शहरं
Join us  
Trending Stories
1
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
2
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
3
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
4
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
5
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
6
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
7
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
8
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
9
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
10
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
11
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
12
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
13
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
14
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
15
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
16
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
17
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
18
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
19
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
20
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान

नागपुरातील १५ हजार कपड्यांच्या कारागिरांवर उपासमारीची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2020 22:38 IST

लॉकडाऊनमुळे अनेकांचा रोजगार बुडाला आहे. यात शहराच्या विविध भागात कपड्यांचा व्यवसाय करणाऱ्या १५ हजार कारागिरांवरही उपासमारीची वेळ आली आहे. जवळचे पैसे संपले, जेवणाची सोय नाही, घरभाड्यासाठी घरमालक तगादा लावत असल्यामुळे ते चांगलेच अडचणीत सापडले आहेत.

ठळक मुद्दे गावी जाण्याची व्यवस्था करा : लालगंज सुधार समितीची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लॉकडाऊनमुळे अनेकांचा रोजगार बुडाला आहे. यात शहराच्या विविध भागात कपड्यांचा व्यवसाय करणाऱ्या १५ हजार कारागिरांवरही उपासमारीची वेळ आली आहे. जवळचे पैसे संपले, जेवणाची सोय नाही, घरभाड्यासाठी घरमालक तगादा लावत असल्यामुळे ते चांगलेच अडचणीत सापडले आहेत.शहरातील शांतिनगर, पाचपावली, यशोधरानगर, लकडगंज आणि तहसिल पोलीस स्टेशन अंतर्गत येणाºया नाईक तलाव, तांडापेठ, बंगलादेश, लालगंज, यशोधरानगर, पाचपावली, कुंदनलाल गुप्तानगर, झाडे चौक, मोमिनपुरा, गोंडपुरा, बस्तरवारी, टेका नाका, गुलशननगर, दलाल चौक, कमाल चौक, मोठा ताजबाग परिसरात कपड्यांच्या व्यवसायातील जवळपास १५ हजार कारागीर राहतात. हे कारागीर पश्चिम बंगालमधील नंदीग्राम जि. पूर्व मेदनीपूर येथील रहिवासी आहेत. पोटाची खळगी भरण्यासाठी आपल्या गावापासून १५०० किलोमीटर दूरवर ते आले आहेत. अनेकांनी भाड्याच्या जागेवर कारखाना सुरू केला तर अनेकजण या कारखान्यात कारागीर म्हणून कामाला आहेत. लॉकडाऊनमुळे त्यांचा रोजगार बुडाला आहे. महिनाभरापासून हाताला काम नसल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. यातच घरमालकही किरायासाठी तगादा लावत असल्यामुळे ते चांगलेच अडचणीत सापडले आहेत.त्यामुळे राज्य शासन तसेच प्रशासनाने या कारागिरांची त्यांच्या मूळ गावी जाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी लालगंज सुधार संघर्ष समितीने केली आहे. या अडचणीत सापडलेल्या कारागिरांना मदत करण्यासाठी लालगंज सुधार संघर्ष समितीचे अध्यक्ष गुणवंत झाडे, पदाधिकारी विलास पराते, विद्यासागर शाहू, दिनेश राऊत, नंदू वैरागडे, हरिभाऊ आमदरे, गोलू बोकडे, विलास धार्मिक, बंटी शेवडे यांनी पुढाकार घेतला. समितीने अनेक संस्थांच्या माध्यमातून या कारागिरांची भोजनाची व्यवस्था केली आहे. परंतु या कारागिरांची होणारी उपासमार टाळण्यासाठी त्यांना त्यांच्या गावी पाठविणे गरजेचे आहे. त्यासाठी राज्य शासन तसेच स्थानिक प्रशासनाने श्रमिक स्पेशल रेल्वेगाडी चालविण्याची मागणी समितीने केली आहे.व्यापाऱ्यांकडूनही पैसे मिळेनाकपड्याच्या व्यापाऱ्यांकडूनही त्यांना पैसे मिळत नसल्यामुळे त्यांच्यासमोर जगण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असल्याचे या कारागिरांचा नेता शहाजन खान यांनी सांगितले. नागपुरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे गावाकडे नातेवाईकही या कारागिरांची चिंता करीत आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnagpurनागपूर