शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
2
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
3
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
4
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
5
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
6
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
7
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
8
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
9
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
10
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
11
"प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर भाजपा…’’ नाना पटोले यांची टीका   
12
हा घ्या पुरावा! पाकिस्तान पुसतोय 'ऑपरेशन सिंदूर'च्या खुणा; एअर बेसवरील बिल्डिंग लाल ताडपत्रीने झाकली
13
SMAT Final 2025 : पुण्याच्या मैदानात ईशान किशनचा शानदार शो! BCCI निवडकर्त्यांसोर षटकार चौकारांचा पाऊस
14
भारताकडे BRICS चे अध्यक्षपद; जागतिक भू-राजकीय तणावात महत्वाची भूमिका बजावणार
15
३१ डिसेंबरसाठी गोव्यात जाताय? कोकण रेल्वेवर विशेष सेवा; पाहा, वेळा, थांबे अन् वेळापत्रक
16
जबरदस्त फिचर्ससह OnePlus 15R भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स!
17
रुपया ९१ च्या पार! स्वयंपाकघर ते परदेशी शिक्षणासह 'या' गोष्टी महाग होणार; 'हे' कधी थांबणार?
18
Wang Kun: दारू नाही, पार्टी नाही, आहारही साधा...; तरीही प्रसिद्ध बॉडीबिल्डरचा वयाच्या ३० व्या वर्षी मृत्यू!
19
प्रज्ञा सातव यांच्या भाजपा प्रवेशावरून काँग्रेसची टीका; नेते म्हणाले, “हे स्वार्थी लोक...”
20
कार घेण्याचं स्वप्न आता होणार पूर्ण! पाहा कोणत्या बँकेत मिळतंय सर्वात स्वस्त 'कार लोन'
Daily Top 2Weekly Top 5

विनापरवाना ११०९ विद्यार्थी, पालकांवर चालान कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2017 02:03 IST

वाहतूक पोलिसांनी विना परवाना वाहन चालविणाºया अल्पवयीन विद्यार्थ्यांविरुद्ध मोहीम राबवून ३०९ वाहनांना ताब्यात घेतले आहे.

ठळक मुद्देआणखी तीन दिवस चालणार वाहतूक पोलीस विभागाची मोहीम

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वाहतूक पोलिसांनी विना परवाना वाहन चालविणाºया अल्पवयीन विद्यार्थ्यांविरुद्ध मोहीम राबवून ३०९ वाहनांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी ११०९ विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांविरुद्ध चालानची कारवाई केली आहे. तीन दिवसांपर्यंत चालणाºया या विशेष मोहिमेमुळे पालकात खळबळ उडाली आहे.पोलिसांनी पूर्वीच विना परवाना वाहन चालविणाºयांवर कारवाई करण्याची घोषणा केली होती. या मोहिमेंतर्गत वाहतूक पोलिसांनी सकाळी शाळा-महाविद्यालयांसमोर मोहीम सुरू केली. वाहतूक पोलिसांनी ८३६ विद्यार्थी आणि २७३ पालकांविरुद्ध कारवाई केली. कारवाईदरम्यान ३०९ दुचाकी वाहनांना ताब्यात घेण्यात आले. वाहतूक पोलिसांच्या कारवाईमुळे पालकांमध्ये खळबळ उडाली. पोलिसांनी विद्यार्थ्यांमार्फत पालकास बोलविले. मुलांनी कारवाई सुरू असल्याचे सांगताच पालक वाहतूक कार्यालयात पोहोचले. पोलिसांनी त्यांचे मार्गदर्शन केले. वाहन चालविण्याचा परवाना नसताना वाहन सोपविल्याबद्दल प्रश्न उपस्थित केला. यातील अनेक विद्यार्थी विना हेल्मेट वाहन चालवीत होते. अशा पद्धतीने मुलांचा जीव धोक्यात घालून वाहतूक नियमांचे उल्लंघन कितपत योग्य आहे, अशी विचारणा पालकांना करण्यात आली. बहुतांश पालकांनी आपली चूक मान्य केली. शिक्षकांनीही वाहतूक पोलिसांच्या कारवाईची आधीच माहिती दिल्याचे त्यांनी मान्य केले. त्याशिवाय मुलांना वाहन देणे ही आपली चूक असल्याचे पालकांनी कबूल केले. अशी चूक भविष्यात होणार नसल्याची ग्वाही त्यांनी दिली. वाहतूक पोलिसांनी विना परवाना वाहन चालविणाºया, अल्पवयीन वाहन चालकांविरुद्ध मोटर वाहन कलम १८१ (४) आणि त्यांच्या पालकांविरुद्ध मोटार वाहन कलम १८१(५)नुसार कारवाई केली. ज्या चालकांजवळ कागदपत्र नव्हते त्यांचे वाहन ताब्यात घेण्यात आले. त्यांनी कागदपत्र सोपविल्यानंतर त्यांचे वाहन सोडून देण्यात आले.नियमांच्या पालनासाठीच मोहीमवाहतूक पोलिसांची ही मोहीम आणखी तीन दिवस चालणार आहे. वाहतूक पोलीस उपायुक्त रवींद्रसिंह परदेशी यांनी सांगितले की, विद्यार्थी आणि पालकांमध्ये वाहतूक नियमांचे पालन करण्यासाठी ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. पालक मुलांच्या जीवितास सहजतेने घेतात. ही चूक त्यांना जीवनभरासाठी महागडी ठरू शकते. अल्पवयीन मुलांनी वाहन चालविण्याचे प्रमाण वाढले आहे.घेत नाहीत धडावाहतूक विभागाने यापूर्वीही याबाबत मोहीम सुरू केली होती. कारवाईच्या काही दिवसानंतर पालक सर्वकाही विसरून जातात. मोहीम संपताच वाहतूक पोलिसही शांत होतात. यामुळे परिस्थिती जशास तशी होते. एखादा अपघात घडल्यानंतर त्याबाबत पुन्हा विचार सुरू होतो.