शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
3
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
4
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
5
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
6
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
7
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
8
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
9
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
10
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
11
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
12
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
13
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
14
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
15
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
16
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
17
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
18
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
19
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
20
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)

काेंढाळी परिसरात वाघाची दहशत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:07 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क काेंढाळी : काेंढाळी (ता. काटाेल) व कारंजा (घाडगे) (जिल्हा वर्धा) वनपरिक्षेत्राच्या सीमावर्ती भागात वाघाचा वावर वाढला ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

काेंढाळी : काेंढाळी (ता. काटाेल) व कारंजा (घाडगे) (जिल्हा वर्धा) वनपरिक्षेत्राच्या सीमावर्ती भागात वाघाचा वावर वाढला असून, या वाघाने महिनाभरात कारंजा (घाडगे) तालुक्यातील दाेन शेतकऱ्यांचा बळी घेतला आहे. हा वाघ काेंढाळी परिसरात फिरत येत असल्याने या भागात प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. त्यामुळे या भागातील मजूर शेतात कामाला जाण्यास धजावत नाहीत.

वाघाने शेतकऱ्याचा बळी घेतल्याच्या दाेन्ही घटना राहटी (तार. कारंजा घाडगे) शिवारात घडल्या आहेत. हा परिसर काेंढाळी लगत असल्याने, तसेच तेथील नागरिक काेंढाळी परिसरातील नागरिकांच्या सतत संपर्कात येत असल्याने याही भागात वाघाची दहशत निर्माण झाली आहे. या भागातील नागपूर जिल्ह्यातील (ता. काटाेल) मासोद, कामठी, घोटीवाडा, खैरी, खापरी, तसेच वर्धा जिल्ह्यातील (ता. कारंजा घाडगे) धानोली, नागाझिरी, उंबरविहिरी या परिसरात वाघ व बिबट यांची संख्या वाढली आहे, अशी माहिती वन अधिकाऱ्यांनी दिली असून, हा भाग बाेर (जिल्हा वर्धा) व्याघ्र प्रकल्पालगत असल्याचेही सांगितले.

नागपूर व वर्धा जिल्ह्यांच्या सीमावर्ती गावांमधील मजूर शेतीच्या कामासाठी दाेन्ही जिल्ह्यांतील शिवारात जातात. वाघाच्या दहशतीमुळे त्यांनी शेतात कामाला जाणे बंद केले असून, एकीकडे मजुरांवर आर्थिक संकट काेसळले आहे, तर दुसरीकडे शेतकऱ्यांचे पीक मशागतीअभावी खराब हाेण्याची वेळ ओढवली आहे. त्यामुळे वाघाचा बंदाेबस्त करून ही समस्या साेडविण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

...

खाद्याच्या शाेधात गावांकडे मार्चा

वाघ व बिबट्यांच्या संख्येच्या तुलनेत या भागातील जंगलाचा आकार लहान झाला आहे. जंगलात पुरेसे खाद्य मिळत नसल्याने ते खाद्य व पाण्याच्या शेतात गावाकडे येतात. त्यातून शेतकरी व मजुरांवरील त्यांच्या हल्ल्यात वाढत आहेत. जंगलालगतच्या पठारी भागात चरायला जाणारी गुरे या हिंस्त्र पशूंच्या पथ्यावर पडतात. वाघाच्या हल्ल्यात श्रीराम मुक्ता बिटने (वय ७२, रा. राहटी, ता. कारंजा घाडगे, जिल्हा वर्धा) या गुराख्याचा १ जुलै राेजी मृत्यू झाला. वाघाने त्याचे डाेके शरीरापासून वेगळे केले हाेते. महिनाभरापूर्वी वाघाने नांदाेरा शिवारात एका, तर त्यापूर्वी दाेन शेतकऱ्यांचा बळी घेतला.

......

वाघाने दाेघांचा बळी घेतल्यानंतर काेंढाळी वनपरिक्षेत्रातील घुबडी, खापा, घोटीवाडा, कावडीमेट, किनकीडोडा या भागात कार्यरत असलेल्या सर्व वन अधिकारी व कर्मचाऱ्यांना अलर्ट करण्यात आले आहे. या भागात गस्त वाढविली आहे. सीमावर्ती भागातील शेतकरी, मजूर व इतरांनी अंधार हाेण्यापूर्वी घरी परत यावे. रात्रीच्या वेळी अथवा पहाटेच्या सुमारास कुणीही त्यांच्या जंगलालतच्या शेतात जाऊ नये.

- फरीद आझमी, वनपरिक्षेत्र अधिकारी,

काेंढाळी, ता. काटाेल.