शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

नागपूर विद्यापीठ प्राधिकरणांतील सूर : राज्यपालांनी घ्यावा परीक्षांबाबत निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2020 19:08 IST

अंतिम वर्षाच्या परीक्षा न घेण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयासंदर्भात शिक्षण वर्तुळातून विविध प्रतिक्रिया येत आहेत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील प्राधिकरण सदस्यांनी या निर्णयावर आश्चर्य व्यक्त केले आहे. परीक्षांचा निर्णय हा कुलपती म्हणजेच राज्यपालांचा आहे. अंतिम वर्षाच्या परीक्षा होणे हे विद्यार्थ्यांच्या हिताचे आहे. त्यामुळे राज्यपालांनी परीक्षांबाबत निर्णय घ्यावा, असे मत विद्यापीठाच्या व्यवस्थापन व विधिसभा सदस्यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांचा निर्णय विद्यार्थ्यांना संभ्रमात टाकणारा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अंतिम वर्षाच्या परीक्षा न घेण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयासंदर्भात शिक्षण वर्तुळातून विविध प्रतिक्रिया येत आहेत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील प्राधिकरण सदस्यांनी या निर्णयावर आश्चर्य व्यक्त केले आहे. परीक्षांचा निर्णय हा कुलपती म्हणजेच राज्यपालांचा आहे. अंतिम वर्षाच्या परीक्षा होणे हे विद्यार्थ्यांच्या हिताचे आहे. त्यामुळे राज्यपालांनी परीक्षांबाबत निर्णय घ्यावा, असे मत विद्यापीठाच्या व्यवस्थापन व विधिसभा सदस्यांनी व्यक्त केले.व्यवस्थापन परिषद सदस्य विष्णू चांगदे यांनी राज्यपालांना पत्र लिहिले आहे. विद्यापीठाची व उच्चशिक्षणाची गुणवत्ता परीक्षेवर बऱ्याच अंशी अवलंबून असते. विद्यापीठ कायदा-२०१६ नुसार परीक्षांबाबतचा निर्णय घेण्याचे अधिकार कुलगुरू व कुलपतींना आहेत. अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना अगोदरच्या गुणांवर आधारित सरासरी गुण देण्यात येतील. तसेच ज्यांना श्रेणीमध्ये सुधारणा करायची आहे त्यांना पुढील सत्रात परीक्षा देता येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. म्हणजे काही विद्यार्थ्यांना श्रेणी व काहींना गुण मिळतील. एकाच अभ्यासक्रमातील दोन उत्तीर्ण विद्यार्थ्यांकडे वेगवेगळ्या गुणपत्रिका असतील. एकाकडे गुणांवर आधारित तर दुसऱ्याकडे श्रेणीआधारित गुणपत्रिका असेल. विद्यार्थ्यांना उच्चशिक्षण व रोजगाराच्या ठिकाणी समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. हा निर्णय म्हणजे विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळण्याचा प्रकार आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका पोहोचणार नाही अशा पद्धतीने परीक्षा घेण्यासंदर्भात राज्यपालांनी निर्णय घ्यावा, अशी मागणी विष्णू चांगदे यांनी केली आहे.उशिरा घ्या, पण परीक्षा होऊ द्याव्यवस्थापन परिषद सदस्य दिनेश शेराम यांनीदेखील राज्यपालांना पत्र पाठविले आहे. स्थिती नियंत्रणात आल्यानंतर परीक्षा घेतली पाहिजे. विद्यापीठ अनुदान आयोगाने सुचविलेल्या विविध पर्यायांचा वापर करत परीक्षा होऊ शकतात. राज्यपालांनी शिक्षणतज्ज्ञांची चर्चा करून अंतिम निर्णय घ्यावा, अशी मागणी शेराम यांनी केली आहे.सर्वांना सोबत घेऊन निर्णय व्हावाअंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा हा महत्त्वाचा मुद्दा आहे. राज्य शासनाने परीक्षा न घेण्याचा निर्णय विद्यार्थ्यांच्या भविष्याशी निगडित आहे. त्यामुळे जो काही अंतिम निर्णय होईल तो सर्वांना सोबत व विश्वासात घेऊन व्हावा, असे मत विधिसभा सदस्य अ‍ॅड. मनमोहन बाजपेयी यांनी व्यक्त केले.परीक्षांचा निर्णय घेण्याचा मुख्यमंत्र्यांना अधिकार आहे का?कोरोना संकटामुळे अंतिम वर्षाच्या परीक्षा न घेण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केला. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने याचा विरोध केला आहे. मुळात मुख्यमंत्र्यांची ही भूमिका विद्यापीठांच्या स्वायत्ततेवर घाला घालणारी आहे. परीक्षांचा निर्णय घेण्याचा मुख्यमंत्र्यांना अधिकार आहे का, असा प्रश्न अभाविपतर्फे उपस्थित करण्यात आला आहे.अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना अगोदरच्या गुणांवर आधारित सरासरी गुण देण्यात येतील. तसेच ज्यांना ग्रेडमध्ये सुधारणा करायची आहे त्यांना पुढील सत्रात परीक्षा देता येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. हा निर्णय विद्यार्थ्यांच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा आहे. विद्यापीठ कायद्यानुसार असा निर्णय घेण्याचा मुख्यमंत्र्यांना अधिकार नाही व तो टिकणारादेखील नाही. पुनश्च हरिओम म्हणताना मुख्यमंत्र्यांनी शाळा-महाविद्यालयातील शिक्षण सुरू व्हावे असे सांगितले. मात्र अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबतचा त्यांचा निर्णय न पटणारा आहे, असे मत अभाविपचे विदर्भ प्रदेश मंत्री रवी दांडगे यांनी व्यक्त केले.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठexamपरीक्षाbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारी