शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
2
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
3
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
4
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
5
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
6
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
7
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 
8
Anju Yadav : चौकट मोडली, भरारी घेतली! २१ व्या वर्षी लग्न, पतीचा मृत्यू... सिंगल मदर झाली राजस्थानची DSP
9
Amravati: गर्लफ्रेंड पोलीस ठाण्यात जाताच ६व्या मजल्या गेला अन् व्हिडीओ कॉल केला; नंतर बॉयफ्रेंडने सगळ्यांनाच फोडला घाम
10
"तरुणांच्या मनातील शंका..."; थेट आंदोलक तरुणांना भेटण्यासाठी पोहोचले CM धामी, परीक्षा प्रकरणात CBI चौकशीला सहमती 
11
गुंतवणूकदारांची चिंता वाढवणारी बातमी! सलग आठव्या दिवशी बाजार कोसळला; 'ही' आहेत ४ कारणे
12
कुणी कर्ज देता का कर्ज?... पाकिस्तानने पुन्हा IMF पुढे पसरले हात, महापुराचं कारण देत मागितला मोठा निधी
13
Rule Change: उद्यापासून बदलणार 'हे' महत्त्वाचे आर्थिक नियम; सामान्यांवर होणार परिणाम, पटापट चेक करा लिस्ट
14
भारतीय शास्त्रज्ञ डॉ. संध्या यांचा जागतिक स्तरावर डंका, अव्वल २ टक्के शास्त्रज्ञांमध्ये स्थान
15
दिवाळीची भेट! सरकारच्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी मोठा बोनस जाहीर; दसऱ्यापूर्वीच रक्कम हातात येणार
16
चमत्कार दाखवा आणि २१ लाख जिंका! अंनिसचे बुवा-बाबांना आव्हान; ३६ वर्षांत कोणीच पुढे आले नाही
17
Man-Animal Conflict: "आमचं सरकार तुमच्या प्रत्येक दुःखात सोबत", मुख्यमंत्री योगींचे पीडितांना आश्वासन
18
नमाज पढत होते विद्यार्थी, तेवढ्यात झाला मोठा आवाज, शाळेची इमारत कोसळून ६५ विद्यार्थी अडकले 
19
"शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून लक्ष हटवण्यासाठी अहिल्यानगरमध्ये सरकार पुरस्कृत दंगल झाली’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
20
बाबाचे 'चाळे'! इन्स्टिट्यूटमधील महिलांसोबतच स्वामी चैतन्यानंदचे संबंध; मोबाईलमध्ये मिळाले फोटो

वर्षानुवर्षे एकाच टेबलावर ठाण मांडून असलेल्यांच्या बदल्या?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2020 20:18 IST

नियमानुसार वर्ग-१ व वर्ग-२ मधील अधिकाऱ्यांची दर तीन वर्षांनी तर वर्ग -३ च्या कर्मचाऱ्यांची पाच आणि वर्ग-४ कर्मचाºयांची सात वर्षांनी बदली करण्याचे नियम आहे. परंतु महापालिकेतील पदाधिकारी व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कृपेने अनेक अधिकारी वर्षानुवर्षे एकाच विभागात ठाण मांडून बसले आहेत. अशा अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याच्या हालचाली प्रशासन स्तरावर सुरू झाल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नियमानुसार वर्ग-१ व वर्ग-२ मधील अधिकाऱ्यांची दर तीन वर्षांनी तर वर्ग -३ च्या कर्मचाऱ्यांची पाच आणि वर्ग-४ कर्मचाºयांची सात वर्षांनी बदली करण्याचे नियम आहे. परंतु महापालिकेतील पदाधिकारी व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कृपेने अनेक अधिकारी वर्षानुवर्षे एकाच विभागात ठाण मांडून बसले आहेत. अशा अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याच्या हालचाली प्रशासन स्तरावर सुरू झाल्या आहेत.महापालिकेच्या कुठल्या विभागात अधिकारी वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी आहेत, याची माहिती सामान्य प्रशासन विभागाकडून घेतली जात आहे. नियमानुसार बदली अपेक्षित असतानाही बदली का करण्यात आली नाही, याचा शोध घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना दुसऱ्या विभागात पाठविले जाणार आहे. अधिकाऱ्यांच्या बैठकीत मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी याबाबतचे संकेत दिले.झोनल स्तरावरील कर्मचाऱ्यांच्या बदल्या त्यांच्या निवासाच्या क्षेत्रा व्यतिरिक्त इतरत्र करण्याचे निर्देश आहेत. मात्र शेकडो कर्मचारी एकाच कार्यालयात वर्षानुवर्षे कार्यरत आहेत. विशेष म्हणजे याची आकडेवारीसुद्धा सामान्य प्रशासन विभागाकडे उपलब्ध नाही. एकाच टेबलवर वर्षानुवर्षे काम करीत असल्याने संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांची मनमानी सुरू आहे. सर्वसामान्य नागरिकांना कामासाठी चकरा माराव्या लागतात. याला निर्बंध घालण्यासाठी तीन वर्षाहून अधिक कार्यकाळ झालेल्या अधिकाºयांची बदली करणे आवश्यक आहे.टॅक्स व नगररचना विभागासाठी आग्रहमनपाच्या नगररचना व टॅक्स विभागात अनेक अधिकारी व वर्ग -३ चे कर्मचारी वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी काम करत आहते. याच विभागात कायम ठेवावे, असा त्यांचा आग्रह असतो. दुसºया विभागात जाण्याची त्यांची इच्छा नाही. यामागे 'अर्थकारण' असल्याची चर्चा आहे. काही ठिकाणी पदाधिकाऱ्यांच्या मर्जीतील अधिकारी असल्याने सामान्य प्रशासनाकडूनही त्यांच्या बदलीबाबत विचार केला जात नाही.पदाधिकाऱ्यांच्या कक्षापुढे कर्मचारी बसूनमनपातील पदाधिकाऱ्यांच्या कक्षात गरजेपेक्षा अधिक वर्ग - ४ चे कर्मचारी आहेत. काही काही कक्षापुढे हे कर्मचारी दिवसभर नुसते बसून असतात. त्यांना कुठल्याही स्वरूपाचे काम नसल्याने त्यांच्या गप्पा सुरू असतात. अनेकजण कार्यालयीन वेळेत भटकंती करीत असतात. याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.गरज असलेल्या विभागात कर्मचारी नाहीतमहापालिकेचे उत्पन्नाचे प्रमुख स्त्रोत असलेल्या टॅक्स , बाजार व नगररचना विभागात मंजूर पदाच्या तुलनेत कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे. दुसरीकडे काही भागातील कर्मचारी कामाविना बसून असतात. याचा मनपाच्या उत्पन्नावर परिणाम होत आहे. काम नसलेल्यांना या विभागात पाठवण्याची गरज आहे.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाTransferबदली