'असे' जातील पैसे
20
शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्यांना त्याच भाषेत उत्तर, नारायण राणे यांचा इशारा

आदिवासी विभागात कोट्यवधींचा अपहार, चौकशी सुरु

By admin | Updated: January 9, 2015 00:46 IST

राज्य शासनाच्या आदिवासी विकास विभागाच्यावतीने आदिवासींच्या उत्थानासाठी विविध योजना राबविल्या जातात. मात्र, या योजनांमध्ये हजारो कोटींचा अपहार झाल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यपालांच्या

राज्यपालांचे आदेश : मंत्र्यांपासून अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांवर टांगती तलवारगणेश वासनिक - अमरावतीराज्य शासनाच्या आदिवासी विकास विभागाच्यावतीने आदिवासींच्या उत्थानासाठी विविध योजना राबविल्या जातात. मात्र, या योजनांमध्ये हजारो कोटींचा अपहार झाल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यपालांच्या आदेशानुसार चौकशी समितीला सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. वित्तीय अनियमतितेच्या प्रकरणात काही मंत्री, अधिकारी सामील असून त्यांची नावे ही चौकशी समिती येत्या एप्रिलमध्ये शासनाला सादर करणार आहे.आदिवासींचे हक्क त्यांना देण्याऐवजी आदिवासी विकासमंत्री आणि अधिकाऱ्यांनी संगनमत करुन अनेक योजनांमध्ये अपहार केला आहे. काही योजना कागदोपत्रीच राबवून हजारो कोटी रुपयांची वाट लावल्याचा आरोप करीत सामाजिक कार्यकर्ते बहिराम पोपटराव मोतीराम यांनी मुंबई उच्च न्यायालयात १५३/२०१२ अन्वये जनहित याचिका दाखल केली. या अनुषंगाने उच्च न्यायालयाने राज्य शासनाला चौकशीचे आदेश दिले आहेत. शासनाने १५ एप्रिल २०१४ रोजी उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती एम.जी. गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली ५ सदस्यीय चौकशी समितीचे गठन केले होते. या समितीला शासनासमक्ष चौकशी अहवाल १५ आॅक्टोबर २०१४ पर्यंत सादर करणे अनिवार्य होते. या अपहाराची साखळी मोठी असल्याने त्यांच्या चौकशीसााठी समितीला वेळ अपुरा पडत आहे. समितीने प्राथमिक चौकशी केली; मात्र अपहारात जे मोठे मासे अडकले आहेत, त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी ६ महिन्यांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे चौकशी समितीच्या मागणीनुसार राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या आदेशाने आदिवासी विकास विभागाने उच्च न्यायालयाच्या सेवानिवृत्त न्यायाधीशांंच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या चौकशी समितीला ६ महिन्यांची मुदतवाढ देण्याचा शासन निर्णय निर्गमित केला आहे. ही समिती चौकशी अहवाल १५ एप्रिल २०१५ पर्यंत सादर करेल, असे शासन आदेशात म्हटले आहे. आदिवासींचा विकास आणि कुपोषणमुक्तीसाठी राज्य शासन दरवर्षी आदिवासी विकास विभागाच्या अधिपत्त्याखाली सुमारे दोन हजार कोटींचे अनुदान वितरित करते. मात्र, दऱ्याखोऱ्यात राहणाऱ्या आदिवासींची परिस्थिती ‘जैसे थे’च आहे. आदिवासींच्या नावे सुरु असलेल्या योजनांची अंमलबजावणी करणारी यंत्रणा मात्र गब्बर झाल्याचे चित्र आहे. यात मंत्री, अधिकारी व कंत्राटदार आघाडीवर आहेत. गेल्या २० वर्षांत आदिवासींच्या नावे राबविण्यात आलेल्या विविध योजनांमध्ये झालेल्या अनुदान वाटपाची चौकशी ही समिती करीत आहे. यापूर्वी समितीने प्राथमिक चौकशीदरम्यान काही आदिवासी विकासमंत्री, अधिकारी व कंत्राटदारांची चौकशी केल्याची माहिती आहे. अपहाराची व्याप्ती मोठी असून काहींना जाळ्यात अडकविणे आवश्यक असल्यामुळे पुन्हा चौकशी सुरु झाली आहे. त्यामुळे आदिवासींच्या हक्काचा निधी कोणाच्या घशात गेला? हे चार महिन्यांनंतर स्पष्ट होणार आहे.या योजनांवर समितीची नजरआदिवासींच्या नावे राबविण्यात येणाऱ्या काही योजनांमध्ये अपहार झाल्याचा संशय चौकशी समितीला आहे. यात आश्रमशाळांमध्ये साहित्य खरेदी, आश्रमशाळांचे बांधकाम, अपंग विद्यार्थ्यांना साहित्य वाटप, हवाई सुंदरी प्रशिक्षण, परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती वाटप, सैनिकी शिक्षणात विद्यावेतन, अनुदानित आश्रमशाळांच्या तुकड्या, व्यवसाय प्रशिक्षण, रोजगार प्रशिक्षण, व्यवसाय अर्थसहाय्य, कन्यादान योजना, सबळीकरण व स्वाभिमान योजना, ठक्करबाप्पा आदिवासी वस्ती सुधारणा एकात्मिक कार्यक्रम, वीजपंप व तेलपंप वाटप, जनरेटर खरेदी, पीव्हीसी आणि एचडीपीई पाईप पुरवठा, घरकूल योजना, सिंचन प्रकल्प, शेततळे, वॉटर हार्वेस्टिंग, शेती अवजारे वाटप, बैलगाडी पुरवठा, जमीन वाटप, परसबाग निर्मिती, पशुसंवर्धन, दुग्ध विकास, मत्सव्यवसाय, क्रीडांगणाचा विकास, व्यायामशाळा, बालवाड्यांची निर्मिती आदी योजनांमधील अपहार बाहेर काढण्यासाठी समिती नजर ठेवून आहे.तत्कालीन दोन आदिवासी विकासमंत्री अडकण्याची चिन्हे?आदिवासी विकास विभागात मोठ्या स्वरुपात भ्रष्टाचार झाल्याच्या निष्कर्षापर्यंत चौकशी समिती पोहोचली आहे. काही योजना केवळ कागदोपत्रीच राबवून साहित्य खरेदीच्या निविदा मंत्रालय स्तरावरच पार पडल्याचे समितीच्या निदर्शनास आले आहे. केवळ अपहारासाठीच योजनांची मुहूर्तमेढ रोवल्याप्रकरणी तत्कालीन दोन आदिवासी विकासमंत्री अडकण्याची चिन्हे आहेत. तसेच आदिवासी विकास विभागाच्या आयुक्तांवरही टांगती तलवार आहे.