शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
3
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
4
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
5
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
6
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
7
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
8
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
9
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
10
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
11
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
12
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
13
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
14
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
15
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
16
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
17
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
18
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
19
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
20
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप

वर्षानुवर्षे एकाच टेबलावर ठाण मांडून असलेल्यांच्या बदल्या?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2020 20:18 IST

नियमानुसार वर्ग-१ व वर्ग-२ मधील अधिकाऱ्यांची दर तीन वर्षांनी तर वर्ग -३ च्या कर्मचाऱ्यांची पाच आणि वर्ग-४ कर्मचाºयांची सात वर्षांनी बदली करण्याचे नियम आहे. परंतु महापालिकेतील पदाधिकारी व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कृपेने अनेक अधिकारी वर्षानुवर्षे एकाच विभागात ठाण मांडून बसले आहेत. अशा अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याच्या हालचाली प्रशासन स्तरावर सुरू झाल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नियमानुसार वर्ग-१ व वर्ग-२ मधील अधिकाऱ्यांची दर तीन वर्षांनी तर वर्ग -३ च्या कर्मचाऱ्यांची पाच आणि वर्ग-४ कर्मचाºयांची सात वर्षांनी बदली करण्याचे नियम आहे. परंतु महापालिकेतील पदाधिकारी व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कृपेने अनेक अधिकारी वर्षानुवर्षे एकाच विभागात ठाण मांडून बसले आहेत. अशा अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याच्या हालचाली प्रशासन स्तरावर सुरू झाल्या आहेत.महापालिकेच्या कुठल्या विभागात अधिकारी वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी आहेत, याची माहिती सामान्य प्रशासन विभागाकडून घेतली जात आहे. नियमानुसार बदली अपेक्षित असतानाही बदली का करण्यात आली नाही, याचा शोध घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना दुसऱ्या विभागात पाठविले जाणार आहे. अधिकाऱ्यांच्या बैठकीत मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी याबाबतचे संकेत दिले.झोनल स्तरावरील कर्मचाऱ्यांच्या बदल्या त्यांच्या निवासाच्या क्षेत्रा व्यतिरिक्त इतरत्र करण्याचे निर्देश आहेत. मात्र शेकडो कर्मचारी एकाच कार्यालयात वर्षानुवर्षे कार्यरत आहेत. विशेष म्हणजे याची आकडेवारीसुद्धा सामान्य प्रशासन विभागाकडे उपलब्ध नाही. एकाच टेबलवर वर्षानुवर्षे काम करीत असल्याने संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांची मनमानी सुरू आहे. सर्वसामान्य नागरिकांना कामासाठी चकरा माराव्या लागतात. याला निर्बंध घालण्यासाठी तीन वर्षाहून अधिक कार्यकाळ झालेल्या अधिकाºयांची बदली करणे आवश्यक आहे.टॅक्स व नगररचना विभागासाठी आग्रहमनपाच्या नगररचना व टॅक्स विभागात अनेक अधिकारी व वर्ग -३ चे कर्मचारी वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी काम करत आहते. याच विभागात कायम ठेवावे, असा त्यांचा आग्रह असतो. दुसºया विभागात जाण्याची त्यांची इच्छा नाही. यामागे 'अर्थकारण' असल्याची चर्चा आहे. काही ठिकाणी पदाधिकाऱ्यांच्या मर्जीतील अधिकारी असल्याने सामान्य प्रशासनाकडूनही त्यांच्या बदलीबाबत विचार केला जात नाही.पदाधिकाऱ्यांच्या कक्षापुढे कर्मचारी बसूनमनपातील पदाधिकाऱ्यांच्या कक्षात गरजेपेक्षा अधिक वर्ग - ४ चे कर्मचारी आहेत. काही काही कक्षापुढे हे कर्मचारी दिवसभर नुसते बसून असतात. त्यांना कुठल्याही स्वरूपाचे काम नसल्याने त्यांच्या गप्पा सुरू असतात. अनेकजण कार्यालयीन वेळेत भटकंती करीत असतात. याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.गरज असलेल्या विभागात कर्मचारी नाहीतमहापालिकेचे उत्पन्नाचे प्रमुख स्त्रोत असलेल्या टॅक्स , बाजार व नगररचना विभागात मंजूर पदाच्या तुलनेत कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे. दुसरीकडे काही भागातील कर्मचारी कामाविना बसून असतात. याचा मनपाच्या उत्पन्नावर परिणाम होत आहे. काम नसलेल्यांना या विभागात पाठवण्याची गरज आहे.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाTransferबदली