शहरं
Join us  
Trending Stories
1
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
2
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
3
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
4
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
5
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
6
Uddhav Thackeray: "नशीब..., नाही तर फडणवीस म्हणून 20वे आले असते...!"; मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधत उद्धव ठाकरेंनी भरसभेत नेमकं काय वाचलं?
7
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
8
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
9
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
10
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
11
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार
12
 तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण  
13
“लोकशाहीवर चौफेर हल्ले, चीनला शक्य ते भारत करू शकत नाही”; कोलंबियातून राहुल गांधींची टीका
14
याला म्हणतात ढासू परतावा...! ₹1 च्या शेअरमध्ये तुफान तेजी, ₹184 वर पोहोचला भाव; आता कंपनीनं केली मोठी डील
15
...अन्यथा महाराष्ट्रात निवडणुका होऊ देणार नाही; मनोज जरांगेंनी सरकारविरोधात पुन्हा थोपटले दंड, कोणत्या मागण्या केल्या?
16
IAS Srishti Dabas : शाब्बास पोरी! दिवसा काम अन् रात्री अभ्यास; सुंदर IAS चा नेत्रदीपक प्रवास, अडचणींवर केली मात
17
  ब्रिटनमध्ये ज्यूंच्या प्रार्थनास्थळावर भीषण हल्ला, २ जणांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी, संशयित ठार   
18
IND vs WI, 1st Test Day 1 Stumps : KL राहुल लंगडताना दिसला; कुलदीप पॅड बांधून बॅटिंगसाठी नटला,पण...
19
Manoj Jarange Patil : "मी थोड्या दिवसांचा पाहुणा..."; मनोज जरांगे पाटील यांना अश्रू अनावर, मराठ्यांना भावनिक साद
20
उल्हासनगरात गरब्याच्या ठिकाणी शिवसेना शाखाप्रमुखावर पिस्तूल रोखून गोळीबार करणारा गजाआड 

पेंचमध्ये वाढताहेत वाघ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2018 11:13 IST

उपराजधानीला ‘टायगर कॅपिटल’चा दर्जा मिळवून देण्यात पेंच व्याघ्र प्रकल्पाची भूमिका महत्त्वाची आहे. मागील काही वर्षात पेंच जंगलात वाघांची संख्या चांगलीच वाढत आहे.

ठळक मुद्देतीन गावांसह इतरांच्या पुनर्वसनाचे प्रयत्न२५८ वर्ग किमी कोरमध्ये मानसिंहदेव अभयारण्य

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उपराजधानीला ‘टायगर कॅपिटल’चा दर्जा मिळवून देण्यात पेंच व्याघ्र प्रकल्पाची भूमिका महत्त्वाची आहे. मागील काही वर्षात पेंच जंगलात वाघांची संख्या चांगलीच वाढत आहे.विदर्भात वन्यजीवांनी परिपूर्ण असलेल्या पेंच जंगलाला १९९९ मध्ये पेंच व्याघ्र संरक्षित क्षेत्र म्हणून नोटिफाईड करण्यात आले. यादरम्यान केवळ २५७.२६ वर्ग किमीच्या कोर क्षेत्रासह पेंच सर्वात लहान व्याघ्र प्रकल्प होते. परंतु वन संरक्षणावर अधिक लक्ष दिल्याने पेंचमध्ये वाघांच्या संख्येत वाढ नोंदविल्या जाऊ लागली. यामुळे वाघांचे अधिवास क्षेत्र वाढवण्याच्या प्रयत्नांतर्गत काही वर्षांपूर्वी मानसिंहदेव अभयारण्याचे १८२ वर्ग किमी वनक्षेत्र मिळवून पेंचचे कोर (कॅपिटल हॅबिटेट) क्षेत्र एकूण ४३९.२६ वर्ग किमी झाले आहे. यासोबतच नागलवाडी, सुरेवानी, खुबाळा आदी वन विकास महामंडळ व व प्रादेशिक वन विभागाच्या वनक्षेत्राला बफर क्षेत्र म्हणून पेंचला जोडण्यात आले आहे. याप्रकारे पेंच व्याघ्र संरक्षित क्षेत्राचे एकूण क्षेत्रफळ ७४१.२६ वर्ग किमी झाले आहे. यानंतर पेंचमध्ये वाघांची संख्या २०१३-१४ मध्ये १९ वरून वाढून २०१६-१७ मध्ये ४४ पर्यंत पोहोचली आहे.ही माहिती वन्यजीव सप्ताहांतर्गत आयोजित पत्रपरिषदेत पेंच व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक रविकिरण गोवेकर यांनी दिली. त्यांनी सांगितले की, २०१७-१८ च्या व्याघ्र गणनेचा रिपोर्ट जानेवारी २०१९ पर्यंत स्पष्ट होईल. गोवेकर यांनी सांगितले की, वन्यजीवांच्या क्षेत्रात मानवाचा हस्तक्षेप कमी करण्याच्या उद्देशाने कोर क्षेत्राला लागून असलेल्या घाटकोपरा, सालईघाट, फिरंगीसरा आणि इतर गावांतील गावकऱ्यांच्या सहमतीने वनक्षेत्रातून बाहेर पुनर्वसन करण्याचे प्रयत्न केले जात आहे.दुसरीकडे तोतलाडोह कॉलनी पूर्णपणे हटवून फुलझरी गावाच्या अर्ध्या गावकऱ्यांचे वनक्षेत्राच्या बाहेर पुनर्वसन करण्यात आलेले आहे. वन परिक्षेत्र अधिकारी सचिन जाधव यांच्यानुसार केवळ नागलवाडी परिक्षेत्रांतर्गत ११ वाघ आणि ६ वाघाच्या बछड्यांची उपस्थिती नोंदविण्यात आली आहे. वन विकास महामंडळाचे वनक्षेत्र पेंचमध्ये सामील झाल्याने वन्यजीवांना आता विस्तीर्ण हिरवेगार जंगल उपलब्ध झाले आहे.पर्यटनातून गावातील विकास कामेक्षेत्र संचालक गोवेकर यांनी सांगितले की, पेंचमध्ये वर्ष २०१७-१८ मध्ये २९,३४९ पर्यटकांकडून २ कोटी १ लाख ९३ हजार रुपयाचा महसूल मिळाला आहे. पर्यटन हा मुख्य उद्देश नाही. परंतु पर्यटनाच्या माध्यमातून प्राप्त होणाऱ्या उत्पन्नातून बफर वनक्षेत्रातील गावांमध्ये हँडपंप, गॅस सिलिंडरचे वितरण आणि गावातील बेरोजगार युवकांना व्यावसायिक प्रशिक्षण देऊन नोकरी लवण्यात मदत केली जात आहे.

टॅग्स :Tigerवाघ