शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

‘चुल्लूभर पाण्यात बुडून मरावे’; महाविकास आघाडीवर टीका करताना बावनकुळेंची जीभ घसरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2022 19:41 IST

Nagpur News शिंदे-फडणवीस सरकारमुळेच ओबीसी समाजाला न्याय मिळाल्याचा दावा करीत भाजपचे प्रदेश सरचिटणीस आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाविकास आघाडीच्या जुन्या सरकारवर वेळकाढूपणाचा आरोप लावला.

ठळक मुद्दे शिंदे-फडणवीस सरकारमुळेच आरक्षण मिळाल्याचा दावा

 

नागपूर : राज्य सरकारने सादर केलेला बांठिया आयोगाचा अहवाल स्वीकारत सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यास मंजुरी दिली आहे. शिंदे-फडणवीस सरकारमुळेच ओबीसी समाजाला न्याय मिळाल्याचा दावा करीत भाजपचे प्रदेश सरचिटणीस आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाविकास आघाडीच्या जुन्या सरकारवर वेळकाढूपणाचा आरोप लावला. मागील सरकारमधील नेत्यांवर टीका करीत असताना त्यांची जीभ घसरली व संबंधितांनी ‘चुल्लूभर पाण्यात बुडून मरावे,’ अशा भाषेचा त्यांनी उपयोग केला.

बावनकुळे बुधवारी प्रसारमाध्यमांशी बोलत होते. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे ओबीसी समाजाला मोठा दिलासा मिळाला आहे. मागील अनेक महिन्यांपासून हा संघर्ष सुरू होता. मागील सरकार ओबीसी आरक्षणाबाबत उदासीन होते. जुने सरकार असते तर ओबीसी त्यांच्या हक्काची लढाई जिंकू शकले नसते. ओबीसींना न्याय द्यायचाच नाही, असेच मागील सरकारने ठरविले होते. त्यांनी अडीच वर्षे केवळ वेळकाढूपणा केला. त्यांचे सरकार असते तर बांठिया आयोगाचा अहवाल आल्यावरदेखील तो दाबूनच ठेवला असता. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये झारीतील शुक्राचार्य होते. ओबीसींची फसवणूक करणाऱ्या नेत्यांना ओबीसी जनता सोडणार नाही. त्या नेत्यांनी मौन पाळावे व आता ‘चुल्लूभर पाण्याच डुबून मरावे,’ अशा शब्दांत बावनकुळे यांनी टीका केली.

उद्धव ठाकरे व अजित पवार यांच्या सरकारला जावे लागले आणि शिंदे-फडणवीस यांचे सरकार आल्यानेच ओबीसींना न्याय मिळाला आहे. नवीन सरकारने पहिल्याच दिवशी ओबीसी आरक्षणाबाबत आढावा घेतला व आवश्यक पावले उचलली. देवेंद्र फडणवीस, भाजप, ओबीसी संघटना यांनी मागील अडीच वर्षांत जो संघर्ष केला त्यातूनच हा विजय मिळाला आहे, असेदेखील ते म्हणाले.

टॅग्स :Chandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळे