शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
3
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
4
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
5
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
6
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
7
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
8
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
9
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
11
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
12
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
13
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
14
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
15
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
16
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
17
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
18
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
19
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
20
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
Daily Top 2Weekly Top 5

संरक्षित जंगलात पर्यटन निवास

By admin | Updated: March 21, 2017 02:02 IST

सामान्य व्यक्तीला वन संरक्षण आणि संवर्धनाचे डोज पाजणारा वन विभाग स्वत:च पर्यटनाच्या नावाखाली वन संवर्धन कायद्याच्या चिंधड्या उडवत ...

झाडांची कत्तल : वन संरक्षण कायद्याचे उल्लंघन जीवन रामावत नागपूरसामान्य व्यक्तीला वन संरक्षण आणि संवर्धनाचे डोज पाजणारा वन विभाग स्वत:च पर्यटनाच्या नावाखाली वन संवर्धन कायद्याच्या चिंधड्या उडवत संरक्षित जंगल उद्ध्वस्त करायला निघाल्याचे चित्र नागपूर वन विभागात दिसून येत आहे. एखाद्या सामान्य व्यक्तीने जंगलातील एक काडी जरी तोडली, तरी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला जातो. त्याला कारागृहात पाठविल्या जाते. मात्र त्याच वन विभागातील काही वन अधिकाऱ्यांनी पर्यटनातून आपली तिजोरी भरण्याच्या मोहापोटी चक्क संरक्षित जंगलातील शेकडो झाडांची कत्तल करून, विनापरवानगी पर्यटन निवास उभारल्याची घटना नागपूरपासून काहीच अंतरावर असलेल्या हिंगणा वन परिक्षेत्रातील अडेगाव येथे पुढे आली आहे. उद्या २१ मार्च रोजी वन विभाग ‘जागतिक वन दिन’ साजरा करून, पुन्हा एकदा समाजाला वन संवर्धन आणि संरक्षणाचे डोज पाजणार आहे. मात्र त्याचवेळी पर्यटनाच्या नावाखाली जंगलाची सुरू असलेली ही कत्तल कधी थांबणार, याचेही उत्तर वन विभागाला द्यावे लागणार आहे. पेंच व्याघ्र प्रकल्प कार्यालयाने मागील काही वर्षांत जंगल पर्यटनाचा जोरदार सपाटा सुरू केला आहे. यातच वर्षभरापूर्वी बोर व्याघ्र प्रकल्पातील जंगल सफारीसाठी अडेगाव येथे नवीन गेट सुरू करण्यात आले आहे. शिवाय या गेटपासून काहीच अंतरावर नागपूर प्रादेशिक विभागाच्या संरक्षित जंगलात पक्के बांधकाम करून पर्यटन निवास उभारले आहे. हा पराक्रम नागपूर वन्यजीव विभागातील काही वरिष्ठ वन अधिकाऱ्यांनी केवळ हट्टापोटी केला असल्याचे बोलले जात आहे. यासाठी पेंच व्याघ्र प्रकल्प कार्यालयाने गत वर्षभरापूर्वी अडेगाव येथील नागपूर प्रादेशिक विभागाच्या अधिकार क्षेत्रातील कम्पार्टमेंट क्र. १५१ हा आपल्या ताब्यात घेउन, तेथे विनापरवानगी पर्यटन निवास उभारले आहे. जाणकारांच्या मते, संरक्षित जंगलात अशाप्रकारे कोणतेही वनेतर बांधकाम करता येत नाही. त्यासाठी रीतसर केंद्र शासनाची परवानगी घ्यावी लागते. अन्यथा ते वन संरक्षण कायदा १९८० चे उल्लंघन ठरते. मात्र पेंच कार्यालयाने वन संरक्षण कायदाच गुंडाळून ठेवल्याचे दिसून येत आहे. येथील संरक्षित जंगलात पर्यटकांना राहण्यासाठी पक्क्या बांधकामासह पाच राहुट्या बांधण्यात आल्या आहेत. तसेच संपूर्ण परिसराला तारेचे कुंपण करून, तिकीट केंद्र आणि दोन अन्य इमारतींचे बांधकाम केले आहे. मात्र आता पेंच कार्यालयातील काही अधिकाऱ्यांचा तो हट्ट वन विभागासाठी अडचणीचा ठरला आहे. या संबंधी पेंच व्याघ्र प्रकल्प कार्यालयाची बाजू ऐकून घेण्यासाठी येथील विभागीय वन अधिकारी एस. बी. भलावी यांच्याशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी नेहमीप्रमाणे फोन न उचलता कोणताही प्रतिसाद दिला नाही. कायदा काय म्हणतो देशातील सर्व जंगलांचे संरक्षण आणि संवर्धनासाठी १९८० मध्ये वन संवर्धन कायदा तयार करण्यात आला. या कायद्यानुसार जंगलात कोणत्याही स्थितीत वनेतर कामे करू नयेत, असे स्पष्ट करण्यात आले आहे. जर एखादे काम करणे अतिआवश्यक असल्यास त्याला केंद्र शासनाची रीतसर परवानगी घेण्यात यावी. अन्यथा ते काम वन संवर्धन कायद्याचे उल्लंघन ठरेल आणि त्यासाठी जबाबदार अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई केली जाईल, असे सांगितले आहे. असे असताना या कायद्याची अंमलबजावणी करण्याची धुरा असलेले वन अधिकारीच त्याची पायमल्ली करीत असेल, तर देशातील जंगल कसे सुरक्षित राहणार असा यानिमित्ताने प्रश्न निर्माण झाला आहे.