शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
3
"धोनीने मला 'सरडा' बनायला भाग पाडलं..."; दिनेश कार्तिकने सांगितलं टीम इंडियाचं मोठं गुपित
4
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
5
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
6
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
8
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
9
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
10
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
11
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
12
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
13
अकरावी प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरी आजपासून, १३ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना करता येणार अर्ज
14
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
15
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
16
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
17
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
18
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
19
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
20
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 

विनापरवाना ११०९ विद्यार्थी, पालकांवर चालान कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2017 02:03 IST

वाहतूक पोलिसांनी विना परवाना वाहन चालविणाºया अल्पवयीन विद्यार्थ्यांविरुद्ध मोहीम राबवून ३०९ वाहनांना ताब्यात घेतले आहे.

ठळक मुद्देआणखी तीन दिवस चालणार वाहतूक पोलीस विभागाची मोहीम

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वाहतूक पोलिसांनी विना परवाना वाहन चालविणाºया अल्पवयीन विद्यार्थ्यांविरुद्ध मोहीम राबवून ३०९ वाहनांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी ११०९ विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांविरुद्ध चालानची कारवाई केली आहे. तीन दिवसांपर्यंत चालणाºया या विशेष मोहिमेमुळे पालकात खळबळ उडाली आहे.पोलिसांनी पूर्वीच विना परवाना वाहन चालविणाºयांवर कारवाई करण्याची घोषणा केली होती. या मोहिमेंतर्गत वाहतूक पोलिसांनी सकाळी शाळा-महाविद्यालयांसमोर मोहीम सुरू केली. वाहतूक पोलिसांनी ८३६ विद्यार्थी आणि २७३ पालकांविरुद्ध कारवाई केली. कारवाईदरम्यान ३०९ दुचाकी वाहनांना ताब्यात घेण्यात आले. वाहतूक पोलिसांच्या कारवाईमुळे पालकांमध्ये खळबळ उडाली. पोलिसांनी विद्यार्थ्यांमार्फत पालकास बोलविले. मुलांनी कारवाई सुरू असल्याचे सांगताच पालक वाहतूक कार्यालयात पोहोचले. पोलिसांनी त्यांचे मार्गदर्शन केले. वाहन चालविण्याचा परवाना नसताना वाहन सोपविल्याबद्दल प्रश्न उपस्थित केला. यातील अनेक विद्यार्थी विना हेल्मेट वाहन चालवीत होते. अशा पद्धतीने मुलांचा जीव धोक्यात घालून वाहतूक नियमांचे उल्लंघन कितपत योग्य आहे, अशी विचारणा पालकांना करण्यात आली. बहुतांश पालकांनी आपली चूक मान्य केली. शिक्षकांनीही वाहतूक पोलिसांच्या कारवाईची आधीच माहिती दिल्याचे त्यांनी मान्य केले. त्याशिवाय मुलांना वाहन देणे ही आपली चूक असल्याचे पालकांनी कबूल केले. अशी चूक भविष्यात होणार नसल्याची ग्वाही त्यांनी दिली. वाहतूक पोलिसांनी विना परवाना वाहन चालविणाºया, अल्पवयीन वाहन चालकांविरुद्ध मोटर वाहन कलम १८१ (४) आणि त्यांच्या पालकांविरुद्ध मोटार वाहन कलम १८१(५)नुसार कारवाई केली. ज्या चालकांजवळ कागदपत्र नव्हते त्यांचे वाहन ताब्यात घेण्यात आले. त्यांनी कागदपत्र सोपविल्यानंतर त्यांचे वाहन सोडून देण्यात आले.नियमांच्या पालनासाठीच मोहीमवाहतूक पोलिसांची ही मोहीम आणखी तीन दिवस चालणार आहे. वाहतूक पोलीस उपायुक्त रवींद्रसिंह परदेशी यांनी सांगितले की, विद्यार्थी आणि पालकांमध्ये वाहतूक नियमांचे पालन करण्यासाठी ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. पालक मुलांच्या जीवितास सहजतेने घेतात. ही चूक त्यांना जीवनभरासाठी महागडी ठरू शकते. अल्पवयीन मुलांनी वाहन चालविण्याचे प्रमाण वाढले आहे.घेत नाहीत धडावाहतूक विभागाने यापूर्वीही याबाबत मोहीम सुरू केली होती. कारवाईच्या काही दिवसानंतर पालक सर्वकाही विसरून जातात. मोहीम संपताच वाहतूक पोलिसही शांत होतात. यामुळे परिस्थिती जशास तशी होते. एखादा अपघात घडल्यानंतर त्याबाबत पुन्हा विचार सुरू होतो.