शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

वाघ वाचविण्यासाठी देशभ्रमण; ‘जर्नी फॉर टायगर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 13:22 IST

: वाघांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. त्यामुळे वाघ वाचविण्याचा संदेश देण्यासाठी सॉल्टलेक कोलकाता येथील दास दाम्पत्य दुचाकीवर भारतभ्रमण करीत आहे.

ठळक मुद्दे दास दाम्पत्य दुचाकीवर फिरून देताहेत संदेश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वाघांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. त्यामुळे वाघ वाचविण्याचा संदेश देण्यासाठी सॉल्टलेक कोलकाता येथील दास दाम्पत्य दुचाकीवर भारतभ्रमण करीत आहे. ‘जर्नी फॉर टायगर’ या अभियानानुसार २१ हजार किलोमीटरचा प्रवास पूर्ण करून शनिवारी ते नागपुरात पोहोचले. वाघांचे संरक्षण करणे काळाची गरज असून, त्यासाठी प्रत्येक भारतीयाने प्रयत्न करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.रथीन्द्रोनाथ दास (४३) आणि त्यांची पत्नी गीतांजली दास हे दोघेही १५ फेब्रुवारीला सॉल्टलेक कोलकाता येथून भारत भ्रमणासाठी निघाले. दास यांना लहानपणापासून वन्यजीव आणि निसर्गाप्रति आवड आहे. देशात वाघांची झपाट्याने कमी होत चाललेल्या संख्येबद्दल तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. परंतु प्रत्यक्षात कृती करून नागरिकांना जागृत करण्यासाठी दास यांनी भारतभ्रमण करण्याचा निर्णय घेतला. १५ फेब्रुवारीला ते पत्नीसह वाघ वाचवा हा संदेश देण्यासाठी दुचाकीवर निघाले. आसाम, मेघालय, त्रिपुरा, मिझोरम, मणिपूर, नागालँड, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, बिहार, उत्तराखंड, हिमालच प्रदेश, जम्मू-काश्मीर, पंजाब, चंदीगड, हरियाणा, दिल्ली, राजस्थान, गुजरात, दीव, मध्य प्रदेश येथून ते नागपुरात आले आहेत. येथून ते बोर, मेळघाट, ताडोबा, नागझिराला भेट देणार आहेत. जंगलाशेजारील गावात जाऊन ते तेथील नागरिकांना वाघ वाचविण्याचा संदेश देत आहेत. शाळा-महाविद्यालयात जाऊनही ते प्रबोधन करीत आहेत. त्यांच्या या कार्यात ठिकठिकाणी वन अधिकारी मदत करीत असल्याचे त्यांनी सांगितले. वाघाचे संरक्षण करण्यासाठी या दाम्पत्याने सुरू केलेले अभियान खरोखरच मोलाचे आहे. वन विभागाचे मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव ) नितीन काकोडकर यांनी दास यांची भेट घेऊन त्यांना आपण लिहिलेले ‘ताडोबा द अनटोल्ड स्टोरी’ हे पुस्तक भेट दिले.जगभरात देणार वाघ वाचविण्याचा संदेशदास दाम्पत्याने जगात फिरून वाघ वाचविण्याचा संदेश देण्याचे ठरविले आहे. मार्च महिन्यापासून ते आपल्या जग भ्रमणाची सुरुवात करणार आहेत. यात म्यानमार, थायलंड, मलेशिया, इंडोनेशिया, व्हिएतनाम, लाओस, चीन, रशिया, काठमांडू, भूतान, बांगलादेश येथे वाघ वाचविण्याचा संदेश देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Tigerवाघ