शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

रेल्वे ट्रॅकमेन होणार आता अधिक सुरक्षित : अभियांत्रिकी इलेक्ट्रॉनिक्सच्या विद्यार्थ्यांचे संशोधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2019 00:05 IST

अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी असे उपकरण तयार केले आहे, ज्यामुळे ट्रॅकवर फिरणाऱ्या ट्रॅकमनला येणाऱ्या धोक्याची पूर्वसूचना मिळेल आणि ते धोकादायक स्थितीपासून सहज दूर जाऊ शकतील.

ठळक मुद्दे आमूलाग्र बदल घडण्याचा विश्वास

निशांत वानखेडे / लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रेल्वे ट्रॅकवर काम करणाऱ्या किंवा रेल्वेच्या सुरक्षेसाठी पेट्रोलिंग करणाऱ्या कर्मचाऱ्यांना (ट्रॅकमेन) कायम धोक्यात वावरावे लागते. जराही नजर चुकली तर अपघातात प्राणहानी होण्याची शक्यता निश्चितच असते. त्यामुळे सुरक्षेसाठी सावधानता बाळगणे नितांत गरजेचे असते. आता तंत्रज्ञानाच्या मदतीने ट्रॅकमनची सुरक्षा अधिक सक्षम होणार आहे. होय, अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी असे उपकरण तयार केले आहे, ज्यामुळे ट्रॅकवर फिरणाऱ्या ट्रॅकमनला येणाऱ्या धोक्याची पूर्वसूचना मिळेल आणि ते धोकादायक स्थितीपासून सहज दूर जाऊ शकतील.रामदेवबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या इलेक्ट्रॉनिक्स विभागाच्या विद्यार्थ्यांनी वायरलेस तंत्रज्ञान विकसित केले असून संशोधनाला ‘ट्रॅकमेन अलर्ट सिस्टीम’ हे नाव देण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी रेल्वे ट्रॅकमेनच्या सुरक्षेवर लक्ष केंद्रित करीत प्रकल्प स्वीकारले होते. हा प्रकल्प दोन भागात विभागण्यात आला. यामध्ये एक उपकरण रुळावर फिरणाऱ्या ट्रॅकमनला अलर्ट करेल तर दुसरे रेल्वे फाटकाजवळ येणाऱ्या गाडीचे व इतर वाहनांचे मॉनिटरींग करेल. याअंतर्गत माचिसच्या आकाराचे एक उपकरण तयार करण्यात आले जे ट्रॅकमनला अलर्ट करून धोक्याची सुचना देईल. आयओटी तंत्रज्ञान व वायरलेस सिस्टीमचा वापर करून तयार केलेले हे उपकरण हाताळण्यास अतिशय सोपे असून ट्रॅकमेनचे अपघात थांबविण्यात प्रभावी भूमिका बजावेल. या प्रकल्पात सिद्धेश जगताप,अमेय दहिकर, विनय केवटे आणि आदित्य चिकटे यांचा सहभाग राहिला. हे अभिनव तंत्रज्ञान विद्यार्थ्यांनी अवघ्या ३३३३ रुपये किमतीत विकसित केले असून नागपूरातील डायमंड क्रॉसिंगजवळ या तंत्रज्ञानाची यशस्वीपणे चाचणीही करण्यात आली.दुसरे संशोधन ‘टीव्हीयु सेन्सस सिस्टीम’ या नावाने तयार केले असून लेव्हल क्रॉसिंग फाटकाजवळील वाहनांची अचूक मोजदाद यामुळे शक्य होणार आहे. ही यंत्रणा देखील नागपुरातील मनीषनगर रेल्वे फाटक क्रमांक १२० येथे चाचणीत यशस्वी झाली आहे. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आदेश खांडेकर, आदेश सिंगलवार, ऋषभ मिश्रा आणि नीरव जैन यांचा समावेश होता. दोन्ही संशोधन प्रकल्प इलेक्ट्रॉनिक्स विभागाचे प्रा भालचंद्र हरदास आणि प्रा विशाल राठी यांच्या नेतृत्वाखाली तत्कालीन रेल्वे विभागीय प्रबंधक निर्मलकुमार भंडारी यांच्या मार्गदर्शनात पूर्ण करण्यात आले.मध्य रेल्वेला केले हस्तांतरितहे दोन्ही प्रकल्प कार्यान्वित झाले तर ट्रॅकमेनच्या सुरक्षेत आमूलाग्र बदल घडणार आहे. ही गरज लक्षात घेता हे दोन्ही प्रकल्प नुकतेच मध्य रेल्वेला हस्तांतरित करण्यात आले. या अभिनव संशोधनासाठी नुकतेच नागपूर दौऱ्यावर आलेले मध्य रेल्वे, मुंबईचे महाप्रबंधक यांच्याहस्ते विद्यार्थी व मार्गदर्शक प्राध्यापकांचा सत्कार केला. यावेळी मध्य रेल्वे नागपूरचे विभागीय प्रबंधक सोमेश कुमार , अतिरिक्त विभागीय रेल्वे प्रबंधक जयसिंह , ज्येष्ठ विभागीय सुरक्षा अधिकारी अरविंद दाभाडे यांचेसह वरिष्ठ रेल्वे अधिकारी उपस्थित होते. महाविद्यालयाचे व्यवस्थापन तसेच प्राचार्य डॉ राजेश पांडे ,विभागप्रमुख डॉ खुर्शीद व प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.पाच वर्षात ७६८ ट्रॅकमनचा अपघातट्रॅकवर काम करताना अथवा पेट्रोलिंग करताना अवजड उपकरणे घेऊन हे कर्मचारी सतत फिरत असतात. अशावेळी रेल्वेचा मुख्य कणा असलेले हे कर्मचारी सतत तणावात असतात. भरधाव वेगाने येणाऱ्या रेल्वेचा अंदाज न आल्याने कधी कधी अपघात घडतात आणि त्यांना प्राणही गमवावे लागतात. रेल्वेच्या माहितीनुसार वर्ष २०१२ ते २०१७ दरम्यान ट्रॅकवर काम करणाऱ्या७६८ कर्मचाऱ्यांना अपघात झाला होता. अशावेळी हे दोन्ही प्रकल्प कार्यान्वित झाल्यास या ट्रॅकमनची सुरक्षा अधिक सक्षम होईल, असा विश्वास संशोधक विद्यार्थ्यांनी व्यक्त केला आहे.

टॅग्स :railwayरेल्वेResearchसंशोधन