लॉकडाऊनपूर्वी नागपूर शहरात ३६०ते ३८० बस धावत होत्या. परंतु लॉकडाऊन नंतर १७२ बस धावत आहे. गेल्या वर्षी अर्थसंकल्पात १०८ कोटींची तरतूद होती. यातील ८४ कोटी खर्च झाले. वास्तविक वर्षभरात ८ महिने बस सेवा बंद होती. यामुळे मनपाला ही रक्कम खर्च करावी लागली नाही.
....
७ लाख उत्पन्न, ५१ हजार प्रवासी
सध्या शहरात १७२ बस धावत आहेत. ५१ हजार प्रवासी दररोज प्रवास करतात. तर दररोज ७ लाख उत्पन्न होते. लॉकडाऊनपूर्वी १.५० ते १.६० लाख् प्रवासी प्रवास करीत होते व १८ ते २० लाख उत्पन्न होते. अनेक मार्गावर बस सुरु नसल्याने नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
सत्तापक्षाची हतबलता संपेल का ?
मनपात भाजपचे १५१ पैकी १०८ नगरसेवक आहेत. असे असूनही सत्तारूढ भाजप हतबल दिसत आहे. बस संचालनातही सत्तापक्ष लाचार असल्याचे चित्र आहे. मंगळवारी महापौरपदी अनुभवी दयाशंकर तिवारी यांची निवड करण्यात आली. गुरुवारी पदग्रहण करीत आहे. अत्यावशयक सेवा असलेली परिवहन सेवा पूर्ण क्षमतेने सुरू होणार की प्रशासनापुढे गुडघे टेकणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शहर परिवहन बजेट (कोटी) बसेस(आकडे अंदाजित)
मुंबई २२०० ५०००
पुणे १२०० २०००
नागपूर १०८ ४३७