शहरं
Join us  
Trending Stories
1
आता जर चुकाल तर संपाल, मराठी माणसांना आवाहन; उद्धवसेना-मनसे युतीची अधिकृत घोषणा
2
Shiv Sena MNS Alliance: 'शिवतीर्थ'वर राज-उद्धव! बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर संपूर्ण ठाकरे कुटुंबाचं अभिवादन
3
शिवसेनेनं 'करून दाखवलं', मनसेचं 'इंजिन' घसरलं! पाहा, मागील दोन निवडणुकांमध्ये नेमकं काय घडलं?
4
IND W vs SL W: भारताच्या 'लेडी सेहवाग'चा मोठा पराक्रम; स्मृती मानधना, दिप्ती शर्मा, जेमिमालाही टाकलं मागं!
5
'आम्ही भारतातील सर्वात मोठे फरार', ललित मोदी आणि विजय मल्ल्या यांचा सरकारवर हल्लाबोल; व्हिडीओ व्हायरल
6
सोने-चांदी-हिरे काही कमी नाही, राममूर्ती घडवायला दिले ३० कोटी; अयोध्येतील राम मंदिराला भेट दिली
7
Uddhav- Raj Thackeray PC: थोड्याच वेळात उद्धवसेना-मनसे युतीची अधिकृत घोषणा होणार; पत्रकार परिषदेकडे सगळ्यांचं लक्ष
8
कुणीही एकत्र आले तरी मुंबईत भाजपाचा महापौर बसेल; मंत्री बावनकुळेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा
9
फास्ट फूडमुळे खरंच झाला विद्यार्थिनीचा मृत्यू? डॉक्टर आणि कुटुंबीयांनी सांगितलं धक्कादायक 'सत्य'
10
DCM शिंदे पोहोचले बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर; ठाकरे बंधूंच्या यूतीपूर्वी घडामोडींना वेग
11
बांग्लादेशात हिंदूंवरील अत्याचार वाढले; चिटगावमध्ये कट्टरतावाद्यांनी हिंदूंची घरे जाळली
12
Vijay Hazare Trophy स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात वैभव सूर्यवंशीचा धमाका! वादळी शतकासह रचला इतिहास
13
शेतकरी ते नोकरदार... बँकिंगपासून सोशल मीडियापर्यंत 'हे' ८ नियम १ जानेवारीपासून बदलणार
14
शरद पवारांची राष्ट्रवादी ठाकरे बंधूंच्या युतीत सहभागी होणार?; बैठकीतील इनसाइड स्टोरी समोर
15
नमो भारत ट्रेनमधील 'तो' अश्लील चाळा पडणार महागात! तरुण-तरुणीवर FIR; किती शिक्षा होणार?
16
अगदी बाबाची कॉपी! वडिलांसारखीच हँडसम आहेत हृतिकची मुलं, हृदान-हृहानचे डान्स मूव्ह्ज पाहून चाहते प्रेमात
17
सुधीर मुनंगटीवार यांनी घेतली CM देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले, नाराजी दूर होणार?
18
अमेरिकेत 'एपस्टीन फाइल्स'चा महास्फोट! डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर 'तसले' गंभीर आरोप; रिपोर्टने खळबळ
19
इंडिगोची 'दादागिरी' आता चालणार नाही; सरकारने दोन नवीन विमान कंपन्यांना दाखवला हिरवा कंदील
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत विक्रमी वाढ सुरुच, आज किती आहे १० ग्रॅम सोन्याचा लेटेस्ट रेट?
Daily Top 2Weekly Top 5

देशातील सर्व संघ शाखांपर्यंत जैन तत्वज्ञान पोहोचविणार - सरसंघचालक मोहन भागवत

By योगेश पांडे | Updated: November 13, 2023 20:48 IST

भगवान महावीर स्वामी यांच्या निर्वाणाच्या २५५० वर्षानिमित्त इतवारी येथील श्री पार्श्वनाथ दिगंबर जैन मोठे मंदिर येथे त्यांनी दर्शन घेतले. त्यावेळी ते बोलत होते.

नागपूर : भगवान महावीर यांनी जैन तत्वज्ञानात अहिंसा, संयम व तपस्या ही शाश्वत तत्वे सांगितली आहे. अहिंसेतून समाधानी विचार निर्माण होऊ शकतात. मात्र अहिंसेचे भित्र्यांना आचरण करता येत नाही. जो बलशाली असतो तोच अहिंसेचे आचरण करू शकतो. आजच्या जगाला अहिंसेचीच आवश्यकता असून बलसंपन्न होऊन तिचे रक्षण करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी केले. यावेळी देशातील सर्व संघ शाखांपर्यंत जैन तत्वज्ञान पोहोचविण्यात येईल, अशी माहितीदेखील त्यांनी दिली. भगवान महावीर स्वामी यांच्या निर्वाणाच्या २५५० वर्षानिमित्त इतवारी येथील श्री पार्श्वनाथ दिगंबर जैन मोठे मंदिर येथे त्यांनी दर्शन घेतले. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी भारतवर्षीय दिगंबर जैन तीर्थक्षेत्र कमिटीचे राष्ट्रीय महामंत्री संतोष जैन, मंदिराचे अध्यक्ष उदय जैन, महानगर संघचालक राजेश लोया उपस्थित होते. संघाच्या विविध गीतांमध्ये जैन विचार अगोदरपासूनच स्वयंसेवकांपर्यंत पोहोचविले जात आहेत. सर्व धर्मांचा आदर केला पाहिजे, हीच शिकवण संघात दिली जाते. भगवान महावीर स्वामी यांच्या निर्वाणाच्या २५५० वर्षानिमित्त संघाच्या सर्व शाखांमध्ये जैन तत्वज्ञान सांगण्यात येईल. स्वयंसेवकांच्या माध्यमातून ते समाजापर्यंत जाईल, अशी माहिती सरसंघचालकांनी यावेळी दिली.

सत्य सांगण्याचे अनेक मार्ग आहेत व त्यांना प्राचीन काळापासून मान्यता आहे. आपल्या देशांत पुजा, भाषा, परंपरा अनेक प्रकारच्या आहेत. मात्र समाज व राष्ट्र म्हणून प्राचीन काळापासून आपण सर्व एकच आहोत. पंथ, धर्मांमध्ये दर्शन वेगवेगळे आहेत, पण उपदेश एकच आहे. भगवान महावीरांनी सत्य, अहिंसेचा उपदेश दिला. त्याचे पालनदेखील होत आहे. सर्व उपदेशांचे मूळ सारखे आहे. एकोप्याने राहून या मूल्यांचे वर्धन केले पाहिजे. लोभातूनच हिंसा वाढते व जगात आता जी दोन युद्धे सुरू आहेत हे त्याचे उदाहरण आहे. जे आहे त्याच्यात मिळून मिसळून राहू हा स्वभाव अहिंसेतूनच निर्माण होऊ शकतो. अहिंसेवाचून जगाचे कल्याण नाही हे लक्षात ठेवले पाहिजे, असे सरसंघचालक म्हणाले.

२५५० वर्षानंतर जग खूप बदलले आहे, अनेक देश बदलले आहेत. त्यांच्या संस्कृती व परंपरा बदलल्या. मात्र आपल्या देशात भगवान महावीरांनी जे उपदेश केले ते शाश्वत आहेत व ती तत्व कायम आहेत. विविध उत्सवांतून आपण परंपरांची आठवण करतो. ही तत्व जगापर्यंत पोहोचविण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न केले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.

शहरातील विविध मंदिरांत पोहोचले संघ पदाधिकारीदरम्यान, महावीर स्वामी यांच्या निर्वाणाच्या २५५० वर्षानिमित्त नागपुरातील विविध जैन मंदिरांमध्ये संघाचे पदाधिकारी व स्वयंसेवक पोहोचले व अभिवादन केले. येत्या काळात जैन मुनींच्या आशीर्वचन ग्रहण करण्यासाठीदेखील संघ स्वयंसेवक जाणार आहेत. दादावाड़ी जैन मंदिर- वैशाली नगर, पारडी जैन मंदिर, सदर जैन मंदिर, तुलसीनगर मंदिर येथेदेखील छोटेखानी कार्यक्रम झाले.

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ