शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

‘चुल्लूभर पाण्यात बुडून मरावे’; महाविकास आघाडीवर टीका करताना बावनकुळेंची जीभ घसरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2022 19:41 IST

Nagpur News शिंदे-फडणवीस सरकारमुळेच ओबीसी समाजाला न्याय मिळाल्याचा दावा करीत भाजपचे प्रदेश सरचिटणीस आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाविकास आघाडीच्या जुन्या सरकारवर वेळकाढूपणाचा आरोप लावला.

ठळक मुद्दे शिंदे-फडणवीस सरकारमुळेच आरक्षण मिळाल्याचा दावा

 

नागपूर : राज्य सरकारने सादर केलेला बांठिया आयोगाचा अहवाल स्वीकारत सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यास मंजुरी दिली आहे. शिंदे-फडणवीस सरकारमुळेच ओबीसी समाजाला न्याय मिळाल्याचा दावा करीत भाजपचे प्रदेश सरचिटणीस आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाविकास आघाडीच्या जुन्या सरकारवर वेळकाढूपणाचा आरोप लावला. मागील सरकारमधील नेत्यांवर टीका करीत असताना त्यांची जीभ घसरली व संबंधितांनी ‘चुल्लूभर पाण्यात बुडून मरावे,’ अशा भाषेचा त्यांनी उपयोग केला.

बावनकुळे बुधवारी प्रसारमाध्यमांशी बोलत होते. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे ओबीसी समाजाला मोठा दिलासा मिळाला आहे. मागील अनेक महिन्यांपासून हा संघर्ष सुरू होता. मागील सरकार ओबीसी आरक्षणाबाबत उदासीन होते. जुने सरकार असते तर ओबीसी त्यांच्या हक्काची लढाई जिंकू शकले नसते. ओबीसींना न्याय द्यायचाच नाही, असेच मागील सरकारने ठरविले होते. त्यांनी अडीच वर्षे केवळ वेळकाढूपणा केला. त्यांचे सरकार असते तर बांठिया आयोगाचा अहवाल आल्यावरदेखील तो दाबूनच ठेवला असता. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये झारीतील शुक्राचार्य होते. ओबीसींची फसवणूक करणाऱ्या नेत्यांना ओबीसी जनता सोडणार नाही. त्या नेत्यांनी मौन पाळावे व आता ‘चुल्लूभर पाण्याच डुबून मरावे,’ अशा शब्दांत बावनकुळे यांनी टीका केली.

उद्धव ठाकरे व अजित पवार यांच्या सरकारला जावे लागले आणि शिंदे-फडणवीस यांचे सरकार आल्यानेच ओबीसींना न्याय मिळाला आहे. नवीन सरकारने पहिल्याच दिवशी ओबीसी आरक्षणाबाबत आढावा घेतला व आवश्यक पावले उचलली. देवेंद्र फडणवीस, भाजप, ओबीसी संघटना यांनी मागील अडीच वर्षांत जो संघर्ष केला त्यातूनच हा विजय मिळाला आहे, असेदेखील ते म्हणाले.

टॅग्स :Chandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळे