शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

व्यापारी त्रस्त, मात्र दहशतीत

By admin | Updated: November 19, 2016 02:36 IST

केंद्र सरकारने ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा बंद केल्यानंतर विविध बाजारपेठांमध्ये शुकशुकाट आहे.

सरकारच्या विरोधात चुप्पी : स्थिती पूर्ववत होण्यास दोन महिन्यांचा कालावधी लागणारनागपूर : केंद्र सरकारने ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा बंद केल्यानंतर विविध बाजारपेठांमध्ये शुकशुकाट आहे. छोट्या नोटा चलनात नाहीत. ग्राहकांनी बाजाराकडे पाठ फिरविली असून ते केवळ जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करीत आहेत. सर्वच बाजारात व्यवसाय ३० टक्क्यांपर्यंत घसरला असून पुरवठ्याअभावी वस्तूंचे भाव वधारले आहेत. व्याजाने घेतलेल्या पैसा परतीची व्यावसायिकांना चिंता आहे. दुकानदारांनी माल खरेदी केला आहे, पण विक्री नसल्यामुळे तो पडून आहे. व्यवसायाची साखळी खंडित झाल्यामुळे व्यापारी चिंताग्रस्त असून चक्रव्यूहात सापडला आहे. विविध बाजारपेठांमध्ये व्यापारी त्रस्त आणि दहशतीत आहे. छोट्या नोटा चलनात आल्यानंतरही बाजारातील मंदी दूर होण्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी लागेल. किराणा, खाद्यतेल, धान्य बाजारातील व्यावसायिकांनी ग्राहकांच्या सोयीसाठी डेबिट कार्डच्या माध्यमातून विक्री करण्यासाठी ‘टेलर मशीन’चा अवलंब करण्याचा निर्णय घेतल्याची प्रतिक्रिया विविध बाजारपेठांच्या असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. नवीन खरेदी बंदनवीन नोटा चलनात अजूनही न आल्यामुळे बाजारात मंदीचे वातावरण आहे. दुकानदारांकडे माल पडून आहे. नवीन खरेदी बंद आहे. राजस्थान, मध्यप्रदेश, गुजरात येथील कृषी बाजारपेठा बंद आहेत. शेतकऱ्यांनी रोखीची मागणी केल्याने कृषी मालाची विक्री बंद आहे. कामगार आणि मजुरांना काम नाही. सर्वाधिक त्रास त्यांना होत आहे. जुन्या व्यापाऱ्यांनी रोख आणि धनादेशाने व्यवहार केला आहे. पण आता नवीन पिढीने डेबिट कार्डद्वारे व्यवहार करण्यासाठी ‘टेलर मशीन’ खरेदीसाठी बँकेकडे धाव घेतली आहे. परिस्थिती लवकरच सुरळीत होईल, अशी अपेक्षा मसाले बाजारातील व्यावसायिक चंदन गोस्वामी यांनी व्यक्त केली. खाद्यतेल बाजारात मंदी५०० आणि १००० रुपयांच्या नोटा बंद केल्यामुळे इतवारीतील खाद्यतेल बाजारपेठेत मंदी आहे. व्यवसायात ३० टक्क्यांपर्यंत घसरण झाली आहे. लग्नाचा हंगाम आहे, पण विक्री अत्यल्प आहे. कोणत्याही दुकानदारांची सरकारच्या विरोधात बोलण्याची हिंमत नाही. शिवाय आयकर खात्याची भीती आहे. नागरिक त्रस्त आहेत, पण भविष्य चांगले आहे. ८० टक्के व्यवसाय रोखीने होतो. पण आता नोट मोजण्याची आणि ‘टेलर मशीन’ लावण्याची गरज पडली आहे. पुढे या मशीनद्वारे कॅशलेस व्यवहार होणार आहे. त्यामुळे व्यवसायात पारदर्शकता येईल, अशी प्रतिक्रिया इतवारीतील खाद्यतेल विक्रेते अनिलकुमार अग्रवाल यांनी दिली.