शहरं
Join us  
Trending Stories
1
...अन्यथा महाराष्ट्रात निवडणुका होऊ देणार नाही; मनोज जरांगेंनी सरकारविरोधात पुन्हा थोपटले दंड, कोणत्या मागण्या केल्या?
2
Manoj Jarange Patil : "मी थोड्या दिवसांचा पाहुणा..."; मनोज जरांगे पाटील यांना अश्रू अनावर, मराठ्यांना भावनिक साद
3
Zubeen Garg : स्कूबा डायव्हिंगमुळे नाही तर.... कसा झाला सिंगर झुबीन गर्गचा मृत्यू? आता मोठा खुलासा
4
बिल्सेरी, किनले, अक्वाफिनाला आता टक्कर देणार मुकेश अंबानी; ₹३०००० कोटींच्या व्यवसायात एन्ट्रीच्या तयारीत 
5
रशियाने मोठा धोका दिला? भारताच्या विनंतीकडे दुर्लक्ष करत पाकिस्तानला फायटर जेटचं इंजिन देण्याचा निर्णय घेतला; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
6
Viral Video: अशा मित्रांपासून सावध राहिलेलं बरं; एकदा 'हा' व्हिडीओ बघाच!
7
"गोपीनाथ मुंडेंनी मराठा आरक्षणाला विरोध केला नाही, पण..."; पंकजा मुंडे दसरा मेळाव्यात स्पष्टच बोलल्या
8
दसरा मेळाव्यात भाषण सुरू असतानाच पंकजा मुंडे कार्यकर्त्यांवर संतापल्या, म्हणाल्या पोरांनो तुम्ही...  
9
“भारत खरोखरच स्वतंत्र आहे का?”; गीतांजली वांगचूक यांचा सवाल, केंद्रीय गृहमंत्रालयावर टीका
10
Goldman Sachs चे 'हे' ४ शेअर्स बनले सुपरस्टार; एका वर्षात १५५ टक्क्यांपर्यंतची तेजी, तुम्ही घेतलाय का?
11
 ...मग पोलिसांची हत्या करावी लागली तरी हरकत नाही, समोर आला तौकीर रजाचा भयानक डाव
12
'आग तो लगी थी घर में...."; धनंजय मुंडेंनी शायरीतून भावना व्यक्त केली, मंत्रिपदाबाबत खंतही बोलून दाखवली
13
२ घास कमी खा पण स्वाभिमानाने राहा, कुणाचे तुकडे उचलू नका; पंकजा मुंडेंचं मेळाव्यात आवाहन
14
कराड आमचे दैवत...; पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यात झळकले वाल्मिक कराडचे पोस्टर
15
Gold Silver Price: सोन्या-चांदीच्या दरात विक्रमी वाढ; गुंतवणूकदारांनी मात्र टाळाव्यात 'या' ५ चुका
16
"खोटे धंदे करू नका, गुंड पाळू नका, काही गरज नाही", पंकजा मुंडे भगवान गडावर काय बोलल्या?
17
Jasprit Bumrah: जसप्रीत बुमराहचा मोठा पराक्रम, घरच्या मैदानावर 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
18
Gensol Engineering Ltd: ₹२४०० वरुन ₹४१ वर आला 'हा' शेअर, आता ट्रेडिंग झालं बंद; संकटात कंपनी, तुमच्याकडे आहे का शेअर?
19
७५ वर्षांचा नवरा अन् ३५ वर्षांची नवरी! लग्नाच्या रात्रीच पतीचा मृत्यू; गूढ उलगडलं, समोर आलं सत्य
20
१९ वर्षे शनि, १८ वर्षे राहु महादशा: शनि महादशेत राहु अंतर्दशा आली? भाग्योदय; अपार पैसा-लाभ!

मरणानंरही यातना संपेनात, घाटावरही वेटिंग!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : जिल्ह्यात दररोज ८० ते ९० कोविड रुग्णांचा मृत्यू होत आहे. शहरात ४० ते ५० ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : जिल्ह्यात दररोज ८० ते ९० कोविड रुग्णांचा मृत्यू होत आहे. शहरात ४० ते ५० मृत्यू होत आहेत. त्यात अन्य आजारांनी, वृद्धावस्थेमुळे होणारे मृत्यू विचारात घेता दररोज १५० ते २०० मृत्यू होत आहेत. शहरात १६ घाट आहेत. यातील काही प्रमुख घाटावर दररोज ४५ ते ५० मृतदेह अंतिम संस्कारासाठी येत आहेत. घाटावर अंत्यसंस्कारासाठी ओटे मिळत नसल्याने ओट्याखाली अंतिम संस्कार करावे लागत आहेत. घाटावरील चित्र मन हेलावणारे आहे.

शहरातील गंगाबाई, अंबाझरी, मानेवाडा, मोक्षधाम अशा प्रमुख घाटांवर प्रत्येकी ४५ ते ५० अंत्यसंस्कार केले जात आहेत. कोविड रुग्णावर अंत्यसंस्कार करणारे कर्मचारी सकाळपासून रात्रीपर्यंत व्यस्त असतात. त्यात कोविडमुळे मृत्यू झालेल्या रुग्णांना अंत्यसंस्कारासाठी आणावे लागते. महापालिकेच्या १६ शववाहिका व खासगी १० शववाहिका आहेत. या कमी पडत असल्याने मृतदेहाचे वेटिंग सुरू आहे. मृतकांच्या नातेवाइकांना शववाहिकेची प्रतीक्षा करावी लागते. नाइलाजाने अ‍ॅम्ब्युलन्समधून मृतदेह घाटावर आणला तरी कोविडमुळे मृत्यू झाला असल्यास अंत्यसंस्कार करणाऱ्यांना बाधा होण्याचा धोका आहे.

.......

गृह विलगीकरणातील मृतकांना प्रतीक्षा

शासकीय व खासगी रुग्णालयात बेड मिळत नसल्याने गृह विलगीकरणात शहरात ५० हजारांहून अधिक कोविड रुग्ण आहेत. गृह विलगीकरणात असताना उपचाराअभावी अनेकांचे बळी जात आहेत. अशा मृतकांवर अंत्यसंस्कार करताना कुटुंबीयांना संकटाचा सामना करावा लागत आहे. शववाहिकेसाठी मनपाच्या वॉररूमला फोन केल्यानंतर तीन ते चार तासांनी शववाहिका येते. तोपर्यंत कोविड रुग्णाचा मृतदेह घरात पडून असतो.

...

लाकडाचा साठा मोजकाच

महिनाभरापासून मृतकांची संख्या दररोज वाढत असल्याने घाटावर अंत्यसंस्कारासाठी लाकडे उपलब्ध करताना मनपाच्या आरोग्य विभागाला चांगलीच कसरत करावी लागत आहे. महिनाभर पुरणारे लाकूड आठडाभरात संपत आहे. सध्या काही घाटांवर दोन-तीन दिवस पुरेल इतकाच लाकडाचा साठा आहे. खबरदारी म्हणून आधीच लाकूड मागविण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

...

तातडीने ओटे उभारावे

शहरातील मृतकांचा आकडा विचारात घेता व कोविड संकट पुन्हा किती दिवस राहील, याची शाश्वती नसल्याने शरातील घाटावर मनपा प्रशासनाने नवीन ओटे बांधण्याची गरज आहे. तसेच नादुरुस्त ओटे दुरुस्त करण्यासाठी युद्धपातळीवर काम करण्याची गरज आहे.