शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

राहुल गांधींच्या 'भारत जोडो' पदयात्रेवरील 'तो निघालाय....' या  कवितेचे १३ भाषांमध्ये भाषांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2022 18:06 IST

Nagpur News राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेवर लिहिलेली एक कविता सध्या देशविदेशात गाजत आहे.

ठळक मुद्देसॅम पित्रोदा यांनीही घेतली दखल हेरंबकुलकर्णी यांची कविता गाजतेय देशविदेशात

नागपूरः कन्याकुमारी ते काश्मीर असा पल्ला गाठणाऱ्या, जनसामान्यांच्या प्रश्नांची माहिती घेत निघालेल्या, तळागाळातील नागरिकांना भेटून त्यांच्याशी संवाद करत चाललेल्या भारत जोडो यात्रेचे तसेच या यात्रेचे जनक काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्याविषयीच्या भावना व्यक्त करणारी एक कविता सध्या राज्यभरातच नव्हे तर राज्य तसेच देशाबाहेरही चर्चेत आहे. या कवितेचे आतापर्यंत ११ भारतीय  भाषांमध्ये व २ विदेशी भाषांमध्ये अनुवाद झाला आहे. 

अहमदनगर जिल्ह्यातील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी ही कविता लिहिली आहे. या कवितेचे ज्या भाषांमध्ये भाषांतर करण्यात आले त्यात, अरबी भाषेत नौशाद अलदे (सौदी अरेबिया), स्वाती वैद्य-हिंदी, संजय सोनवणी-इंग्रजी, मिलिंद पाटील-कन्नड, पुजा पुरोहित-गुजराती, विनानंद गावंडे-चंदगडी मराठी, एकनाथ गोफणे-बंजारा गोरबोली, सतीश ललित- मालवणी, नितीन खंडाळे-अहिराणी, अरविंद शिंगाडे-वऱ्हाडी, काकासाहेब वाळूंजकर-नगरीबोली यांचा समावेश आहे.

सॅम पित्रोडा यांनी घेतली दखल

जेष्ठ दूरसंचार अभियंते, संशोधक, विकासकांचे मार्गदर्शक व ज्येष्ठ सल्लागार सत्यनारायण गंगाराम पित्रोडा उर्फ सॅम पित्रोडा यांनी ट्विटरवर या कवितेची दखल घेतली आहे. आपल्या ट्विटमध्ये  त्यांनी राहुल गांधींवर लिहिलेल्या उपरोक्त कवितेचा व्हिडिओ शेअर केला आहे.  

हेरंब कुलकर्णी यांची कविता-

 

तो निघालाय

तो निघालायदक्षिणेकडून उत्तरेकडेउत्तर नसलेल्या प्रश्नांना स्पर्श करत विमान,जेट,हेलिकॉप्टर,बुलेटप्रूफ गाड्या,सारे हाताशी असतानाही धुळीच्या रस्त्यावरून  तो निघालाय....

गर्दीचा गैरफायदा घेतबापाच्या चिंधड्या झालेल्या प्रदेशातून पुन्हा त्याच गर्दीवर विश्वास टाकत हिंसेलाही लज्जित करत तो निघालाय..

पूर्वीही असेच राजे निघत अश्वमेध करायला, सैन्य घेऊनजिंकत जिंकतरक्ताचा सडा शिंपडत---पण तो नि:शस्त्र आहेप्रेम आणि संवादाचे शस्त्र घेऊन 

राज्य जिंकण्याचे सोडाच  निवडणूक जिंकण्याचीही गोष्ट तो बोलत नाहीपक्षाच्या सीमा ओलांडून समविचारींना कवेत घेत तो निघालाय

फक्त येईल त्याला प्रेमाने आलिंगन देत,एकट्या पडलेल्या व्यवस्थेत हरलेल्या फाटक्याकेविलवाण्या माणसांना मायेची ऊब देत तो निघालाय...

त्याच्या वयाला न शोभणारा ,घरातला प्रेमळ ज्येष्ठ माणूस आबालवृद्धांना त्याच्यात भेटतोयकुणाला भाऊ,कुणाला बाप, कुणाला लेक अशा नात्यात हा पन्नाशीचा पोरगा लुभावतोय....त्याला भेटून रडताहेत माणसं त्यांच्या अश्रूत वाहताहेत, व्यवस्थेने त्यांच्यावर केलेले शोषणाचे घाव

नुसते चालून  होईल काय ? लोकांशी बोलून होईल काय ?हा दांडी यात्रेपासून भूदान यात्रेपर्यंत आणि चंद्रशेखर ते बाबा आमटेपर्यंत खिल्ली उडवणारा ऐतिहासिक प्रश्न त्यालाही विचारला जाईल...पणअसल्या प्रश्नांची उत्तरे वर्तमाननाहीतरइतिहासच देत असतो... 

 

टॅग्स :Bharat Jodo Yatraभारत जोडो यात्राRahul Gandhiराहुल गांधी