शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

मनपाच्या मनमानी विरोधात बुधवारी व्यापाऱ्यांचा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2020 23:57 IST

महापालिका प्रशासनाच्या मनमानीमुळे त्रस्त झालेल्या व्यापाऱ्यांची सहनशीलता आता संपली आहे. पहिले लॉकडाऊन नंतर अनलॉकमुळे व्यापारी प्रभावित झाला आहे. आर्थिक संकटाशी झुंज देत असलेल्या व्यापाऱ्यांवर मनपा प्रशासनाद्वारे दररोज नवनवीन आदेश लादले जात आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांनी मनपाच्या विरोधात १९ ऑगस्ट रोजी सांकेतिक आंदोलनाचा इशारा दिला आहे.

ठळक मुद्दे आर्थिक संकटात असताना, दररोज नवीन आदेशाचा बोजा सहन करणार नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिका प्रशासनाच्या मनमानीमुळे त्रस्त झालेल्या व्यापाऱ्यांची सहनशीलता आता संपली आहे. पहिले लॉकडाऊन नंतर अनलॉकमुळे व्यापारी प्रभावित झाला आहे. आर्थिक संकटाशी झुंज देत असलेल्या व्यापाऱ्यांवर मनपा प्रशासनाद्वारे दररोज नवनवीन आदेश लादले जात आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांनी मनपाच्या विरोधात १९ ऑगस्ट रोजी सांकेतिक आंदोलनाचा इशारा दिला आहे.यासंदर्भात सोमवारी विदर्भातील १३ लाख व्यापाऱ्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स (एनव्हीसीसी) व नागपूर शहरातील व्यापाऱ्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नागपूर चेंबर ऑफ कॉमर्स लि. (एनसीसीएल) ने आपापल्या कार्यालयात आपात्कालीन बैठक बोलाविली. बैठकीला शहरातील वेगवेगळ्या व्यापारी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत दोन्ही व्यापारी संस्थांनी १९ ऑगस्ट रोजी नागपूर बंदची घोषणा केली. बंदचा उद्देश पालकमंत्री, मनपा प्रशासन, महापौर, सत्तापक्ष व विरोधी पक्ष नेत्यांचे व्यापाऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष वेधून, त्या मंजूर करण्यासाठी दबाव बनविण्याचा प्रयत्न आहे. एनव्हीसीसीचे अध्यक्ष अश्विन मेहाडिया व एनसीसीएलचे अध्यक्ष विष्णूकुमार पचेरीवाला लोकमतशी बोलताना म्हणाले की, लॉकडाऊन व अनलॉकमध्ये शहरातील व्यापाऱ्यांची आर्थिक अवस्था कमकुवत झाली आहे. अशातही प्रशासनाला कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी सहकार्य करीत आहोत. तरीही मनपा प्रशासन दररोज नवीन आदेश व्यापाऱ्यांवर लादत आहे.इतर शहरांमध्ये ऑड-ईव्हन डे पॅटर्नने बाजार सुरू करण्याचे आदेश निरस्त झाले आहेत. पण नागपुरात कायम आहे. त्याचबरोबर मनपा आयुक्तांनी शहरात व्यापार करण्यासाठी ट्रेड लायसन्स घेण्याचा आदेश जाही केला आहे. यामुळे इन्स्पेक्टर राज वाढेल व व्यापाऱ्यांवर आर्थिक बोजा पडणार आहे. त्याचबरोबर व्यापारी व त्यांच्या कर्मचाऱ्यांची कोरोना टेस्ट अनिवार्य करण्याच्या आदेशामुळे अडचणी वाढणार आहे. आर्थिक संकटामुळे त्रस्त झालेला व्यापारी दररोज नवीन आदेशाचा बोज सहन करणार नाही, असा इशारा आंदोलनातून देण्यात येणार आहे. आदेश रद्द करून व्यापाऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी व्यापाऱ्यांची आहे.महापौर व पालकमंत्र्यांना दिले निवेदनएनव्हीसीसीच्या प्रतिनिधी मंडळाने सोमवारी पालकमंत्री नितीन राऊत यांची भेट घेऊन त्यांना आपल्या मागण्यासंदर्भात निवेदन सादर केले. सोबतच आयुक्तांनी ट्रेड लायसन्स आदेश रद्द करण्याची विनंती केली. तर एनव्हीसीसी व एनसीसीएलच्या शिष्टमंडळाने महापौर संदीप जोशी यांची भेट घेऊन मनपाच्या सभेत व्यापाऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष वेधावे, अशी विनंती केली.काय आहेत मुख्य मागण्याशहरात ऑड-ईव्हन डे पॅटर्न बंद करावा.मनपा आयुक्तांनी काढलेला ट्रेड लायसन्सचा आदेश रद्द करावा.व्यापाऱ्यांच्या कोरोना टेस्टचा आदेश मागे घ्यावा.

टॅग्स :Strikeसंपbusinessव्यवसाय