शहरं
Join us  
Trending Stories
1
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
2
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
5
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
6
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
7
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
8
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
9
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
10
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
11
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
12
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
13
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
14
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
15
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
16
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
17
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
18
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
19
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
20
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश

नागपुरातील १५ हजार कपड्यांच्या कारागिरांवर उपासमारीची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2020 22:38 IST

लॉकडाऊनमुळे अनेकांचा रोजगार बुडाला आहे. यात शहराच्या विविध भागात कपड्यांचा व्यवसाय करणाऱ्या १५ हजार कारागिरांवरही उपासमारीची वेळ आली आहे. जवळचे पैसे संपले, जेवणाची सोय नाही, घरभाड्यासाठी घरमालक तगादा लावत असल्यामुळे ते चांगलेच अडचणीत सापडले आहेत.

ठळक मुद्दे गावी जाण्याची व्यवस्था करा : लालगंज सुधार समितीची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लॉकडाऊनमुळे अनेकांचा रोजगार बुडाला आहे. यात शहराच्या विविध भागात कपड्यांचा व्यवसाय करणाऱ्या १५ हजार कारागिरांवरही उपासमारीची वेळ आली आहे. जवळचे पैसे संपले, जेवणाची सोय नाही, घरभाड्यासाठी घरमालक तगादा लावत असल्यामुळे ते चांगलेच अडचणीत सापडले आहेत.शहरातील शांतिनगर, पाचपावली, यशोधरानगर, लकडगंज आणि तहसिल पोलीस स्टेशन अंतर्गत येणाºया नाईक तलाव, तांडापेठ, बंगलादेश, लालगंज, यशोधरानगर, पाचपावली, कुंदनलाल गुप्तानगर, झाडे चौक, मोमिनपुरा, गोंडपुरा, बस्तरवारी, टेका नाका, गुलशननगर, दलाल चौक, कमाल चौक, मोठा ताजबाग परिसरात कपड्यांच्या व्यवसायातील जवळपास १५ हजार कारागीर राहतात. हे कारागीर पश्चिम बंगालमधील नंदीग्राम जि. पूर्व मेदनीपूर येथील रहिवासी आहेत. पोटाची खळगी भरण्यासाठी आपल्या गावापासून १५०० किलोमीटर दूरवर ते आले आहेत. अनेकांनी भाड्याच्या जागेवर कारखाना सुरू केला तर अनेकजण या कारखान्यात कारागीर म्हणून कामाला आहेत. लॉकडाऊनमुळे त्यांचा रोजगार बुडाला आहे. महिनाभरापासून हाताला काम नसल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. यातच घरमालकही किरायासाठी तगादा लावत असल्यामुळे ते चांगलेच अडचणीत सापडले आहेत.त्यामुळे राज्य शासन तसेच प्रशासनाने या कारागिरांची त्यांच्या मूळ गावी जाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी लालगंज सुधार संघर्ष समितीने केली आहे. या अडचणीत सापडलेल्या कारागिरांना मदत करण्यासाठी लालगंज सुधार संघर्ष समितीचे अध्यक्ष गुणवंत झाडे, पदाधिकारी विलास पराते, विद्यासागर शाहू, दिनेश राऊत, नंदू वैरागडे, हरिभाऊ आमदरे, गोलू बोकडे, विलास धार्मिक, बंटी शेवडे यांनी पुढाकार घेतला. समितीने अनेक संस्थांच्या माध्यमातून या कारागिरांची भोजनाची व्यवस्था केली आहे. परंतु या कारागिरांची होणारी उपासमार टाळण्यासाठी त्यांना त्यांच्या गावी पाठविणे गरजेचे आहे. त्यासाठी राज्य शासन तसेच स्थानिक प्रशासनाने श्रमिक स्पेशल रेल्वेगाडी चालविण्याची मागणी समितीने केली आहे.व्यापाऱ्यांकडूनही पैसे मिळेनाकपड्याच्या व्यापाऱ्यांकडूनही त्यांना पैसे मिळत नसल्यामुळे त्यांच्यासमोर जगण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असल्याचे या कारागिरांचा नेता शहाजन खान यांनी सांगितले. नागपुरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे गावाकडे नातेवाईकही या कारागिरांची चिंता करीत आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnagpurनागपूर