शहरं
Join us  
Trending Stories
1
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
2
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
3
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
4
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
5
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
6
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
7
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 
8
दोन मुलांची आई १७ वर्षांच्या तरुणाच्या प्रेमात पडली, वर्ष झालं पिच्छा सोडेना, अखेर तरुणाने 'असा' शिकवला धडा! 
9
खळबळजनक! ४ लाख फॉलोअर्स असलेल्या महिला इन्फ्लुएन्सरचा कारमध्ये सापडला मृतदेह
10
WTC Final : शमीला मागे टाकत स्टार्कनं सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड; त्यात टीम इंडियाचा मोठा हातभार
11
"पाकिस्तान्यांचा नानांना भलताच कळवळा?, तुमचा आणि तुमच्या मालकाचा डीएनए एकच...देशद्रोह"
12
Astro Tips: शुक्र केतू युती सुखाने जगू देत नाही; आयुष्यात होते मोठे नुकसान!
13
पाकिस्तानचा हा कट्टर शत्रू तयार करतोय आत्मघातकी ड्रोनची फौज; इस्लामाबाद असो वा कराची, क्षणात होईल माती-माती!
14
'आता आणखी खेळाडू निवृत्त होतील...'; वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने केला धक्कादायक दावा
15
"लिव्ह इनमध्ये राहण्याचा खूप फायदा", मराठी अभिनेत्रीने मांडले विचार; म्हणाली, "आपले खरे रंग..."
16
आरोग्य विमा घेताना फसगत नको! 'हे' ६ प्रश्न विचाराच, अन्यथा पैसे वाया जातील!
17
लग्नाच्या ३ वर्षांनंतर आलिया भटने नावात केला मोठा बदल; हॉटेलमधील 'त्या' फोटोमुळे चर्चांना उधाण
18
डिसेंबरपासून बंद पडलंय 'या' शेअरचं ट्रेडिंग; किंमत फक्त १० रुपये, आता समोर आली मोठी अपडेट 
19
IND vs ENG : टीम इंडियातील या स्टार खेळाडूसाठी गांगुलीनं घेतला BCCI निवडकर्त्यांशी पंगा! म्हणाला...

नागपुरातून कचरागाड्या गायब; रस्त्यांवर पसरली घाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2019 01:12 IST

स्वच्छतेत नागपूर शहर अव्वल यावे यासाठी महापालिका प्रशासनाने जोर लावला आहे. परंतु आरोग्य विभागाकडून यावर पाणी फेरले जात आहे.

ठळक मुद्देदररोज गाड्या येत नसल्याने नागरिक त्रस्तशहरालगतच्या भागातील परिस्थिती गंभीरस्वच्छ भारत अभियानावर प्रश्नचिन्ह

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्वच्छतेत नागपूर शहर अव्वल यावे यासाठी महापालिका प्रशासनाने जोर लावला आहे. परंतु आरोग्य विभागाकडून यावर पाणी फेरले जात आहे. घराघरातून कचरा संकलन करण्याची जबाबदारी असलेल्या कनक रिसोर्सेस कंपनीचा करार संपुष्टात येणार असल्याने नोव्हेंबर अखेरीस दोन कंपन्यांची नियुक्ती केली जाणार आहे. करार संपुष्टात येणार असल्याने कनक रिसोर्सेस कंपनी कचरा उचलण्याचे काम व्यवस्थित करीत नसल्याने शहरातील नागरिक त्रस्त झाले आहेत.रामदासपेठ, सिव्हील लाईन, धरमपेठ, गोकुळपेठ, सीताबर्डी, इतवारी, महाल आदी भागात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिगारे दिसत आहे. यामुळे स्वच्छ भारत अभियानात महापालिका माघारण्याची शक्यता निर्माण झाली आहे. स्वच्छ भारत मोहीम २०१९ मध्ये नागपूरचे रॅकिंग ५८ वरून टॉप १० शहरात आणण्याच्या प्रयत्नांना धक्का बसला आहे.कचरा संकलनासाठी महापालिकेने शहराचे दोन पॅकेजमध्ये विभाजन केले आहे. यात झोन एक ते पाच पॅकेज-१ मध्ये तर सहा ते दहा झोनचा पॅकेज -२ मध्ये समावेश करून दोन कंपन्यांची नियुक्ती केली आहे. कचरा संकलनाचे काम सुरू करण्यासाठी ९० दिवसांची मुदत दिली आहे. दोन्ही कंपन्यांनी १६ नोव्हेंबरला काम सुरू करावयाचे आहे. दोन पाळीत कचरा उचलावयाचा आहे. त्यामुळे ४७२ वाहनांच्या जागी जादाची वाहने लागणार आहे. परंतु पाळीत काम करण्याच्या प्रक्रियेत नागरिक भरडले जाण्याची शक्यता आहे.रामदासपेठ, धंतोली, धरमपेठ, सिव्हील लाईन, गोकुळपेठ, लक्ष्मीनगर, प्रतापनगर अशा पॉश वस्त्यात कचरा संकलन करणारी वाहने दररोज येत होती. परंतु कनकचा करार रद्द करण्याचा निर्णय झाल्यापासून यात अनियमितता वाढली आहे. कचरा उचलण्याची यंत्रणा कोलमडली आहे. अशा परिस्थितीत शहरालगतच्या भागाचा विचार न केलेला बरा.मिळालेल्या माहितीनुसार उत्तर, पूर्व, दक्षिण नागपूर लगतच्या आऊ टर भागात एक-एक आठवडा कचरा गाडी येत नाही. त्यामुळे नागरिकांना नाईलाजाने कचरा रस्त्यावर वा मोकळ्या भूखंडावर टाकावा लागतो. सफाई कर्मचाऱ्यांना जीपीएस घड्याळी देण्यात आल्या. परंतु त्याचा फारसा उपयोग होताना दिसत नाही. त्यांची मनमानी सुरू आहे. एकंदरित शहरातील स्वच्छता यंत्रणा कोलमडली आहे.कनकने ठरल्यानुसार काम करावेघराघरातून दररोज कचरा संकलित होत नसल्याचे प्रकरण आयुक्त अभिजित बांगर यांनी गांभीर्याने घेतले आहे. कनकने जितक्या वर्षासाठी करार केला होता, त्याहून अधिक कालावधी देण्यात आला. निविदा काढण्यात आली. परंतु कनक पात्र ठरली नाही. त्यामुळे नवीन कंपन्यांची नियुक्ती करण्यात आली. जोपर्यंत कनककडे जबाबदारी आहे. तोपर्यंत ठरल्यानुसार काम करणे आवश्यक आहे. कचरा संकलन करणारी वाहने दररोज येत नसल्यास नागरिकांनी यासंदर्भात आरोग्य विभाग, झोन कार्यालयाकडे तक्रार करावी. त्यानुासर योग्य कार्यवाही केली जाईल. स्वच्छतेबाबतच्या तक्रारींचा निपटारा करण्याची जबाबदारी महापालिकेची आहे.अभिजित बांगर, आयुक्त महापालिकादोन कंपन्या नियुक्तघरातून व बाजार भागातील कचरा संकलित करण्याच्या नवीन व्यवस्थेवर महापालिका प्रशासन काम करित आहे. यासाठी दोन कंपन्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यात ए. जी. एन्वायरो इन्फ्रा प्रोजेक्ट प्रा. लि. ठाणे व बीवीजी इंडिया लिमिटेड, पुणे यांचा समावेश आहे. १६ नोव्हेंबरपासून दोन्ही कंपन्यांना काम सुरू करावयाचे आहे. दीड महिन्यात ४७२ वाहने, १५०० हून अधिक मनुष्यबळ, पायाभूत सुविधा उभारावयाच्या आहे. त्यानंतर घराघरातून कचरा संकलन करण्याच्या कामाला सुरुवात केली जाणार आहे. यात विविध शर्तींचा समावेश असल्याने नारिकांना त्रास होण्याची शक्यता आहे.नियुक्तीपूर्वीच वाददोन पॅकेजसाठी बीवीजी इंडिया लिमिटेडने १६५६ व १८०० रुपये प्रतिटन दराच्या कचरा संकलनासाठी निविदा भरल्या होत्या. मात्र शर्तीनुसार यातील एकाच पॅकेजसाठी कंपनी काम करू शकते. त्यामुळे कंपनीने पॅकेज दोनसाठी काम करण्याची तयारी दर्शविली. पॅके ज एक दुसऱ्या क्रमांकावरील ए.जी. एन्वायरो कंपनीला प्रतिटन १९०० रुपयाहून अधिक दराने रक्कम देण्याची घोषणा केली आहे. यामुळे महापालिकेवर कोट्यवधी रुपयांचा आर्थिक बोजा वाढणार आहे. शहरात कचरा संकलनाचे १०० स्टेशन आहेत. येथे कचरा साठविला जातो. नवीन व्यवस्थेत १० ट्रान्सफर स्टेशन उभारले जाणार आहे.

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका