शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
सोनम, सुपारी अन् सरेंडर, समोर आला लव्ह ट्रँगल...! कोण आहे राज कुशवाह? याच्यामुळेच तर झाला नसेल राजाचा 'मर्डर'?
3
दारावर लटकून प्रवास, समोरच्या ट्रेनमधील प्रवाशांना धडक अन्...; मुंब्रामधील रेल्वे दुर्घटनेचे कारण समोर
4
"मी सिनेइंडस्ट्रीतला नाही...", मुंबई सोडून गावाला का स्थायिक झाले नाना पाटेकर?, बिग बींना सांगितलेलं कारण
5
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
6
Mumbai Local: नव्या लोकलचे दरवाजे आपोआप बंद होणार, मुंबई रेल्वे अपघातानंतर प्रशासनाला जाग!
7
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! ११ मे ला लग्न, २० ला हनिमून, २३ ला हत्या; १७ दिवसांनी कोणाला केला पहिला फोन?
8
Vat Purnima 2025: सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवले, तेव्हा यमाशी कसा झाला होता अखेरचा संवाद? वाचा!
9
अहिल्यानगर : एमपीएल क्रिकेट सामना बघून परताना गाडीचा भीषण अपघात; जळगावमधील दोन ठार, ११ जखमी
10
मुलाचा जन्म, पण उपचारादरम्यान मातेचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरात पुण्याच्या घटनेची पुनरावृत्ती
11
"मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला", २५ वर्ष लहान अभिनेत्रीने मिथुन चक्रवर्तींवर केलेला आरोप
12
पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिले; 'बेवफा' सोनम प्रियकरासोबत युपीत सापडली...
13
Vat Purnima 2025: वडाची पूजा झाल्यावर 'हा' श्लोक म्हणायला विसरू नका, तरच पूर्ण होईल व्रत!
14
Vat Purnima 2025: केवळ सौभाग्यासाठी नाही, तर दीर्घायुष्यासाठी करा वटवृक्षाची पुजा!
15
भारतात पहिल्यांदाच MCX नं केलं असं काम की विक्रमी उच्चांकी स्तरावर पोहोचले शेअर्स, जाणून घ्या
16
"आमची मुलगी असं का करेल? असं करायचं असतं, तर ती..."; सोनमच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया काय?
17
"गेल्या १० वर्षांपासून मी मानसोपचार...", अमृता सुभाषने केला खुलासा; कारणही सांगितलं
18
अनिल अंबानींची कंपनी करणार ₹५००० कोटींची गुंतवणूक; संरक्षण क्षेत्रात इतिहास रचण्यास तयार
19
७ वर्षांत एफडीआयमध्ये महाराष्ट्र टॉप, परदेशातील सर्वाधिक गुंतवणूक राज्यात; पायाभूत सुविधांतील सुधारणा ठरतेय मोठ्या फायद्याची

आरोग्य केंद्राचे स्थानांतरण रखडले

By admin | Updated: August 20, 2016 02:32 IST

राज्य शासनाने नागपूर जिल्ह्यातील काही ग्रामपंचायतींचा दर्जा वाढवून त्यांना नगर परिषद व नगर पंचायतींचा दर्जा प्रदान केला.

अनुदान बंद : साहित्य खरेदी व किरकोळ खर्च भागविण्यासाठी कसरत दिनकर ठवळे कोराडी राज्य शासनाने नागपूर जिल्ह्यातील काही ग्रामपंचायतींचा दर्जा वाढवून त्यांना नगर परिषद व नगर पंचायतींचा दर्जा प्रदान केला. परिणामी, ही गावे ग्रामविकास मंत्रालयाकडून नगर विकास मंत्रालयाकडे वर्ग करण्यात आल्याने या गावांमधील प्राथमिक आरोग्य केंद्र व त्या अंतर्गत येणाऱ्या आरोग्य उपकेंद्राला जिल्हा परिषदेच्यावतीने देण्यात येणारे अनुदान बंद करण्यात आले. त्यामुळे साहित्य खरेदी व किरकोळ खर्च भागविण्यासाठी कर्मचाऱ्यांना कसरत करावी लागत आहे. त्यातच या नगर पंचायतच्या हद्दीतील आरोग्य केंद्रांच्या स्थानांतरणाची प्रक्रियादेखील रखडली आहे. राज्य शासनाने मोठ्या ग्रामपंचायतींना नगर परिषद व नगर पंचायतींचा दर्जा प्रदान करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार कामठी तालुक्यातील महादुला व मौदा ग्रामपंचायतला नगर पंचायचा आणि वाडी व कन्हानला नगर परिषदेचा दर्जा प्रदान करण्यात आला. त्यातच आरोग्य संचालकांनी ४ जानेवारी २०१६ रोजी सर्व जिल्हा परिषदांना त्यांच्या क्षेत्रातील नगर पषिद व नगर पंचायतींच्या हद्दीतील प्राथमिक आरोग्य केंद्र आणि त्या अंतर्गत येणारे आरोग्य उपकेंद्र योग्य व सोयीच्या ठिकाणी स्थानांतरीत करण्याच्या सूचना केल्या. त्या अनुषंगाने जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा आरोग्य समितीचे सभापती शरद डोणेकर यांनी ८ फेब्रुवारी २०१६ रोजी जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र आणि त्या अंतर्गत येणाऱ्या उपकेंद्राला तसेच संबंधितांना पत्र पाठवून माहिती मागितली. जिल्ह्यातील नगर परिषद व नगर पंचायतींच्या हद्दीतील प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रांच्या स्थानांतरणाचा प्रस्ताव आरोग्य संचालकांकडे सादर केला. या आरोग्य केंद्रांचे अद्यापही योग्य ठिकाणी स्थानांतरण करण्यात आले नाही. यात महादुला येथील आरोग्य उपकेंद्राचाही समावेश आहे. त्यातच जिल्हा परिषद प्रशासनाने नगर परिषद व नगर पंचायतींच्या हद्दीतील आरोग्य केंद्रांचे अनुदान बंद केले. त्यामुळे या केंद्रातील कर्मचाऱ्यांसमोर साहित्य खरेदी व किरकोळ खर्चाची नवी समस्या निर्माण झाली आहे. या ग्रामपंचायतींचा दर्जा वाढविण्यात आल्याने तेथील प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्र स्थानांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे या शहरामधील नागरिकांच्या वैद्यकीय सेवेचा प्रश्न निर्माण झाला. यावर उपाय म्हणून नगर परिषद व नगर पंचायत प्रशासनाने त्यांच्या क्षेत्रात त्यांची आरोग्य सेवा सुरू करण्याची सूचना केली आहे. विशेष म्हणजे या नगर परिषद व नगर पंचायतींकडे त्यांची स्वत:ची कार्यालये नाहीत. या संस्था आर्थिकदृष्ट्या सक्षम नाहीत. यासाठी या संस्थांना आणखी तीन वर्षे लागतील. प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा उपकेंद्र नगर परिषद किंवा नगर पंचायत प्रशासनाला हस्तांतरित केल्यास या संस्थांना आरोग्य केंद्रांचा संपूर्ण खर्च करावा लागणार आहे. त्यामुळे पर्यायी व्यवस्था होईपर्यंत सदर प्राथमिक केंद्र व उपकेंद्र स्थानांतरित करू नये, अशी मागणी केली जात आहे. शहरी क्षेत्रात समावेश नगर परिषद व नगर पंचायत क्षेत्रातील प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रांना जिल्हा परिषद प्रशासनाकडून मिळणारे अनुदान आता बंद करण्यात आले आहे. कारण या गावांचा समावेश शहरी क्षेत्रात करण्यात आला आहे. या आरोग्य केंद्र व उपकेंद्रातील विजेचे बिल भरणे तसेच स्टेशनरी खरेदी करण्यासाठी त्यांना जिल्हा परिषदेकडून थोडेफार अनुदान दिले जात आहे. सदर अनुदान पुरेसे नसल्याची माहिती कर्मचाऱ्यांनी दिली. सदर प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र मोठ्या लोकवस्तीच्या गावांमध्ये स्थानांतरित केली जाईल. त्यादृष्टीने चाचपणी सुरू आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा आरोग्य समिती सभापती शरद डोणेकर यांनी दिली. आरोग्य सेवेवर परिणाम नाही प्रशासनाच्या या निर्णयाचा या प्राथमिक आरोग्य केंद्र किं वा उपकेंद्रातील आरोग्य सेवेवर कोणताही विपरीत परिणाम झाला नाही. या केंद्रांना कार्यालयीन खर्चासाठी विशेष अनुदान तथा जिल्हा परिषदेच्या शेष फंडातून निधी उपलब्ध करून दिला जात आहे. अपुऱ्या निधीमुळे किरकोळ खर्चाची समस्या निर्माण झाली असली तरी या केंद्रातील आरोग्य सेवा प्रभावित झाली नाही, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेंद्र सवाई यांनी दिली.