शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
3
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
4
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
5
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
6
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
7
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
8
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
9
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
10
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
11
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
12
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
13
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
14
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
15
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
16
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
17
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
18
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
19
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
20
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!

वाघांची प्रगणना झालीच नाही!

By admin | Updated: May 27, 2014 01:50 IST

बुद्ध पौर्णिमेच्या लख्ख प्रकाशात पाणवठ्यावरून दरवर्षी प्राण्यांची गणना केली जाते. मचाणीवर रात्रंदिवस बसून प्राण्यांची गणना केली जाते. मात्र यावर्षी मध्य चांदा वनविकास मंडळाने

 वनविकास महामंडळातील प्रकार : टेबलवरच तयार झाला अहवाल

सुरेश रंगारी - कोठारी (चंद्रपूर)

बुद्ध पौर्णिमेच्या लख्ख प्रकाशात पाणवठ्यावरून दरवर्षी प्राण्यांची गणना केली जाते. मचाणीवर रात्रंदिवस बसून प्राण्यांची गणना केली जाते. मात्र यावर्षी मध्य चांदा वनविकास मंडळाने प्राण्यांची गणनाच केली नाही. घरी बसूनच प्राणिगणना केल्याचा अहवाल उशिरा वरिष्ठांना पाठविला आहे. मध्य चांदा वनप्रकल्प बल्लारपूर अंतर्गत झरण, कन्हारगाव, तोहगाव व धाबा असे चार वनक्षेत्र आहेत. या क्षेत्रात ३२ हजार हेक्टर जंगल पसरले आहे. वाघ, बिबट्यासह अनेक वन्य प्राण्यांची संख्या विपुल आहे. या क्षेत्रात प्राण्यांना निवास, पाणी व खाद्य मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याने दिवसागणिक प्राण्यांची संख्या वाढत आहे. वाढणार्‍या प्राण्यांचा उपद्रव गावकर्‍यांना विविध प्रकारे सहन करावा लागतो. याच क्षेत्रात वाघाने तीन जणांना ठार केल्याची घटना अगदी ताजी आहे. वाघाच्या हल्ल्यात जनावरांचा मृत्यू होणे ही नित्याचीच बाब झाली आहे. या क्षेत्रात असणार्‍या प्राण्यांची गणना करून संख्या ठरवायची होती. मागील वर्षीच्या तुलनेत प्राणी वाढले की कमी झालेत, याचा आढावा प्रगणनेच्या माध्यमातून घ्यायचा होता. त्यासाठी वनविकास महामंडळाच्या अधिकार्‍यांनी महिनाभरापासून तयारी सुरू करून पाणवठ्यावर मचाणी उभारण्याचे काम केले. लाखो रुपये खर्च करण्यात आले. मात्र १४ मे रोजी या मचाणीपर्यंत कुणीही पोहचले नाही. ३२ मचाणींवर ६०-७० मजुरांची नेमणूक करण्यात आली. सोबतीला वन कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली. परंतु पावसाचा बहाणा करून प्राणिगणनेसाठी कुणालाही पाठविण्यात आले नाही. सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, वन्यप्राणी प्रेमी व अभ्यासक तसेच माध्यमांच्या प्रतिनिधींनाही पाचारण करण्याचे सौजन्य वन विकास महामंडळाने दाखविले नाही. प्राण्यांचे फोटो घेण्यासाठी एका पाणवठ्यावर चार कॅमेरे लावण्याचे ठरले. मात्र तेदेखील लावण्यात आले नाही. त्यामुळे कॅमेर्‍यात कोणत्याही प्राण्यांचा फोटो, त्यांच्या हालचाली टिपण्यात आल्या नाहीत. वन अधिकार्‍यांनी घरी बसूनच प्राणिगणना केल्याचा देखावा निर्माण केला. त्यांच्या गणनेत एकही वाघ, बिबट आढळला नाही. केवळ रानडुक्कर, वानर व हरिण आणि चितळाचे कळप दाखविण्यात आले. या क्षेत्रात वाघांची संख्या भरपूर असताना संबंधितांना एकही वाघ कसा काय दिसला नाही, याबाबत सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे. प्राणिगणनेसाठी या विभागाने लाखो रुपयांचा खर्च दाखविला. नवीन मचाणी उभारल्याचे, पाणवठे तयार केल्याचे, रस्ते बनविल्याचे तसेच महिनाभरापासून मजूर काम करीत असल्याचे दाखवून शासनाच्या लाखो रुपयाला चुना लावण्यात आला आहे. वास्तविक मचाणी जुन्याच, पानवठे जुनेच आहेत. त्यात मजुरदेखील महिनाभरापासून काम करीत नसल्याचे विश्वसनीय सूत्राने सांगितले. प्राणिगणना करण्यात कुचराई करुन लाखोंचा अपव्यय करणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी वन्यप्रेमींनी केली आहे.