शहरं
Join us  
Trending Stories
1
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
2
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
3
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
4
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
5
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
6
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
7
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
8
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
9
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
10
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
11
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
12
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
13
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
14
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
15
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
16
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
17
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
18
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
19
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
20
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...

रेल्वे ट्रॅकमेन होणार आता अधिक सुरक्षित : अभियांत्रिकी इलेक्ट्रॉनिक्सच्या विद्यार्थ्यांचे संशोधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2019 00:05 IST

अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी असे उपकरण तयार केले आहे, ज्यामुळे ट्रॅकवर फिरणाऱ्या ट्रॅकमनला येणाऱ्या धोक्याची पूर्वसूचना मिळेल आणि ते धोकादायक स्थितीपासून सहज दूर जाऊ शकतील.

ठळक मुद्दे आमूलाग्र बदल घडण्याचा विश्वास

निशांत वानखेडे / लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रेल्वे ट्रॅकवर काम करणाऱ्या किंवा रेल्वेच्या सुरक्षेसाठी पेट्रोलिंग करणाऱ्या कर्मचाऱ्यांना (ट्रॅकमेन) कायम धोक्यात वावरावे लागते. जराही नजर चुकली तर अपघातात प्राणहानी होण्याची शक्यता निश्चितच असते. त्यामुळे सुरक्षेसाठी सावधानता बाळगणे नितांत गरजेचे असते. आता तंत्रज्ञानाच्या मदतीने ट्रॅकमनची सुरक्षा अधिक सक्षम होणार आहे. होय, अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी असे उपकरण तयार केले आहे, ज्यामुळे ट्रॅकवर फिरणाऱ्या ट्रॅकमनला येणाऱ्या धोक्याची पूर्वसूचना मिळेल आणि ते धोकादायक स्थितीपासून सहज दूर जाऊ शकतील.रामदेवबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या इलेक्ट्रॉनिक्स विभागाच्या विद्यार्थ्यांनी वायरलेस तंत्रज्ञान विकसित केले असून संशोधनाला ‘ट्रॅकमेन अलर्ट सिस्टीम’ हे नाव देण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी रेल्वे ट्रॅकमेनच्या सुरक्षेवर लक्ष केंद्रित करीत प्रकल्प स्वीकारले होते. हा प्रकल्प दोन भागात विभागण्यात आला. यामध्ये एक उपकरण रुळावर फिरणाऱ्या ट्रॅकमनला अलर्ट करेल तर दुसरे रेल्वे फाटकाजवळ येणाऱ्या गाडीचे व इतर वाहनांचे मॉनिटरींग करेल. याअंतर्गत माचिसच्या आकाराचे एक उपकरण तयार करण्यात आले जे ट्रॅकमनला अलर्ट करून धोक्याची सुचना देईल. आयओटी तंत्रज्ञान व वायरलेस सिस्टीमचा वापर करून तयार केलेले हे उपकरण हाताळण्यास अतिशय सोपे असून ट्रॅकमेनचे अपघात थांबविण्यात प्रभावी भूमिका बजावेल. या प्रकल्पात सिद्धेश जगताप,अमेय दहिकर, विनय केवटे आणि आदित्य चिकटे यांचा सहभाग राहिला. हे अभिनव तंत्रज्ञान विद्यार्थ्यांनी अवघ्या ३३३३ रुपये किमतीत विकसित केले असून नागपूरातील डायमंड क्रॉसिंगजवळ या तंत्रज्ञानाची यशस्वीपणे चाचणीही करण्यात आली.दुसरे संशोधन ‘टीव्हीयु सेन्सस सिस्टीम’ या नावाने तयार केले असून लेव्हल क्रॉसिंग फाटकाजवळील वाहनांची अचूक मोजदाद यामुळे शक्य होणार आहे. ही यंत्रणा देखील नागपुरातील मनीषनगर रेल्वे फाटक क्रमांक १२० येथे चाचणीत यशस्वी झाली आहे. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आदेश खांडेकर, आदेश सिंगलवार, ऋषभ मिश्रा आणि नीरव जैन यांचा समावेश होता. दोन्ही संशोधन प्रकल्प इलेक्ट्रॉनिक्स विभागाचे प्रा भालचंद्र हरदास आणि प्रा विशाल राठी यांच्या नेतृत्वाखाली तत्कालीन रेल्वे विभागीय प्रबंधक निर्मलकुमार भंडारी यांच्या मार्गदर्शनात पूर्ण करण्यात आले.मध्य रेल्वेला केले हस्तांतरितहे दोन्ही प्रकल्प कार्यान्वित झाले तर ट्रॅकमेनच्या सुरक्षेत आमूलाग्र बदल घडणार आहे. ही गरज लक्षात घेता हे दोन्ही प्रकल्प नुकतेच मध्य रेल्वेला हस्तांतरित करण्यात आले. या अभिनव संशोधनासाठी नुकतेच नागपूर दौऱ्यावर आलेले मध्य रेल्वे, मुंबईचे महाप्रबंधक यांच्याहस्ते विद्यार्थी व मार्गदर्शक प्राध्यापकांचा सत्कार केला. यावेळी मध्य रेल्वे नागपूरचे विभागीय प्रबंधक सोमेश कुमार , अतिरिक्त विभागीय रेल्वे प्रबंधक जयसिंह , ज्येष्ठ विभागीय सुरक्षा अधिकारी अरविंद दाभाडे यांचेसह वरिष्ठ रेल्वे अधिकारी उपस्थित होते. महाविद्यालयाचे व्यवस्थापन तसेच प्राचार्य डॉ राजेश पांडे ,विभागप्रमुख डॉ खुर्शीद व प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.पाच वर्षात ७६८ ट्रॅकमनचा अपघातट्रॅकवर काम करताना अथवा पेट्रोलिंग करताना अवजड उपकरणे घेऊन हे कर्मचारी सतत फिरत असतात. अशावेळी रेल्वेचा मुख्य कणा असलेले हे कर्मचारी सतत तणावात असतात. भरधाव वेगाने येणाऱ्या रेल्वेचा अंदाज न आल्याने कधी कधी अपघात घडतात आणि त्यांना प्राणही गमवावे लागतात. रेल्वेच्या माहितीनुसार वर्ष २०१२ ते २०१७ दरम्यान ट्रॅकवर काम करणाऱ्या७६८ कर्मचाऱ्यांना अपघात झाला होता. अशावेळी हे दोन्ही प्रकल्प कार्यान्वित झाल्यास या ट्रॅकमनची सुरक्षा अधिक सक्षम होईल, असा विश्वास संशोधक विद्यार्थ्यांनी व्यक्त केला आहे.

टॅग्स :railwayरेल्वेResearchसंशोधन