शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
4
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
5
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
6
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
7
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
8
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
9
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
10
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
11
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
12
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
13
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
14
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
15
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
16
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
17
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
18
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
19
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
20
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं

प्रवेशासाठी रिकाम्या प्लॉटवर उभारले टीनाचे शेड ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:07 IST

लोकमत विशेष रियाज अहमद नागपूर : आरटीईमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी पालक नाना प्रकारचे खटाटोप करीत आहेत. नियमांना डावलुन कागदपत्रांच्या नावावर ...

लोकमत विशेष

रियाज अहमद

नागपूर : आरटीईमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी पालक नाना प्रकारचे खटाटोप करीत आहेत. नियमांना डावलुन कागदपत्रांच्या नावावर दिखावा करण्यात येत आहे. सत्यस्थिती यापेक्षा वेगळी आहे, परंतु प्रशासन उदासीन आहे. ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत हा धक्कादायक खुलासा झाला आहे.

वर्धा मार्गावरील चिंचभवन येथील एका खासगी नामवंत शाळेत मुलांना प्रवेश देण्यासाठी अनेक पालकांनी आपल्या रिकाम्या प्लॉटवर टीनाचे शेड उभारले आहे तर काही पालकांनी बांधकाम सुरू असलेल्या इमारतीचा रहिवासी पत्ता नोंदवून विजेचे बिल जोडले. आरटीई अ‍ॅक्शन कमिटीचे अध्यक्ष व शिक्षण विभागाने गठित केलेल्या व्हेरिफिकेशन समितीचे व्हेरिफिकेशन ऑफिसर मो. शाहिद शरीफ यांच्या समोर तक्रार घेऊन पोहोचलेल्या चिंचभवन येथील संबंधित शाळेजवळ राहणाऱ्या काही स्थानिक पालकांनी सांगितले की, ते मूळचे स्थानिक असूनही त्यांच्या मुलांना प्रवेश मिळाला नाही. त्यांची तक्रार घेऊन ‘लोकमत’ची चमू लॉटरीत प्रवेश मिळालेल्या पालकांच्या कागदपत्रांची तपासणी करून त्यांनी दिलेल्या पत्त्यावर पोहोचली असता टीनाचे शेड आणि बांधकाम सुरू असलेल्या इमारती आढळल्या. तेथे अद्याप कुणीही राहण्यास गेलेले नाही. नियमानुसार अर्जदाराचे राहते घर शाळेपासून एक किलोमीटर दूर असायला हवे. तेथे ते राहत असायला पाहिजे. दरम्यान येथे प्लॉट नं. ५५३ सेक्टर क्रमांक ३५ अर्ज क्रमांक १८६२९ च्या पालकाच्या घरी रिकामे असलेले टीनाचे शेड आढळले. तेथे कोणीच राहत नाही. अर्ज क्रमांक ०१३३८३७ च्या प्लॉट क्रमांक १०४, सेक्टर ३४ वर अपूर्ण बांधकाम असलेली इमारत आढळली. अर्ज क्रमांक ०२०३५४ च्या प्लॉट क्रमांक २७४ सेक्टर क्रमांक ३४ चा प्लॉट रिकामा आढळला. तेथे फक्त गवत उगवलेले होते. तर अर्ज क्रमांक ०२८३४४ ने सांगितलेल्या पत्त्यावर पालक आढळलेच नाही. नियमानुसार प्रवेशासाठी तपासणी करण्यासाठी आधारकार्ड, रेशनकार्ड, गॅस पास बुक, पाणी बिल, ड्रायव्हिंग लायसन्सपैकी एक कागदपत्र असणे आवश्यक आहे. परंतु पालकांनी केवळ विजेचे बिल जोडले. हे बिल कोणत्याही जमिनीवर टीनाचे शेड उभारल्यास सहज मिळते. काही घरांचे विजेचे बिल असे होते की तेथे खूपच कमी युनिट रिडींग आढळले. याबाबत शिक्षण विभागाचे म्हणणे जाणून घेण्यासाठी ‘लोकमत’ने शिक्षणाधिकाऱ्यांना अनेकदा संपर्क केला. परंतु त्यांनी फोन उचलला नाही.

..............

गुन्हा दाखल व्हायला हवा

‘प्रवेश मिळविणारे पालक शाळेपासून खूप दूर सोनेगावमध्ये राहतात. त्यांनी प्रवेशासाठी एकही योग्य पुरावा जमा केला नाही. त्यामुळे त्यांना मिळालेली लॉटरी स्थगित केली पाहिजे. सोबतच बनावट कागदपत्र जमा केल्यामुळे त्यांच्या विरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल व्हायला हवा.’

-मो. शाहिद शरीफ, अध्यक्ष आरटीई अ‍ॅक्शन कमिटी

................