शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
2
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
3
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
4
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
5
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
6
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
7
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
8
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
9
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
10
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
11
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
12
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
13
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
14
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
15
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
16
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
17
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
18
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
19
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
20
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...

महाकवी कालिदासाचे पदस्पर्श शोधणारे ‘ट्रेकिंग’

By admin | Updated: July 3, 2014 00:59 IST

महाकवी कालिदासाने त्याची अजरामर रचना ‘मेघदूतम’ रामटेक परिसरात रचली. निश्चितच कालिदास रामटेक परिसरात फिरला असणार. कालिदासाला अभिवादन करताना त्याच्या साहित्यकृतींचा

महाकवी कालिदासाला अनोखी आदरांजली : सीएसी आॅलराऊंडरचा पुढाकारनागपूर : महाकवी कालिदासाने त्याची अजरामर रचना ‘मेघदूतम’ रामटेक परिसरात रचली. निश्चितच कालिदास रामटेक परिसरात फिरला असणार. कालिदासाला अभिवादन करताना त्याच्या साहित्यकृतींचा अभ्यास आणि चर्चा केली जाते. त्याच्या भाषिक सौंदर्यावर संवाद होतो. पण निसर्गावर प्रेम करणाऱ्या साहसवीरांनी कालिदासाला अनोखी आदरांजली वाहिली. कालिदासाने मेघदूतममध्ये जे वर्णन केले आहे; त्यावेळी कशी स्थिती असेल, कालिदास कुठे गेला असेल, कसा फिरला असेल याची कल्पना करीत आषाढाचा पहिला दिवस कालिदासाची आठवण करीत त्याचा मार्ग धुंडाळत साहसवीरांनी ट्रेकिंगच्या माध्यमात घालविला. कालिदासावर प्रेम करणाऱ्या या साहसवीरांनी दोन दिवस रामटेक परिसरात कड्याकपाऱ्यावरुन ट्रेकिंग केली. यात बच्चेकंपनीसह युवा आणि मध्यमवयीन ट्रेकरही सहभागी झाले होते. रामटेकजवळील सिंधुरागिरी पर्वतावर असलेल्या त्रिविक्रम मंदिराच्या परिसरात कालिदासांनी मेघदूतची रचना केली. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ उभारण्यात आलेल्या स्मारकाच्या भिंतीवर ही रचना आहे. कालिदास आणि विदभार्ची नाळ या मेघदूतानेच जोडली. त्यातूनच काही वर्षांपूर्वी कालिदासांच्या स्मृतिप्रीत्यर्थ्य कालिदास महोत्सव सुरू करण्यात आला. आषाढाचा पहिला दिवस मात्र कालिदासाचे स्मरण करून देणारा आहे. कालिदासाला अभिवादन करताना सीएसी आॅलराऊंडर या साहसी संस्थेने थेट कालिदासाच्या पदचिन्हांचीच शोधमोहीम हाती घेतली. कालिदासाचे स्मरण एका दिवसापुरते मर्यादित न राहता कालिदासांच्या स्मृती कायम जिवंत राहाव्यात म्हणून त्यांनी वर्षभर विविध कार्यक्रमांची आखणी केली आहे. आमदार आशिष जयस्वाल यांनीही त्यासाठी पुढाकार घेतला आहे. या कार्यक्रमाची सुरुवात त्यांनी ट्रेकिंगने केली. सीएसीच्या साईटवरून ट्रेकिंगला सुरुवात झाली. त्रिविक्रम मंदिर, कालिदास स्मारक, गडमंदिर, कर्पूरबावडी, सिंधुरागिरी पर्वत अशा ज्या ज्या परिसरात कालिदासांनी वास्तव्य केले, तो संपूर्ण परिसर साहित्य, कला, संस्कृती व निसर्गाबद्दल प्रेम असणाऱ्या रसिकांनी ट्रेकिंग करीत पिंजून काढला. सिंधुरागिरी पर्वतावरून दिसणारा अंबाळा तलाव, खिंडसी आणि या परिसरातील निसर्गदर्शन त्यांनी घेतले. सिंधुरागिरी पर्वतावरून दुसऱ्या दिवशी ट्रेकिंगला सुरुवात झाली. ट्रेकिंगमध्ये सहभागी रसिकांनी हा संपूर्ण पर्वत पिंजून काढून खिंडसी बॅकवॉटरने सीएसी साईटवर परत आले. काहींनी कालिदास स्मारकांच्या भिंतीवरील मेघदूताचे वाचन केले. रसिकांच्या ट्रेकिंगच्या उत्साहाला वातावरणानेसुद्धा साथ दिली.(प्रतिनिधी)