शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

वाहतूक शाखेचे पोलीस करताहेत रेकॉर्डिंग

By admin | Updated: September 20, 2016 02:34 IST

शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्याची जबाबदारी सांभाळणारे पोलीस खाबुगिरीच्या आरोपांमुळे वादग्रस्त ठरत

आरोप होऊ नये म्हणून खबरदारी : वाहनचालकांनो सावधान ! नागपूर : शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्याची जबाबदारी सांभाळणारे पोलीस खाबुगिरीच्या आरोपांमुळे वादग्रस्त ठरत असल्याचे पाहून आरोप टाळण्यासाठी त्यांना आता मोबाईलने रेकॉर्डिंग करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार वाहतुकीचे नियम तोडणाऱ्या आणि नंतर पोलिसांशी वाद घालणाऱ्या वाहनचालकाची रेकॉर्डिंग केली जात आहे. या सबळ पुराव्याच्या आधारे वाहनचालकावर कडक कारवाई होऊ शकते. वाहतूक शाखेचे पोलीस कारवाईपेक्षा आरोपांमुळेच वर्षभर चर्चेत राहतात. पैसे दिले नाहीत म्हणून वाद घातला, कारवाई केली, मारहाण केली, खोटी तक्रार करून गुन्हा नोंदविला, असे हे आरोप असतात. अनेक प्रकरणात हे आरोप खरेही असतात. वाहनचालकाला थांबवल्यानंतर त्याचा खिसा हलका करण्याचाच वाहतूक शाखेच्या पोलिसांचा प्रयत्न असतो. वाहनचालकांशी सौजन्याने वागा ड्रंक न ड्राईव्हच्या बहुतांश प्रकरणात वाहनचालकासोबत पोलिसांची बाचाबाची होते. गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत चार दिवसांपूर्वी प्रकाश बारंगे नामक वाहतूक शाखेच्या हवालदारावर सूर्यकांत व्यास याने हल्ला चढवून त्यांना गंभीर जखमी केले. या प्रकरणाची सर्वत्र चर्चा झाली. पुन्हा एकदा वाहतूक शाखेच्या पोलिसांचा कारभार चर्चेला आला. तो लक्षात घेत पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी वाहतूक शाखेच्या पोलीस अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले आहे. वाहनचालकांशी वाद घालू नका, सौजन्याने वागा, असे सांगितले आहे. वाहनचालक वाद घालत असेल तर त्याचे मोबाईलने रेकॉर्डिंग करा. नंतर त्याच्यावर कायदेशीर कारवाई करता येईल असेही उपायुक्त पाटील यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता वाहतूक शाखेचे पोलीस चौकाचौकात कारवाई करतानाच मोबाईलने रेकॉर्डिंग करताना दिसत आहेत.