शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

व्यापारी त्रस्त, मात्र दहशतीत

By admin | Updated: November 19, 2016 02:36 IST

केंद्र सरकारने ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा बंद केल्यानंतर विविध बाजारपेठांमध्ये शुकशुकाट आहे.

सरकारच्या विरोधात चुप्पी : स्थिती पूर्ववत होण्यास दोन महिन्यांचा कालावधी लागणारनागपूर : केंद्र सरकारने ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा बंद केल्यानंतर विविध बाजारपेठांमध्ये शुकशुकाट आहे. छोट्या नोटा चलनात नाहीत. ग्राहकांनी बाजाराकडे पाठ फिरविली असून ते केवळ जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करीत आहेत. सर्वच बाजारात व्यवसाय ३० टक्क्यांपर्यंत घसरला असून पुरवठ्याअभावी वस्तूंचे भाव वधारले आहेत. व्याजाने घेतलेल्या पैसा परतीची व्यावसायिकांना चिंता आहे. दुकानदारांनी माल खरेदी केला आहे, पण विक्री नसल्यामुळे तो पडून आहे. व्यवसायाची साखळी खंडित झाल्यामुळे व्यापारी चिंताग्रस्त असून चक्रव्यूहात सापडला आहे. विविध बाजारपेठांमध्ये व्यापारी त्रस्त आणि दहशतीत आहे. छोट्या नोटा चलनात आल्यानंतरही बाजारातील मंदी दूर होण्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी लागेल. किराणा, खाद्यतेल, धान्य बाजारातील व्यावसायिकांनी ग्राहकांच्या सोयीसाठी डेबिट कार्डच्या माध्यमातून विक्री करण्यासाठी ‘टेलर मशीन’चा अवलंब करण्याचा निर्णय घेतल्याची प्रतिक्रिया विविध बाजारपेठांच्या असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. नवीन खरेदी बंदनवीन नोटा चलनात अजूनही न आल्यामुळे बाजारात मंदीचे वातावरण आहे. दुकानदारांकडे माल पडून आहे. नवीन खरेदी बंद आहे. राजस्थान, मध्यप्रदेश, गुजरात येथील कृषी बाजारपेठा बंद आहेत. शेतकऱ्यांनी रोखीची मागणी केल्याने कृषी मालाची विक्री बंद आहे. कामगार आणि मजुरांना काम नाही. सर्वाधिक त्रास त्यांना होत आहे. जुन्या व्यापाऱ्यांनी रोख आणि धनादेशाने व्यवहार केला आहे. पण आता नवीन पिढीने डेबिट कार्डद्वारे व्यवहार करण्यासाठी ‘टेलर मशीन’ खरेदीसाठी बँकेकडे धाव घेतली आहे. परिस्थिती लवकरच सुरळीत होईल, अशी अपेक्षा मसाले बाजारातील व्यावसायिक चंदन गोस्वामी यांनी व्यक्त केली. खाद्यतेल बाजारात मंदी५०० आणि १००० रुपयांच्या नोटा बंद केल्यामुळे इतवारीतील खाद्यतेल बाजारपेठेत मंदी आहे. व्यवसायात ३० टक्क्यांपर्यंत घसरण झाली आहे. लग्नाचा हंगाम आहे, पण विक्री अत्यल्प आहे. कोणत्याही दुकानदारांची सरकारच्या विरोधात बोलण्याची हिंमत नाही. शिवाय आयकर खात्याची भीती आहे. नागरिक त्रस्त आहेत, पण भविष्य चांगले आहे. ८० टक्के व्यवसाय रोखीने होतो. पण आता नोट मोजण्याची आणि ‘टेलर मशीन’ लावण्याची गरज पडली आहे. पुढे या मशीनद्वारे कॅशलेस व्यवहार होणार आहे. त्यामुळे व्यवसायात पारदर्शकता येईल, अशी प्रतिक्रिया इतवारीतील खाद्यतेल विक्रेते अनिलकुमार अग्रवाल यांनी दिली.