शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

तिळा तिळा दार उघड !

By admin | Updated: May 16, 2014 00:40 IST

नागपूर आणि रामटेक लोकसभा मतदारसंघातील मतदारांनी निवडणुकीत कुणाच्या बाजूने कौल दिला यासाठी तब्बल सव्वा महिन्यापासूनची प्रदीर्घ प्रतीक्षा उद्या, शुक्रवारी संपणार आहे.

आज होणार फैसला - सर्वांचाच विजयाचा दावा

नागपूर: नागपूर आणि रामटेक लोकसभा मतदारसंघातील मतदारांनी निवडणुकीत कुणाच्या बाजूने कौल दिला यासाठी तब्बल सव्वा महिन्यापासूनची प्रदीर्घ प्रतीक्षा उद्या, शुक्रवारी संपणार आहे. सकाळी १0 वाजेपर्यंत निकालाचा पहिला कौल मिळण्याची शक्यता आहे. आपणच विजयी होऊ, असा दावा करीत उमेदवारांनी संसदेत जाण्यासाठी ‘तिळा तिळा दार उघड’ म्हणणे सुरू केले आहे. आता मतदार कुणासाठी संसदेचे दार उघडतात, हे प्रत्यक्ष मतमोजणीनंतर स्पष्ट होणार आहे. ‘नॅशनल फेस’ असलेले उमेदवार रिंगणात असल्याने या दोन्ही लढतीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. एवढेच नव्हे तर वृत्तवाहिन्यांवरील एक्झिट पोलने देशभरात उभारलेल्या चित्रामुळे नागपूर व रामटेकमध्ये कोण ‘एक्झिट’ होईल, याबाबतची उत्सुकता मतदारांमध्ये वाढली आहे. कळमना मार्केट यार्डमध्ये सकाळी ८ वाजतापासून या दोन्ही मतदारसंघाच्या मतमोजणीला सुरुवात होईल. दोन्ही मतदारसंघातील मतमोजणीसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली असून यासाठी आवश्यक ती सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे.मतमोजणीस्थळी त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था असणार असून अधिकारी वगळता तेथे कुणालाही इलेक्ट्रॉनिक वस्तू (मोबाईल, लॅपटॉप, कॅमेरे) नेण्यास मनाई करण्यात आली आहे,असे जिल्हाधिकारी व निवडणूक निर्णय अधिकारी अभिषेक कृष्णा यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

१0 एप्रिल रोजी नागपूर आणि रामटेक लोकसभा मतदारसंघासाठी मतदान झाले होते. संपूर्ण नागपूर आणि रामटेक लोकसभा मतदारसंघातून

सर्वप्रथम म्हणजे ८ वाजता टपाल मतपत्रिकांची मोजणी केली जाईल. त्यासाठी दोन्ही मतदारसंघ मिळून एकूण चार टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे. चार सहायक निवडणूक निर्णय अधिकार्‍याची तेथे नियुक्ती करण्यात आली आहे. दुपारी १२ वाजेपर्यंत टपाल मतांची मोजणी पूर्ण होईल. त्यानंतर ईव्हीएममध्ये नोंदवण्यात आलेल्या मतांची मोजणी सुरू होईल. यासाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघ निहाय २0 टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे. नागपूर लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघ मिळून १२0 व रामटेक मतदारसंघासाठी तेवढेच असे एकूण २४0 टेबलवर एकाच वेळी मतमोजणीला सुरुवात होईल. यासाठी एकूण १४५0 कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

एका टेबलवर एकाच वेळी २0 मतदान यंत्रातील मतांजी मोजणी केली जाईल. रामटेक लोकसभा मतदारसंघात एकूण १८ तर नागपूर लोकसभा मतदारसंसघात एकूण १५ फेर्‍या होण्याची शक्यता आहे. रामटेकमध्ये कामठी विधानसभा मतदारसंघात मतदान केंद्राची संख्या सर्वाधिक म्हणजे ४५0 असल्याने तेथे २३ फेर्‍या होईल. तर नागपूरमध्ये उत्तर नागपूरमध्ये सर्वाधिक म्हणजे ३३१ मतदान केंद्र असल्याने तेथे १७ फेर्‍या होतील.

पहिल्या फेरीला सरासरी ४५ मिनिट तर त्यानंतरच्या प्रत्येक फेरीला २0 ते ३0 मिनिट लागण्याची शक्यता आहे. पहिल्या फेरीचा निकाल स. १0 वाजता जाहीर केला जाईल. मतमोजणीची प्रक्रिया सर्वसाधारणपणे दुपारी ४ वाजेपर्यंत पूर्ण करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. निकाल जाहीर होण्यास सायं ५ किवा ६ वाजू शकतात, असे जिल्हाधिकार्‍यांनी स्पष्ट केले. विजयी मिरवणूक काढण्यास प्रशासनाने बंदी घातली नाही. त्यासाठी पोलिसांकडून पूर्वपरवानगी घेण्याची गरज आहे, असे जिल्हाधिकारी म्हणाले.पत्रकार परिषदेला रामटेक लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी व अतिरिक्त जिल्हाधिकारी पंजाबराव वानखडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रदीप डांगे उपस्थित होते. (प्रतिनिधी)