शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

पैनगंगा प्रकल्पावर उत्तरासाठी शासनाने घेतला वेळ

By admin | Updated: January 11, 2016 02:58 IST

यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी येथे पैनगंगा नदीवर बांधण्यात येत असलेला निम्न पैनगंगा प्रकल्प कधी पूर्ण होणार,..

हायकोर्ट : २८ जानेवारी रोजी पुढील सुनावणीनागपूर : यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी येथे पैनगंगा नदीवर बांधण्यात येत असलेला निम्न पैनगंगा प्रकल्प कधी पूर्ण होणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. हा प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेऊन ४० वर्षे लोटली असली तरी, काम अद्याप पूर्ण झालेले नाही. निम्न पैनगंगा प्रकल्प निर्माण, समस्या निवारण व पुनर्वसन कल्याणकारी संस्थेचे अध्यक्ष विजय भुरे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल करून प्रकल्प पूर्ण करण्याबाबत शासन किती उदासीन आहे, हे दाखविणारे मुद्दे मांडले आहेत. यावर उत्तर सादर करण्यासाठी शासनाने गेल्या गुरुवारी न्यायालयाला आणखी तीन आठवड्याची मुदत मागून घेतली. यामुळे प्रकरणावर २८ जानेवारी रोजी पुढील सुनावणी होणार आहे. महाराष्ट्रातील यवतमाळ, चंद्रपूर व नांदेड आणि तेलंगणातील अदिलाबाद जिल्ह्याचा या प्रकल्पाच्या लाभक्षेत्रामध्ये समावेश होतो. लाभक्षेत्रात महाराष्ट्रातील एकूण १ लाख ४० हजार ८१८ हेक्टर तर, तेलंगणातील एकूण १९ हजार २३२ हेक्टर जमीन येते. राज्य शासनाने १९ आॅगस्ट २००४ रोजी अधिसूचना जारी करून यवतमाळ, चंद्रपूर व नांदेड जिल्ह्याला आदिवासी व नक्षलग्रस्त क्षेत्र घोषित केले आहे. येथील नागरिकांचे जीवन शेतीवर अवलंबून आहे. वनक्षेत्र असल्यामुळे या भागात औद्योगिकीकरण झाले नाही. शेती सुपीक नसल्यामुळे नागरिकांचा आर्थिक विकास झालेला नाही. अदिलाबाद जिल्ह्याचीदेखील हीच अवस्था आहे. तेलंगणा राज्य निर्मितीपूर्वी अदिलाबाद आंध्र प्रदेशमध्ये होते. यामुळे या चारही जिल्ह्यांचा विकास करण्यासाठी महाराष्ट्र व आंध्र प्रदेश शासनाने १९७५ मध्ये निम्न पैनगंगा प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला. परंतु शासकीय उदासीनतेमुळे हा प्रकल्प अद्यापही पूर्ण झालेला नाही. सुरुवातीला प्रकल्पाचा अपेक्षित खर्च १४०२ कोटी ४२ लाख रुपये होता. २००७-०८ मध्ये हा खर्च वाढून ३३२९ कोटी रुपये झाला, असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)