शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Chawl Collapsed: वांद्र्यात तीन मजली चाळ कोसळली, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले, बचावकार्य सुरू
2
Mumbai: मालवणी परिसरातून अपहरण झालेल्या तीन मुलींची सुखरूप सुटका
3
Share Market Today: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी घसरण
4
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
5
तुमची मुलगी बनेल लखपती; महिन्याला वाचवा १००० रुपये, २१ व्या वर्षी मिळतील ₹५.५ लाख
6
Padalkar Awhad: विधान भवनात देशमुखांना मारहाण, पडळकरांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले कोण?
7
दूध गरम करताना सिलेंडर फुटला, २० घरांची राखरांगोळी; महिलेचा होरपळून मृत्यू
8
पहलगाम हल्ल्यानंतर अमेरिकेने ‘TRF’बद्दल घेतला मोठा निर्णय; पाकिस्तानच्या कुरापतींना चाप बसणार!
9
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
10
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
11
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
12
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
13
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
14
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
15
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
16
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
17
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
18
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
19
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
20
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय

कामठीतील कत्तलखान्याचे भांडेवाडीत स्थानांतरण

By admin | Updated: October 13, 2014 01:13 IST

कामठीतील वादग्रस्त कत्तलखाना भांडेवाडी येथे स्थानांतरित करण्याच्या हालचाली होत आहेत. जिल्हाधिकारी यासंदर्भात महानगरपालिकेला प्रस्ताव सादर करणार आहे. मनपाने प्रस्तावाला

जिल्हाधिकाऱ्यांचा प्रस्ताव : हायकोर्टात दिली माहितीनागपूर : कामठीतील वादग्रस्त कत्तलखाना भांडेवाडी येथे स्थानांतरित करण्याच्या हालचाली होत आहेत. जिल्हाधिकारी यासंदर्भात महानगरपालिकेला प्रस्ताव सादर करणार आहे. मनपाने प्रस्तावाला मंजुरी दिल्यास ताबडतोब स्थानांतरणाची कार्यवाही केली जाईल. सरकारी वकिलांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात ही माहिती दिली.कामठीतील विद्यमान कत्तलखाना स्थानांतरित करण्याची कामठीवासीयांची मागणी आहे. कत्तलखाना वैज्ञानिकदृष्ट्या अयोग्य असल्यामुळे उच्च न्यायालयात दोन जनहित याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. एक याचिका डॉ. संदीप कश्यप व विवेकानंद ममतानी यांची, तर दुसरी याचिका आॅल इंडिया जमैतुल कुरेश संस्थेची आहे. कामठीतील कत्तलखाना स्थानांतरित करण्यासाठी गेल्यावर्षीपासून योग्य भूखंडाचा शोध घेतला जात आहे. आतापर्यंत अनेक भूखंडांबाबत विचार करण्यात आला. पण विविध कारणांमुळे एकावरही अंतिम शिक्कामोर्तब होऊ शकले नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी आता भांडेवाडीचा पर्याय पुढे आणला आहे. यावर ते उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करणार आहेत. (प्रतिनिधी)मुख्याधिकाऱ्यांना समन्सकत्तलखान्यासाठी मौजा खैरी येथील भूखंडाचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. मौजा खैरी येथे शासनाची ४.०३ हेक्टर (गट क्र. १७७) जमीन आहे. यासंदर्भात २८ मे २०१३ रोजी उपजिल्हाधिकारी (महसूल) यांनी कामठी नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना कळविले होते. परंतु मुख्याधिकाऱ्यांनी भूखंड मिळविण्यासाठी अनेक महिने काहीच प्रयत्न केले नाही. यामुळे न्यायालयाने मुख्याधिकाऱ्यांना समन्स बजावून स्पष्टीकरण मागितले होते. त्यानुसार मुख्याधिकारी संजय रामटेके यांनी २२ जानेवारी २०१४ रोजी न्यायालयात प्रत्यक्ष उपस्थित राहून स्पष्टीकरण सादर केले होते.याचिकाकर्त्यांची तक्रारकामठीतील कत्तलखान्यामुळे स्थानिक नागरिक त्रस्त आहेत. नियम धाब्यावर बसवून कत्तलखाना चालविला जात आहे. जनावरांचे निरुपयोगी अवयव शास्त्रीय पद्धतीने नष्ट करण्यात येत नाहीत. यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. यासंदर्भात अनेकांनी शासनाशी पत्रव्यवहार केला. पण काहीच कारवाई करण्यात आली नाही, अशी याचिकाकर्त्यांची तक्रार आहे. कत्तलखाना अन्य ठिकाणी स्थानांतरित करण्याची विनंती त्यांनी याचिकेत केली आहे.विविध प्रस्ताव बारगळलेमौजा खैरी येथे कत्तलखाना उभारण्यास ग्रामपंचायतने आक्षेप घेतला होता. प्रस्तावावर निर्णय घेण्यापूर्वी नागरिकांची मते विचारात घ्यावे लागतील म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी न्यायालयाला आवश्यक वेळ मागून घेतला होता. परंतु हा विषय मार्गी लागला नाही. यानंतर कामठी तहसीलदारांनी सहा ते सात भूखंड सुचविले. त्यावरही एकमत झाले नाही. याचिकाकर्त्या संस्थेने ०.८१ हेक्टरचा भूखंड देण्याची तयारी दर्शविली होती. परंतु त्याचाही काहीच उपयोग झाला नाही.