शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

फारच वाईट ! मजुराच्या लहानग्या मुलाने रस्त्यातच सोडला प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2020 09:33 IST

चार वर्षाच्या लहानग्या मुलाला प्रवासाचा शीण आणि तळपते ऊन असह्य झाले. रस्त्यातच तो कासावीस झाला. त्याच्या आईवडिलांनी रस्त्यावरून धावणाऱ्या वाहनांना मदत मागितली. पण सर्वांनीच अव्हेरले. अखेर बाळाने आईच्या कुशीतच प्राण सोडला.

गोपालकृष्ण मांडवकरलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : हैदराबाद ते बालाघाट अशा पायी प्रवासाला कामगारांचे ‘ते’ कुटुंब निघाले. मात्र चार वर्षाच्या लहानग्या मुलाला प्रवासाचा शीण आणि तळपते ऊन असह्य झाले. रस्त्यातच तो कासावीस झाला. त्याच्या आईवडिलांनी रस्त्यावरून धावणाऱ्या वाहनांना मदत मागितली. पण सर्वांनीच अव्हेरले. अखेर बाळाने आईच्या कुशीतच प्राण सोडला. आईने हंबरडा फोडला. मात्र आसवे पुसायला जवळ ना आप्तेष्ट होते; ना कुणी हितचिंतक... अखेर अश्रूंना बांध घालून त्यांनी नदीकाठावर खड्डा केला आणि बाळाला मूठमाती देऊन पुढचा रस्ता धरला.ही घटना आहे यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा तालुक्यातील पिंपळखुटी ते पाटणबोरी या मार्गादरम्यानची. सुमारे आठवडाभरापूर्वीची ही घटना नागपूरमार्गे पोहचलेल्या कामगारांच्या माध्यमातून चर्चेला आली. ‘लोकमत’ प्रतिनिधीच्या कानावर हा प्रकार पडल्यावर या घटनेची पुष्टी करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते नितीन सरदार यांच्या माध्यमातून पाटणबोरी येथील एका स्वयंसेवकाशी संपर्क साधला, अन् हा प्रकार उजेडात आला.या कामगार कुटुंबामध्ये तीन लहान मुले, पत्नी, पती आणि अन्य दोन कामगार कुटुंब होते. हैदराबादला ते मजुरीच्या कामावर होते. लॉकडाऊनमुळे काम बंद पडल्याने आणि कसलेही वाहन नसल्याने ते महाराष्ट्र-आंध्र प्रदेशच्या सीमेवरील पिंपळखुटी ते पाटणबोरीदरम्यानच्या रेल्वे लाईनवरून पायी निघाले होते. डोक्यावर सामानाचे गाठोडे, कधी पायी तर कधी आईवडिलांच्या खांद्यावर बसून चालणारी लहान मुले, हातात पिशव्या असा त्यांचा प्रवास सुरू होता. मात्र उन्हामुळे या कुटुंबातील एका चार वर्षाच्या मुलाची पायी प्रवासात प्रकृती बिघडली. तो अस्वस्थ झाला. बेशुद्ध पडला. त्याची ही अवस्था बघून त्यांनी रेल्वे क्रॉसिंगवरील हायवेवर येऊन वाहनाची मदत मागितली. मात्र कसलीही मदत मिळाली नाही. अखेर बाळाने प्राण सोडला. अनोळखी प्रदेशात बाळाचा जीव गेल्याचे पाहून या सर्वांनीच हंबरडा फोडला. त्याच्या आईची अवस्था तर केविलवाणी झाली होती. अखेर त्याचे पे्रत घेऊन ते याच परिसरातील नदीच्या काठावर पोहचले. एकमेकांचे अश्रू पुसून त्यांनी धीर दिला. तिथे खड्डा करून बाळाला माती दिली.यानंतर हे कुटुंब पाटणबोरी येथील एका कॅम्पवर अन्न घेण्यासाठी आले. तिथे स्वयंसेवकांनी या कुटुंबाशी बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रचंड दु:खावेगात असलेल्या त्या कुटुंबाशी आणि दुर्दैवी मातेशी कसलाही संवाद घडू शकला नाही. अतीव दु:खामुळे या कुटुंबातील कुणी जेवणही करू शकले नाही. काही वेळ थांबून ते पुन्हा करंजीकडे दोन लहान मुले आणि आपल्या सामानासह पायीच निघाले.अन् शोकांतिका प्रकाशात आलीया कामगार कुटुंबाचा संपर्क क्रमांक, नाव, पत्ता अशी कोणतीही माहिती उपलब्ध नसल्याने ही घटना फारशी चर्चेत आली नाही. मात्र नागपुरात पोहचलेल्या काही मजुरांच्या माध्यमातून जामठाजवळ समाजसेवी संस्थेकडून अन्नछत्र चालविणाºया कॅम्पवर ही चर्चा कानावर आली. तो धागा पकडून पाटणबोरी येथील एका स्वयंसेवकाशी सदर प्रतिनिधीने संपर्क साधला असता या घटनेची पुष्टी झाली. त्यामुळेच काळाच्या उदरात गडप होऊ पाहणारी ही एक शोकांतिका प्रकाशात आली. 

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस