शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
5
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
6
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
7
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
8
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
9
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
10
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
11
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
12
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
13
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
14
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
15
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
16
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
17
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
18
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
19
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
20
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात

पेंचमध्ये वाढताहेत वाघ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2018 11:13 IST

उपराजधानीला ‘टायगर कॅपिटल’चा दर्जा मिळवून देण्यात पेंच व्याघ्र प्रकल्पाची भूमिका महत्त्वाची आहे. मागील काही वर्षात पेंच जंगलात वाघांची संख्या चांगलीच वाढत आहे.

ठळक मुद्देतीन गावांसह इतरांच्या पुनर्वसनाचे प्रयत्न२५८ वर्ग किमी कोरमध्ये मानसिंहदेव अभयारण्य

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उपराजधानीला ‘टायगर कॅपिटल’चा दर्जा मिळवून देण्यात पेंच व्याघ्र प्रकल्पाची भूमिका महत्त्वाची आहे. मागील काही वर्षात पेंच जंगलात वाघांची संख्या चांगलीच वाढत आहे.विदर्भात वन्यजीवांनी परिपूर्ण असलेल्या पेंच जंगलाला १९९९ मध्ये पेंच व्याघ्र संरक्षित क्षेत्र म्हणून नोटिफाईड करण्यात आले. यादरम्यान केवळ २५७.२६ वर्ग किमीच्या कोर क्षेत्रासह पेंच सर्वात लहान व्याघ्र प्रकल्प होते. परंतु वन संरक्षणावर अधिक लक्ष दिल्याने पेंचमध्ये वाघांच्या संख्येत वाढ नोंदविल्या जाऊ लागली. यामुळे वाघांचे अधिवास क्षेत्र वाढवण्याच्या प्रयत्नांतर्गत काही वर्षांपूर्वी मानसिंहदेव अभयारण्याचे १८२ वर्ग किमी वनक्षेत्र मिळवून पेंचचे कोर (कॅपिटल हॅबिटेट) क्षेत्र एकूण ४३९.२६ वर्ग किमी झाले आहे. यासोबतच नागलवाडी, सुरेवानी, खुबाळा आदी वन विकास महामंडळ व व प्रादेशिक वन विभागाच्या वनक्षेत्राला बफर क्षेत्र म्हणून पेंचला जोडण्यात आले आहे. याप्रकारे पेंच व्याघ्र संरक्षित क्षेत्राचे एकूण क्षेत्रफळ ७४१.२६ वर्ग किमी झाले आहे. यानंतर पेंचमध्ये वाघांची संख्या २०१३-१४ मध्ये १९ वरून वाढून २०१६-१७ मध्ये ४४ पर्यंत पोहोचली आहे.ही माहिती वन्यजीव सप्ताहांतर्गत आयोजित पत्रपरिषदेत पेंच व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक रविकिरण गोवेकर यांनी दिली. त्यांनी सांगितले की, २०१७-१८ च्या व्याघ्र गणनेचा रिपोर्ट जानेवारी २०१९ पर्यंत स्पष्ट होईल. गोवेकर यांनी सांगितले की, वन्यजीवांच्या क्षेत्रात मानवाचा हस्तक्षेप कमी करण्याच्या उद्देशाने कोर क्षेत्राला लागून असलेल्या घाटकोपरा, सालईघाट, फिरंगीसरा आणि इतर गावांतील गावकऱ्यांच्या सहमतीने वनक्षेत्रातून बाहेर पुनर्वसन करण्याचे प्रयत्न केले जात आहे.दुसरीकडे तोतलाडोह कॉलनी पूर्णपणे हटवून फुलझरी गावाच्या अर्ध्या गावकऱ्यांचे वनक्षेत्राच्या बाहेर पुनर्वसन करण्यात आलेले आहे. वन परिक्षेत्र अधिकारी सचिन जाधव यांच्यानुसार केवळ नागलवाडी परिक्षेत्रांतर्गत ११ वाघ आणि ६ वाघाच्या बछड्यांची उपस्थिती नोंदविण्यात आली आहे. वन विकास महामंडळाचे वनक्षेत्र पेंचमध्ये सामील झाल्याने वन्यजीवांना आता विस्तीर्ण हिरवेगार जंगल उपलब्ध झाले आहे.पर्यटनातून गावातील विकास कामेक्षेत्र संचालक गोवेकर यांनी सांगितले की, पेंचमध्ये वर्ष २०१७-१८ मध्ये २९,३४९ पर्यटकांकडून २ कोटी १ लाख ९३ हजार रुपयाचा महसूल मिळाला आहे. पर्यटन हा मुख्य उद्देश नाही. परंतु पर्यटनाच्या माध्यमातून प्राप्त होणाऱ्या उत्पन्नातून बफर वनक्षेत्रातील गावांमध्ये हँडपंप, गॅस सिलिंडरचे वितरण आणि गावातील बेरोजगार युवकांना व्यावसायिक प्रशिक्षण देऊन नोकरी लवण्यात मदत केली जात आहे.

टॅग्स :Tigerवाघ