शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
3
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
4
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
5
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
6
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
7
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
8
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
9
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
10
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
11
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
12
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
13
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
14
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
15
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
16
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
17
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
18
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
19
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
20
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड

‘चुल्लूभर पाण्यात बुडून मरावे’; महाविकास आघाडीवर टीका करताना बावनकुळेंची जीभ घसरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2022 19:41 IST

Nagpur News शिंदे-फडणवीस सरकारमुळेच ओबीसी समाजाला न्याय मिळाल्याचा दावा करीत भाजपचे प्रदेश सरचिटणीस आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाविकास आघाडीच्या जुन्या सरकारवर वेळकाढूपणाचा आरोप लावला.

ठळक मुद्दे शिंदे-फडणवीस सरकारमुळेच आरक्षण मिळाल्याचा दावा

 

नागपूर : राज्य सरकारने सादर केलेला बांठिया आयोगाचा अहवाल स्वीकारत सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यास मंजुरी दिली आहे. शिंदे-फडणवीस सरकारमुळेच ओबीसी समाजाला न्याय मिळाल्याचा दावा करीत भाजपचे प्रदेश सरचिटणीस आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाविकास आघाडीच्या जुन्या सरकारवर वेळकाढूपणाचा आरोप लावला. मागील सरकारमधील नेत्यांवर टीका करीत असताना त्यांची जीभ घसरली व संबंधितांनी ‘चुल्लूभर पाण्यात बुडून मरावे,’ अशा भाषेचा त्यांनी उपयोग केला.

बावनकुळे बुधवारी प्रसारमाध्यमांशी बोलत होते. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे ओबीसी समाजाला मोठा दिलासा मिळाला आहे. मागील अनेक महिन्यांपासून हा संघर्ष सुरू होता. मागील सरकार ओबीसी आरक्षणाबाबत उदासीन होते. जुने सरकार असते तर ओबीसी त्यांच्या हक्काची लढाई जिंकू शकले नसते. ओबीसींना न्याय द्यायचाच नाही, असेच मागील सरकारने ठरविले होते. त्यांनी अडीच वर्षे केवळ वेळकाढूपणा केला. त्यांचे सरकार असते तर बांठिया आयोगाचा अहवाल आल्यावरदेखील तो दाबूनच ठेवला असता. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये झारीतील शुक्राचार्य होते. ओबीसींची फसवणूक करणाऱ्या नेत्यांना ओबीसी जनता सोडणार नाही. त्या नेत्यांनी मौन पाळावे व आता ‘चुल्लूभर पाण्याच डुबून मरावे,’ अशा शब्दांत बावनकुळे यांनी टीका केली.

उद्धव ठाकरे व अजित पवार यांच्या सरकारला जावे लागले आणि शिंदे-फडणवीस यांचे सरकार आल्यानेच ओबीसींना न्याय मिळाला आहे. नवीन सरकारने पहिल्याच दिवशी ओबीसी आरक्षणाबाबत आढावा घेतला व आवश्यक पावले उचलली. देवेंद्र फडणवीस, भाजप, ओबीसी संघटना यांनी मागील अडीच वर्षांत जो संघर्ष केला त्यातूनच हा विजय मिळाला आहे, असेदेखील ते म्हणाले.

टॅग्स :Chandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळे