शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

सुनील केदारांविरुद्धचा खटला तीन महिन्यात निकाली काढा : हायकोर्टाचा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2019 20:48 IST

नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष व सावनेरचे आमदार सुनील केदार आणि अन्य आरोपींविरुद्ध (संजय अग्रवाल वगळता) प्रलंबित कोट्यवधी रुपयाच्या रोखे घोटाळ्याचा खटला येत्या तीन महिन्यात निकाली काढण्यात यावा, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी मुख्य न्याय दंडाधिकारी न्यायालयाला दिला. तसेच, खटल्यावरील कार्यवाहीचा आढावा घेण्यासाठी प्रकरणावर एक महिन्यानंतर पुढील सुनावणी निश्चित केली.

ठळक मुद्देजिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील रोखे घोटाळा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष व सावनेरचे आमदार सुनील केदार आणि अन्य आरोपींविरुद्ध (संजय अग्रवाल वगळता) प्रलंबित कोट्यवधी रुपयाच्या रोखे घोटाळ्याचा खटला येत्या तीन महिन्यात निकाली काढण्यात यावा, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी मुख्य न्याय दंडाधिकारी न्यायालयाला दिला. तसेच, खटल्यावरील कार्यवाहीचा आढावा घेण्यासाठी प्रकरणावर एक महिन्यानंतर पुढील सुनावणी निश्चित केली.न्यायमूर्तीद्वय प्रदीप देशमुख व रोहित देव यांच्यासमक्ष या प्रकरणावर सुनावणी झाली. इतर आरोपींमध्ये बँकेचे माजी महाव्यवस्थापक अशोक चौधरी (नागपूर), रोखे दलाल केतन सेठ, सुबोध भंडारी, कानन मेवावाला, नंदकिशोर त्रिवेदी (सर्व मुंबई), अमित वर्मा (अहमदाबाद), महेंद्र अग्रवाल, श्रीप्रकाश पोद्दार (कोलकाता) व बँक कर्मचारी सुरेश पेशकर यांचा समावेश आहे. यासंदर्भात ओमप्रकाश कामडी व इतरांनी अर्ज दाखल केला आहे. आरोपी रोखे दलाल संजय अग्रवाल (मुंबई) वगळता सुनील केदार व इतरांविरुद्धचा खटला तातडीने निकाली काढण्याचा आदेश उच्च न्यायालयाने २०१४ मध्ये दिला होता. परंतु, त्या आदेशाचे काटेकोर पालन झाले नाही, असे अर्जदारांनी न्यायालयाला सांगितले. त्यामुळे गेल्या तारखेला न्यायालयाने खटल्याचा रेकॉर्ड सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार, बुधवारी खटल्याचा रेकॉर्ड न्यायालयात सादर करण्यात आला. त्यासोबत मुख्य न्याय दंडाधिकारी यांनी हा खटला दोन महिन्यांत निकाली काढण्याचे हमीपत्र दाखल केले. त्यानंतर न्यायालयाने विविध बाबी लक्षात घेता, हा खटला तीन महिन्यात निकाली काढण्यास सांगितले.संजय अग्रवाल यांच्या एका प्रकरणात मुंबई मुख्यपीठाने १९ डिसेंबर २०१४ रोजी या खटल्यावर स्थगिती दिली होती. त्यामुळे खटला थांबवून ठेवण्यात आला होता. परंतु, नागपूर खंडपीठाच्या आदेशानंतर अग्रवाल वगळता इतर आरोपींविरुद्ध खटला चालविण्याचा मार्ग मोकळा झाला होता. असे असताना खटला तातडीने निकाली काढण्याचे प्रयत्न करण्यात आले नाही, असा अर्जदारांचा आरोप आहे. अर्जदारांतर्फे अ‍ॅड. श्रीरंग भांडारकर यांनी बाजू मांडली.दोषारोप व शिक्षेची तरतूद‘सीआयडी’ने २२ नोव्हेंबर २००२ रोजी प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. तेव्हापासून हा खटला प्रलंबित आहे.त्यात आरोपींवर भादंविच्या कलम ४०६(विश्वासघात),४०९ (शासकीय नोकर, बँक अधिकारी आदींद्वारे विश्वासघात), ४६८ (फसवणुकीसाठी बनावट दस्तावेज तयार करणे), ४७१(बनावट दस्तावेज खरे भासविणे), १२०-ब (कट रचणे), ३४(समान उद्देशाने एकत्र येणे), असे दोषारोप ठेवण्यात आले आहेत. भादंविच्या कलम ४०६ (विश्वासघात)मध्ये कमाल तीन वर्षे, कलम ४०९(शासकीय नोकर, बँक अधिकारी आदींद्वारे विश्वासघात)मध्ये किमान १० वर्षे व कमाल जन्मठेप, कलम ४६८ (फसवणुकीसाठी बनावट दस्तावेज तयार करणे)मध्ये कमाल सात वर्षे, कलम ४७१(बनावट दस्तावेज खरे भासविणे)मध्ये कमाल दोन वर्षे तर, कलम १२०-ब (कट रचणे)मध्ये किमान दोन वर्षे ते जन्मठेपेपर्यंतच्या शिक्षेची तरतूद आहे. सदर गुन्हे सिद्ध झाल्यास न्यायालयाद्वारे आरोपींना अशी शिक्षा केली जाऊ शकते.असे आहे प्रकरण२००१-२००२ मध्ये बँकेने होम ट्रेड लिमिटेड मुंबई, इंद्रमणी मर्चंट्स प्रा.लि. कोलकाता, सेंच्युरी डीलर्स प्रा.लि. कोलकाता, सिंडिकेट मॅनेजमेंट सर्व्हिसेस अहमदाबाद व गिल्टेज मॅनेजमेंट सर्व्हिसेस मुंबई या कंपन्यांच्या माध्यमातून १२५ कोटी रुपयांचे सरकारी रोखे खरेदी केले होते. त्यात घोटाळा झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणात २९ एप्रिल २००२ रोजी गणेशपेठ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली होती.

 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयSunil Kedarसुनील केदार