शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

तिरडीच्या बांबूंनी वाढविले स्मशानघाटाचे सौंदर्य; पर्यावरणप्रेमी संस्थेची अनोखी संकल्पना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2023 19:30 IST

Nagpur News तिरडीच्या बांबूने स्मशानघाटाचे सौंदर्यीकरण होऊ शकते, अशी कल्पना पर्यावरणप्रेमी विजय लिमये यांना सूचली आणि अवघ्या सहा महिन्यात अंबाझरी घाटावर त्यांनी प्रत्यक्षात उतरविली.

नागपूर : मृतदेहांवर अंत्यसंस्कार केल्यानंतर अंत्यसंस्कारात आलेले आप्तेष्ट परतत असताना तिरडीला तोडतात आणि बांबू घाटाच्या कोपऱ्यात फेकून देतात. घाटावरील कर्मचारी अस्ताव्यस्त पडलेले बांबू बरेचदा जाळून टाकतात, त्यामुळे प्रदूषणात अजून भर पडते आणि बहुमूल्य बांबूही व्यर्थ जातात; पण तिरडीच्या बांबूने स्मशानघाटाचे सौंदर्यीकरण होऊ शकते, अशी कल्पना पर्यावरणप्रेमी विजय लिमये यांना सूचली आणि अवघ्या सहा महिन्यात अंबाझरी घाटावर त्यांनी प्रत्यक्षात उतरविली.

इको फ्रेंडली लिव्हींग फाउंडेशन या संस्थेचे अध्यक्ष असलेले विजय लिमये यांनी सर्वप्रथम शहरातील सर्व घाटांवरील कर्मचाऱ्यांना तिरडीचे बांबू जाळू नका, ते गोळा करून ठेवण्याची विनंती केली. घाटावर गोळा झालेले ७०० च्या जवळपास बांबू त्यांनी अंबाझरी घाटावर आणले. या बांबूपासून घाटाचे सौंदर्यीकरण कसे करता येईल म्हणून मेळघाटातील संपूर्ण बांबू केंद्रातून काही कारागीरांना नागपुरात आणले. अंबाझरी घाटावर प्रायोगिक तत्त्वावर या कलावंतांकडून विविध आकर्षक वस्तू तसेच घाटावरील रस्त्याच्या बाजूचे कठडे बनवण्यास सुरुवात केली आहे. घाटावर बांबूच्या कठड्यांची छान मांडणी केली. त्याला पेंटींग केल्यावर घाटाचा लूक बदलल्यासारखा दिसतोय.

- घाटावर पसरणार सुगंध

जिथे फुलपाखरे व मधमाश्या खूप जास्त असतात, तिथले वातावरण शुद्ध असते हे प्रमाण आहे. त्यासाठी अंबाझरी घाटावर विविध फुलझाडे, तसेच वेली लावण्यात येतील, त्यामुळे फुलपाखरांची तसेच मधमाश्यांची संख्या निश्चित वाढलेली दिसेल. घाटावरील दुर्गंधी नाहिशी करण्यासाठी सुगंधी फुलझाडांची लागवड करण्यात येणार आहे. तसेच घाटावर पक्ष्यांचा वावर वाढविण्यासाठी फळझाडे लावण्यात येणार आहेत.

 

- स्मशानघाटाशी निगडित अनेक सामाजिक कामे आम्ही गेल्या दहा-बारा वर्षांपासून करीत आहोत. बांबूपासून अतिशय सुरेख वस्तू बनवता येतात, तसेच विविध आकार देऊन आसपासचा भाग सुशोभीत करता येऊ शकतो. हे शासनाला तसेच जनतेला दाखविण्याचा आमचा प्रयत्न आहे.

- विजय लिमये, अध्यक्ष, इको फ्रेंडली लिव्हींग फाउंडेशन

टॅग्स :Socialसामाजिक