शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

फारच वाईट ! मजुराच्या लहानग्या मुलाने रस्त्यातच सोडला प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2020 09:33 IST

चार वर्षाच्या लहानग्या मुलाला प्रवासाचा शीण आणि तळपते ऊन असह्य झाले. रस्त्यातच तो कासावीस झाला. त्याच्या आईवडिलांनी रस्त्यावरून धावणाऱ्या वाहनांना मदत मागितली. पण सर्वांनीच अव्हेरले. अखेर बाळाने आईच्या कुशीतच प्राण सोडला.

गोपालकृष्ण मांडवकरलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : हैदराबाद ते बालाघाट अशा पायी प्रवासाला कामगारांचे ‘ते’ कुटुंब निघाले. मात्र चार वर्षाच्या लहानग्या मुलाला प्रवासाचा शीण आणि तळपते ऊन असह्य झाले. रस्त्यातच तो कासावीस झाला. त्याच्या आईवडिलांनी रस्त्यावरून धावणाऱ्या वाहनांना मदत मागितली. पण सर्वांनीच अव्हेरले. अखेर बाळाने आईच्या कुशीतच प्राण सोडला. आईने हंबरडा फोडला. मात्र आसवे पुसायला जवळ ना आप्तेष्ट होते; ना कुणी हितचिंतक... अखेर अश्रूंना बांध घालून त्यांनी नदीकाठावर खड्डा केला आणि बाळाला मूठमाती देऊन पुढचा रस्ता धरला.ही घटना आहे यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा तालुक्यातील पिंपळखुटी ते पाटणबोरी या मार्गादरम्यानची. सुमारे आठवडाभरापूर्वीची ही घटना नागपूरमार्गे पोहचलेल्या कामगारांच्या माध्यमातून चर्चेला आली. ‘लोकमत’ प्रतिनिधीच्या कानावर हा प्रकार पडल्यावर या घटनेची पुष्टी करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते नितीन सरदार यांच्या माध्यमातून पाटणबोरी येथील एका स्वयंसेवकाशी संपर्क साधला, अन् हा प्रकार उजेडात आला.या कामगार कुटुंबामध्ये तीन लहान मुले, पत्नी, पती आणि अन्य दोन कामगार कुटुंब होते. हैदराबादला ते मजुरीच्या कामावर होते. लॉकडाऊनमुळे काम बंद पडल्याने आणि कसलेही वाहन नसल्याने ते महाराष्ट्र-आंध्र प्रदेशच्या सीमेवरील पिंपळखुटी ते पाटणबोरीदरम्यानच्या रेल्वे लाईनवरून पायी निघाले होते. डोक्यावर सामानाचे गाठोडे, कधी पायी तर कधी आईवडिलांच्या खांद्यावर बसून चालणारी लहान मुले, हातात पिशव्या असा त्यांचा प्रवास सुरू होता. मात्र उन्हामुळे या कुटुंबातील एका चार वर्षाच्या मुलाची पायी प्रवासात प्रकृती बिघडली. तो अस्वस्थ झाला. बेशुद्ध पडला. त्याची ही अवस्था बघून त्यांनी रेल्वे क्रॉसिंगवरील हायवेवर येऊन वाहनाची मदत मागितली. मात्र कसलीही मदत मिळाली नाही. अखेर बाळाने प्राण सोडला. अनोळखी प्रदेशात बाळाचा जीव गेल्याचे पाहून या सर्वांनीच हंबरडा फोडला. त्याच्या आईची अवस्था तर केविलवाणी झाली होती. अखेर त्याचे पे्रत घेऊन ते याच परिसरातील नदीच्या काठावर पोहचले. एकमेकांचे अश्रू पुसून त्यांनी धीर दिला. तिथे खड्डा करून बाळाला माती दिली.यानंतर हे कुटुंब पाटणबोरी येथील एका कॅम्पवर अन्न घेण्यासाठी आले. तिथे स्वयंसेवकांनी या कुटुंबाशी बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रचंड दु:खावेगात असलेल्या त्या कुटुंबाशी आणि दुर्दैवी मातेशी कसलाही संवाद घडू शकला नाही. अतीव दु:खामुळे या कुटुंबातील कुणी जेवणही करू शकले नाही. काही वेळ थांबून ते पुन्हा करंजीकडे दोन लहान मुले आणि आपल्या सामानासह पायीच निघाले.अन् शोकांतिका प्रकाशात आलीया कामगार कुटुंबाचा संपर्क क्रमांक, नाव, पत्ता अशी कोणतीही माहिती उपलब्ध नसल्याने ही घटना फारशी चर्चेत आली नाही. मात्र नागपुरात पोहचलेल्या काही मजुरांच्या माध्यमातून जामठाजवळ समाजसेवी संस्थेकडून अन्नछत्र चालविणाºया कॅम्पवर ही चर्चा कानावर आली. तो धागा पकडून पाटणबोरी येथील एका स्वयंसेवकाशी सदर प्रतिनिधीने संपर्क साधला असता या घटनेची पुष्टी झाली. त्यामुळेच काळाच्या उदरात गडप होऊ पाहणारी ही एक शोकांतिका प्रकाशात आली. 

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस