शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
3
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
4
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
5
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
6
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
7
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
8
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
9
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
10
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
11
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
12
डोनाल्ड ट्रम्प यांचा H-1B व्हिसा बॉम्ब होणार बॅकफायर, अमेरिकेचंच होणार नुकसान, तर भारताचा...
13
सर्वपित्री अमावास्या २०२५: पूर्वज स्मरणासह ‘ही’ कामे अवश्य कराच; पुण्य-वरदान-कृपा लाभेल!
14
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
15
Navratri 2025: नवरात्रीत घट बसवण्याआधी देवघरात 'हे' बदल केले का? नसेल तर आजच करा
16
परदेशात फिरायला जाणाऱ्या प्रवाशांनी शोधली 'ही' नवीन युक्ती; नेमका काय आहे 'फ्लाइंग नेकेड ट्रेंड'?
17
आयडियाची कल्पना! "मला १०० रुपये द्या ना...", गाडी खरेदी करण्यासाठी महिलेचा 'कारनामा'
18
ट्रम्प यांच्या एका निर्णयाने अमेरिकेतील भारतीयांची धाकधूक वाढली; मायक्रोसॉफ्टने कर्मचाऱ्यांना पाठवला तातडीचा ईमेल
19
सर्वार्थ सिद्धी योगात सर्वपित्री अमावास्या २०२५: श्राद्ध विधीचा शुभ मुहूर्त; महत्त्व-मान्यता
20
परदेशी पाहुण्यांशी असलं वागणं शोभतं का? 'टपोरी' मुलाच्या Viral Video वर नेटकरी संतापले

वाघांची प्रगणना झालीच नाही!

By admin | Updated: May 27, 2014 01:50 IST

बुद्ध पौर्णिमेच्या लख्ख प्रकाशात पाणवठ्यावरून दरवर्षी प्राण्यांची गणना केली जाते. मचाणीवर रात्रंदिवस बसून प्राण्यांची गणना केली जाते. मात्र यावर्षी मध्य चांदा वनविकास मंडळाने

 वनविकास महामंडळातील प्रकार : टेबलवरच तयार झाला अहवाल

सुरेश रंगारी - कोठारी (चंद्रपूर)

बुद्ध पौर्णिमेच्या लख्ख प्रकाशात पाणवठ्यावरून दरवर्षी प्राण्यांची गणना केली जाते. मचाणीवर रात्रंदिवस बसून प्राण्यांची गणना केली जाते. मात्र यावर्षी मध्य चांदा वनविकास मंडळाने प्राण्यांची गणनाच केली नाही. घरी बसूनच प्राणिगणना केल्याचा अहवाल उशिरा वरिष्ठांना पाठविला आहे. मध्य चांदा वनप्रकल्प बल्लारपूर अंतर्गत झरण, कन्हारगाव, तोहगाव व धाबा असे चार वनक्षेत्र आहेत. या क्षेत्रात ३२ हजार हेक्टर जंगल पसरले आहे. वाघ, बिबट्यासह अनेक वन्य प्राण्यांची संख्या विपुल आहे. या क्षेत्रात प्राण्यांना निवास, पाणी व खाद्य मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याने दिवसागणिक प्राण्यांची संख्या वाढत आहे. वाढणार्‍या प्राण्यांचा उपद्रव गावकर्‍यांना विविध प्रकारे सहन करावा लागतो. याच क्षेत्रात वाघाने तीन जणांना ठार केल्याची घटना अगदी ताजी आहे. वाघाच्या हल्ल्यात जनावरांचा मृत्यू होणे ही नित्याचीच बाब झाली आहे. या क्षेत्रात असणार्‍या प्राण्यांची गणना करून संख्या ठरवायची होती. मागील वर्षीच्या तुलनेत प्राणी वाढले की कमी झालेत, याचा आढावा प्रगणनेच्या माध्यमातून घ्यायचा होता. त्यासाठी वनविकास महामंडळाच्या अधिकार्‍यांनी महिनाभरापासून तयारी सुरू करून पाणवठ्यावर मचाणी उभारण्याचे काम केले. लाखो रुपये खर्च करण्यात आले. मात्र १४ मे रोजी या मचाणीपर्यंत कुणीही पोहचले नाही. ३२ मचाणींवर ६०-७० मजुरांची नेमणूक करण्यात आली. सोबतीला वन कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली. परंतु पावसाचा बहाणा करून प्राणिगणनेसाठी कुणालाही पाठविण्यात आले नाही. सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, वन्यप्राणी प्रेमी व अभ्यासक तसेच माध्यमांच्या प्रतिनिधींनाही पाचारण करण्याचे सौजन्य वन विकास महामंडळाने दाखविले नाही. प्राण्यांचे फोटो घेण्यासाठी एका पाणवठ्यावर चार कॅमेरे लावण्याचे ठरले. मात्र तेदेखील लावण्यात आले नाही. त्यामुळे कॅमेर्‍यात कोणत्याही प्राण्यांचा फोटो, त्यांच्या हालचाली टिपण्यात आल्या नाहीत. वन अधिकार्‍यांनी घरी बसूनच प्राणिगणना केल्याचा देखावा निर्माण केला. त्यांच्या गणनेत एकही वाघ, बिबट आढळला नाही. केवळ रानडुक्कर, वानर व हरिण आणि चितळाचे कळप दाखविण्यात आले. या क्षेत्रात वाघांची संख्या भरपूर असताना संबंधितांना एकही वाघ कसा काय दिसला नाही, याबाबत सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे. प्राणिगणनेसाठी या विभागाने लाखो रुपयांचा खर्च दाखविला. नवीन मचाणी उभारल्याचे, पाणवठे तयार केल्याचे, रस्ते बनविल्याचे तसेच महिनाभरापासून मजूर काम करीत असल्याचे दाखवून शासनाच्या लाखो रुपयाला चुना लावण्यात आला आहे. वास्तविक मचाणी जुन्याच, पानवठे जुनेच आहेत. त्यात मजुरदेखील महिनाभरापासून काम करीत नसल्याचे विश्वसनीय सूत्राने सांगितले. प्राणिगणना करण्यात कुचराई करुन लाखोंचा अपव्यय करणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी वन्यप्रेमींनी केली आहे.