शहरं
Join us  
Trending Stories
1
Malegaon Blast Case Verdict : प्रज्ञासिंह यांच्यासह सर्व आरोपी निर्दोष सुटले, १७ वर्षांनंतर एनआयएच्या विशेष न्यायालयाने दिला निकाल
2
कोण आहेत कर्नल पुरोहित? ज्यांना मालेगाव स्फोटाप्रकरणी निर्दोष सोडलं; ९ वर्ष जेलमध्ये टॉर्चर केले
3
आता अंतराळात युद्ध पेटणार?, चीन-रशियावर जपानचा गंभीर आरोप; भारतालाही सावध राहावं लागणार
4
"काँग्रेसच्या विकृत राजकारणाला चपराक, हिंदू समाजाला दहशतवादी ठरवण्याचं कारस्थान हाणून पाडलं"
5
"हिंदू कधी दहशतवादी असू शकत नाही..."; संसदेत गृहमंत्री अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
6
अमेरिकेचा भारतावर 'टॅरिफ बॉम्ब'! आता iPhone महागणार, 'मेक इन इंडिया'ला मोठा धक्का!
7
'भारत-रशिया त्यांच्या मृत अर्थव्यवस्था आणखी बुडवणार...', डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले
8
"तो एकदम छपरी आहे...", अहान पांडेबद्दल हे काय बोलून गेला 'सैयारा'चा दिग्दर्शक मोहित सुरी
9
२ ऑगस्टला जग अंधारात बुडणार नाही; दा. कृ. सोमण यांचे स्पष्टीकरण
10
ट्रम्प यांच्या २५% टॅरिफच्या घोषणेनंतर भारतातील 'हे' शेअर्स जोरदार आपटले; विकण्यासाठी रांग, तुमच्याकडे आहेत?
11
ठाण्यात राजकीय वातावरण तापले; राजन विचारे यांच्या बॅनरवरून शिंदे गट आणि ठाकरे गटात जुंपली
12
अहो आश्चर्यम! गर्भाशयात नाही, लिव्हरमध्ये वाढतंय बाळ; काय आहे इंट्राहेपॅटिक एक्टोपिक प्रेग्नन्सी?
13
कौतुक करता-करता कर लादला; ट्रम्प यांच्या 25% टॅरिफवरुन विरोधकांचा मोदी सरकारवार निशाणा
14
Video - भीषण! अमेरिकेमध्ये F-35 फायटर जेट क्रॅश; पायलटने 'असा' वाचवला जीव
15
ज्वेलरी शॉपमध्ये अचानक पुराचे पाणी घुसले, २० किलो सोन्याचे दागिने, हिरे वाहून गेले; लोक चिखल रापत बसले...
16
एकेकाळी ५ रुपयांसाठी मजुरी करायच्या, आज अमेरिकन कंपनीच्या CEO बनून १०० पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना देताहेत पगार
17
मेघा धाडेनं सांगितलं दुसरं लग्न करण्यामागचं कारण, म्हणाली - "त्या दिवशी मला..."
18
"हात जोडले, ५ मिनिटं मागितली, पण..."; बुलडोझर कारवाईनंतर भावाचा मृत्यू, भाजपा नेत्याची व्यथा
19
Hit and run: २१ वर्षांच्या मुलाला कारने चिरडलं अन् पळून गेली; कोण आहे नंदिनी कश्यप?
20
लेकीच्या जन्मानंतर इशिता दत्ताची तब्येत बिघडली, दोन वर्षांचा मुलगाही आजारी; दिली हेल्थ अपडेट

पैनगंगा प्रकल्पावर उत्तरासाठी शासनाने घेतला वेळ

By admin | Updated: January 11, 2016 02:58 IST

यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी येथे पैनगंगा नदीवर बांधण्यात येत असलेला निम्न पैनगंगा प्रकल्प कधी पूर्ण होणार,..

हायकोर्ट : २८ जानेवारी रोजी पुढील सुनावणीनागपूर : यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी येथे पैनगंगा नदीवर बांधण्यात येत असलेला निम्न पैनगंगा प्रकल्प कधी पूर्ण होणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. हा प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेऊन ४० वर्षे लोटली असली तरी, काम अद्याप पूर्ण झालेले नाही. निम्न पैनगंगा प्रकल्प निर्माण, समस्या निवारण व पुनर्वसन कल्याणकारी संस्थेचे अध्यक्ष विजय भुरे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल करून प्रकल्प पूर्ण करण्याबाबत शासन किती उदासीन आहे, हे दाखविणारे मुद्दे मांडले आहेत. यावर उत्तर सादर करण्यासाठी शासनाने गेल्या गुरुवारी न्यायालयाला आणखी तीन आठवड्याची मुदत मागून घेतली. यामुळे प्रकरणावर २८ जानेवारी रोजी पुढील सुनावणी होणार आहे. महाराष्ट्रातील यवतमाळ, चंद्रपूर व नांदेड आणि तेलंगणातील अदिलाबाद जिल्ह्याचा या प्रकल्पाच्या लाभक्षेत्रामध्ये समावेश होतो. लाभक्षेत्रात महाराष्ट्रातील एकूण १ लाख ४० हजार ८१८ हेक्टर तर, तेलंगणातील एकूण १९ हजार २३२ हेक्टर जमीन येते. राज्य शासनाने १९ आॅगस्ट २००४ रोजी अधिसूचना जारी करून यवतमाळ, चंद्रपूर व नांदेड जिल्ह्याला आदिवासी व नक्षलग्रस्त क्षेत्र घोषित केले आहे. येथील नागरिकांचे जीवन शेतीवर अवलंबून आहे. वनक्षेत्र असल्यामुळे या भागात औद्योगिकीकरण झाले नाही. शेती सुपीक नसल्यामुळे नागरिकांचा आर्थिक विकास झालेला नाही. अदिलाबाद जिल्ह्याचीदेखील हीच अवस्था आहे. तेलंगणा राज्य निर्मितीपूर्वी अदिलाबाद आंध्र प्रदेशमध्ये होते. यामुळे या चारही जिल्ह्यांचा विकास करण्यासाठी महाराष्ट्र व आंध्र प्रदेश शासनाने १९७५ मध्ये निम्न पैनगंगा प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला. परंतु शासकीय उदासीनतेमुळे हा प्रकल्प अद्यापही पूर्ण झालेला नाही. सुरुवातीला प्रकल्पाचा अपेक्षित खर्च १४०२ कोटी ४२ लाख रुपये होता. २००७-०८ मध्ये हा खर्च वाढून ३३२९ कोटी रुपये झाला, असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)