शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

त्रिनेत्र, ‘युटीसीएस’ करणार धुक्याचा बंदोबस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 22:54 IST

हिवाळ्यात दिल्ली मार्गावरील रेल्वेगाड्या आपल्या नियोजित वेळेपेक्षा उशिराने धावतात. यामुळे प्रवाशांची गैरसोय होऊन त्यांचे प्रवासाचे प्लॅनिंग बिघडते. त्यामुळे धुक्याचा बंदोबस्त करण्यासाठी त्रिनेत्र आणि ‘युटीसीएस’ (युरोपियन ट्रेन कंट्रोल सिस्टीम) यंत्रणेचा वापर नजीकच्या काळात करण्यात येणार आहे, असे प्रतिपादन रेल्वे बोर्डाचे सदस्य (स्टाफ) डी. के. गायेन यांनी केले.

ठळक मुद्देडी. के. गायेन यांची माहिती : रेल्वे कर्मचाऱ्यांमध्ये आरोग्याप्रति जागृतीसाठी शिबिरे

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : हिवाळ्यात दिल्ली मार्गावरील रेल्वेगाड्या आपल्या नियोजित वेळेपेक्षा उशिराने धावतात. यामुळे प्रवाशांची गैरसोय होऊन त्यांचे प्रवासाचे प्लॅनिंग बिघडते. त्यामुळे धुक्याचा बंदोबस्त करण्यासाठी त्रिनेत्र आणि ‘युटीसीएस’ (युरोपियन ट्रेन कंट्रोल सिस्टीम) यंत्रणेचा वापर नजीकच्या काळात करण्यात येणार आहे, असे प्रतिपादन रेल्वे बोर्डाचे सदस्य (स्टाफ) डी. के. गायेन यांनी केले.विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालयाच्या संवाद सभागृहात पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, हिवाळ्यात रेल्वेगाड्यांच्या लेटलतिफीसाठी रेल्वे बोर्ड त्रिनेत्र ही यंत्रणा अवलंबण्याचा विचार करीत आहे. यानुसार धुक्याच्या परिस्थितीत पुढे सिग्नल येणार आहे, याची माहिती लोकोपायलटला मिळेल. त्यानुसार तो सिग्नल येण्यापूर्वी आपला वेग कमी करेल. ‘युटीसीएस’ या यंत्रणेनुसार लोकोपायलटला इंजिनमध्येच थांबायचे की पुढे जायचे, किती वेगाने जायचे याची माहिती मिळेल. सध्या रेल्वेत १३ लाख कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांचे आरोग्य सांभाळणे रेल्वेची जबाबदारी आहे. त्यामुळे प्रत्येक विभागात वैद्यकीय शिबिरांचे आयोजन करून कर्मचाऱ्यांमध्ये आरोग्याप्रति जागृती निर्माण करण्यावर भर देण्यात येत आहे. सक्षम प्रकल्पानुसार रेल्वे कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करण्यात येणार आहे. ते जेथे काम करतात त्या ठिकाणी किंवा दुसऱ्या संस्थेत प्रशिक्षणाची व्यवस्था करण्यात येत आहे. याशिवाय स्कील इंडिया या प्रकल्पानुसार ३० हजार उमेदवारांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. रेल्वेत सफाई तसेच इतर बाबींचे कंत्राट खासगी कंत्राटदारांना देण्यात आलेले आहे. कंत्राटदार कामगारांची पिळवणूक करीत असतील तर त्यांच्यावर नजर ठेवण्यात येत आहे. कामगारांचे वेतन बँकेत जमा करुन त्या बाबतची माहिती पब्लिक डोमेनवर अपलोड करणे सक्तीचे करण्यात आले असून ईस्टर्न आणि साऊथ ईस्टर्न रेल्वेत त्याची चाचपणी सुरू असून ही यंत्रणा यशस्वी झाल्यास ती देशभरात लागू करण्यात येणार आहे. रेल्वेगाड्यात प्रवाशांसाठी विविध प्रकारच्या सुविधा वाढविण्यावर भर देण्यात येत असल्याचे गायेन यांनी सांगितले. यावेळी प्रधान मुख्य कार्मिक अधिकारी एन. स्वामीनाथन, मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे ‘डीआरएम’ बृजेश कुमार गुप्ता, अप्पर विभागीय रेल्वे व्यवस्थापक त्रिलोक कोठारी, दपूम रेल्वेचे ‘डीआरएम’ अमित कुमार अग्रवाल, जनसंपर्क अधिकारी प्रवीण पाटील, प्रसिद्धी निरीक्षक अनिल वालदे उपस्थित होते.

टॅग्स :Railway Passengerरेल्वे प्रवासीcentral railwayमध्य रेल्वे