शहरं
Join us  
Trending Stories
1
Sindhudurg: शिरोडा वेळागर समुद्रात आठ पर्यटक बेपत्ता, तिघांचे मृतदेह सापडले
2
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
3
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
4
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
5
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
6
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
7
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
8
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
9
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
11
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
12
बेडरूममध्ये कॅमेरा बसवून खासगी व्हिडीओ काढले अन् परदेशात...; पत्नीने समोर आलं पतीचे किळसवाणं कृत्य
13
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
14
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
15
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
16
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
17
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा
18
भारीच! महागडे प्रोडक्ट सोडा... गळणाऱ्या केसांवर रामबाण उपाय; एकदा करून बघाच
19
“मुंबईच्या गरब्यात सेलिब्रिटींवर लाखोंची उधळण, तेच पैसे शेतऱ्यांना दिले असते”: रोहित पाटील
20
Video: अमानवीय! आधी टक्कर मारली, मग गाडीखाली चिरडले; बैलाची अतिशय क्रुर हत्या...

कामठीतील कत्तलखान्याचे भांडेवाडीत स्थानांतरण

By admin | Updated: October 13, 2014 01:13 IST

कामठीतील वादग्रस्त कत्तलखाना भांडेवाडी येथे स्थानांतरित करण्याच्या हालचाली होत आहेत. जिल्हाधिकारी यासंदर्भात महानगरपालिकेला प्रस्ताव सादर करणार आहे. मनपाने प्रस्तावाला

जिल्हाधिकाऱ्यांचा प्रस्ताव : हायकोर्टात दिली माहितीनागपूर : कामठीतील वादग्रस्त कत्तलखाना भांडेवाडी येथे स्थानांतरित करण्याच्या हालचाली होत आहेत. जिल्हाधिकारी यासंदर्भात महानगरपालिकेला प्रस्ताव सादर करणार आहे. मनपाने प्रस्तावाला मंजुरी दिल्यास ताबडतोब स्थानांतरणाची कार्यवाही केली जाईल. सरकारी वकिलांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात ही माहिती दिली.कामठीतील विद्यमान कत्तलखाना स्थानांतरित करण्याची कामठीवासीयांची मागणी आहे. कत्तलखाना वैज्ञानिकदृष्ट्या अयोग्य असल्यामुळे उच्च न्यायालयात दोन जनहित याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. एक याचिका डॉ. संदीप कश्यप व विवेकानंद ममतानी यांची, तर दुसरी याचिका आॅल इंडिया जमैतुल कुरेश संस्थेची आहे. कामठीतील कत्तलखाना स्थानांतरित करण्यासाठी गेल्यावर्षीपासून योग्य भूखंडाचा शोध घेतला जात आहे. आतापर्यंत अनेक भूखंडांबाबत विचार करण्यात आला. पण विविध कारणांमुळे एकावरही अंतिम शिक्कामोर्तब होऊ शकले नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी आता भांडेवाडीचा पर्याय पुढे आणला आहे. यावर ते उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करणार आहेत. (प्रतिनिधी)मुख्याधिकाऱ्यांना समन्सकत्तलखान्यासाठी मौजा खैरी येथील भूखंडाचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. मौजा खैरी येथे शासनाची ४.०३ हेक्टर (गट क्र. १७७) जमीन आहे. यासंदर्भात २८ मे २०१३ रोजी उपजिल्हाधिकारी (महसूल) यांनी कामठी नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना कळविले होते. परंतु मुख्याधिकाऱ्यांनी भूखंड मिळविण्यासाठी अनेक महिने काहीच प्रयत्न केले नाही. यामुळे न्यायालयाने मुख्याधिकाऱ्यांना समन्स बजावून स्पष्टीकरण मागितले होते. त्यानुसार मुख्याधिकारी संजय रामटेके यांनी २२ जानेवारी २०१४ रोजी न्यायालयात प्रत्यक्ष उपस्थित राहून स्पष्टीकरण सादर केले होते.याचिकाकर्त्यांची तक्रारकामठीतील कत्तलखान्यामुळे स्थानिक नागरिक त्रस्त आहेत. नियम धाब्यावर बसवून कत्तलखाना चालविला जात आहे. जनावरांचे निरुपयोगी अवयव शास्त्रीय पद्धतीने नष्ट करण्यात येत नाहीत. यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. यासंदर्भात अनेकांनी शासनाशी पत्रव्यवहार केला. पण काहीच कारवाई करण्यात आली नाही, अशी याचिकाकर्त्यांची तक्रार आहे. कत्तलखाना अन्य ठिकाणी स्थानांतरित करण्याची विनंती त्यांनी याचिकेत केली आहे.विविध प्रस्ताव बारगळलेमौजा खैरी येथे कत्तलखाना उभारण्यास ग्रामपंचायतने आक्षेप घेतला होता. प्रस्तावावर निर्णय घेण्यापूर्वी नागरिकांची मते विचारात घ्यावे लागतील म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी न्यायालयाला आवश्यक वेळ मागून घेतला होता. परंतु हा विषय मार्गी लागला नाही. यानंतर कामठी तहसीलदारांनी सहा ते सात भूखंड सुचविले. त्यावरही एकमत झाले नाही. याचिकाकर्त्या संस्थेने ०.८१ हेक्टरचा भूखंड देण्याची तयारी दर्शविली होती. परंतु त्याचाही काहीच उपयोग झाला नाही.