शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

‘चुल्लूभर पाण्यात बुडून मरावे’; महाविकास आघाडीवर टीका करताना बावनकुळेंची जीभ घसरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2022 19:41 IST

Nagpur News शिंदे-फडणवीस सरकारमुळेच ओबीसी समाजाला न्याय मिळाल्याचा दावा करीत भाजपचे प्रदेश सरचिटणीस आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाविकास आघाडीच्या जुन्या सरकारवर वेळकाढूपणाचा आरोप लावला.

ठळक मुद्दे शिंदे-फडणवीस सरकारमुळेच आरक्षण मिळाल्याचा दावा

 

नागपूर : राज्य सरकारने सादर केलेला बांठिया आयोगाचा अहवाल स्वीकारत सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यास मंजुरी दिली आहे. शिंदे-फडणवीस सरकारमुळेच ओबीसी समाजाला न्याय मिळाल्याचा दावा करीत भाजपचे प्रदेश सरचिटणीस आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाविकास आघाडीच्या जुन्या सरकारवर वेळकाढूपणाचा आरोप लावला. मागील सरकारमधील नेत्यांवर टीका करीत असताना त्यांची जीभ घसरली व संबंधितांनी ‘चुल्लूभर पाण्यात बुडून मरावे,’ अशा भाषेचा त्यांनी उपयोग केला.

बावनकुळे बुधवारी प्रसारमाध्यमांशी बोलत होते. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे ओबीसी समाजाला मोठा दिलासा मिळाला आहे. मागील अनेक महिन्यांपासून हा संघर्ष सुरू होता. मागील सरकार ओबीसी आरक्षणाबाबत उदासीन होते. जुने सरकार असते तर ओबीसी त्यांच्या हक्काची लढाई जिंकू शकले नसते. ओबीसींना न्याय द्यायचाच नाही, असेच मागील सरकारने ठरविले होते. त्यांनी अडीच वर्षे केवळ वेळकाढूपणा केला. त्यांचे सरकार असते तर बांठिया आयोगाचा अहवाल आल्यावरदेखील तो दाबूनच ठेवला असता. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये झारीतील शुक्राचार्य होते. ओबीसींची फसवणूक करणाऱ्या नेत्यांना ओबीसी जनता सोडणार नाही. त्या नेत्यांनी मौन पाळावे व आता ‘चुल्लूभर पाण्याच डुबून मरावे,’ अशा शब्दांत बावनकुळे यांनी टीका केली.

उद्धव ठाकरे व अजित पवार यांच्या सरकारला जावे लागले आणि शिंदे-फडणवीस यांचे सरकार आल्यानेच ओबीसींना न्याय मिळाला आहे. नवीन सरकारने पहिल्याच दिवशी ओबीसी आरक्षणाबाबत आढावा घेतला व आवश्यक पावले उचलली. देवेंद्र फडणवीस, भाजप, ओबीसी संघटना यांनी मागील अडीच वर्षांत जो संघर्ष केला त्यातूनच हा विजय मिळाला आहे, असेदेखील ते म्हणाले.

टॅग्स :Chandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळे