शहरं
Join us  
Trending Stories
1
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
2
ठाकरे गटाला पुन्हा कोकणात मोठा धक्का; बडे पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा रामराम, भाजपात प्रवेश
3
DSP सिराजला इंग्लिश बॅटर बेन डकेटशी पंगा घेणं पडलं महागात! ICC नं फाडलं 'चलान'
4
अनिल अग्रवाल याच्या वेदांतानं भाजपला चार पट जास्त देणगी दिली, काँग्रेसच्या देणगीत मोठी घट, रिपोर्टमधून खुलासा
5
एकनाथ शिंदेंना ‘संजय’ लाभदायक नाही? विरोधकांनी कोंडी केली; पक्षाची डोकेदुखी वाढली!
6
कर्क संक्रांतीला 'या' पाच राशींच्या आयुष्यात होईल मोठे संक्रमण; येतील अच्छे दिन!
7
“एसटीचे कदापि खाजगीकरण होऊ देणार नाही”; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
8
निमिषा प्रियाची फाशी आता अटळ? ब्लड मनीसाठी ठाम नकार; सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं?
9
आधी कोट्यवधी रुपयांचे घर पाडले, आता प्रशासन छांगूर बाबाकडून पाडण्याचा खर्च ८ लाख ५५ हजार रुपये वसूल करणार
10
Ahilyanagar: पोलिसांना बघून धरणात मारल्या उड्या, एका चोराचा बुडून मृत्यू, तर दुसरा...
11
Astro Tips: बायपाससारख्या मोठ्या शस्त्रक्रीया होण्यामागे कारणीभूत असते 'ही' ग्रहस्थिती!
12
एकदाच गुंतवणूक करा... दरमहा २०,००० रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, कोण घेऊ शकतो लाभ?
13
Formal ED Chief Karnal Singh: नेते आणि गुन्हेगार कसे ब्लॅक मनीला व्हाईट मनी बनवतात; ED च्या माजी प्रमुखांचा गौप्यस्फोट
14
अलर्ट! गुगल वाचू शकतं तुमचे WhatsApp मेसेज; फक्त 'ही' सेटिंग बदलून राहा सेफ
15
पाय घसरून पुराच्या पाण्यात वाहून गेली महिला, १० तास चालला मृत्यूशी संघर्ष, अखेर ६० किमी अंतरावर झाली सुखरूप सुटका
16
मोठी बातमी! मनपा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंना मिळणार 'कौल'?; सुप्रीम कोर्टात आज काय घडलं? 
17
Vivo X200 FE: विवोच्या नव्या फोनची बाजारात दहशत; थेट अ‍ॅपलशी स्पर्धा? गुगल, सॅमसंगनेही डोक्याला लावला हात!
18
शेजारच्या देशात एअरस्ट्राईक, ड्रोन-मिसाइलच्या सहाय्यानं जबरदस्त हल्ला; भारतानं दिलं उत्तर!
19
Countries Without Rivers: जगातल्या 'या' ६ देशांमध्ये एकही नदी नाही! मग, कशी भागवतात लोकांची तहान?
20
“जयंत पाटील अन्य पक्षात जाणार असतील, तर त्यांना शिंदेसेनेत आणू”; कोणत्या नेत्यांचा निर्धार?

काेंढाळी परिसरात वाघाची दहशत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:07 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क काेंढाळी : काेंढाळी (ता. काटाेल) व कारंजा (घाडगे) (जिल्हा वर्धा) वनपरिक्षेत्राच्या सीमावर्ती भागात वाघाचा वावर वाढला ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

काेंढाळी : काेंढाळी (ता. काटाेल) व कारंजा (घाडगे) (जिल्हा वर्धा) वनपरिक्षेत्राच्या सीमावर्ती भागात वाघाचा वावर वाढला असून, या वाघाने महिनाभरात कारंजा (घाडगे) तालुक्यातील दाेन शेतकऱ्यांचा बळी घेतला आहे. हा वाघ काेंढाळी परिसरात फिरत येत असल्याने या भागात प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. त्यामुळे या भागातील मजूर शेतात कामाला जाण्यास धजावत नाहीत.

वाघाने शेतकऱ्याचा बळी घेतल्याच्या दाेन्ही घटना राहटी (तार. कारंजा घाडगे) शिवारात घडल्या आहेत. हा परिसर काेंढाळी लगत असल्याने, तसेच तेथील नागरिक काेंढाळी परिसरातील नागरिकांच्या सतत संपर्कात येत असल्याने याही भागात वाघाची दहशत निर्माण झाली आहे. या भागातील नागपूर जिल्ह्यातील (ता. काटाेल) मासोद, कामठी, घोटीवाडा, खैरी, खापरी, तसेच वर्धा जिल्ह्यातील (ता. कारंजा घाडगे) धानोली, नागाझिरी, उंबरविहिरी या परिसरात वाघ व बिबट यांची संख्या वाढली आहे, अशी माहिती वन अधिकाऱ्यांनी दिली असून, हा भाग बाेर (जिल्हा वर्धा) व्याघ्र प्रकल्पालगत असल्याचेही सांगितले.

नागपूर व वर्धा जिल्ह्यांच्या सीमावर्ती गावांमधील मजूर शेतीच्या कामासाठी दाेन्ही जिल्ह्यांतील शिवारात जातात. वाघाच्या दहशतीमुळे त्यांनी शेतात कामाला जाणे बंद केले असून, एकीकडे मजुरांवर आर्थिक संकट काेसळले आहे, तर दुसरीकडे शेतकऱ्यांचे पीक मशागतीअभावी खराब हाेण्याची वेळ ओढवली आहे. त्यामुळे वाघाचा बंदाेबस्त करून ही समस्या साेडविण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

...

खाद्याच्या शाेधात गावांकडे मार्चा

वाघ व बिबट्यांच्या संख्येच्या तुलनेत या भागातील जंगलाचा आकार लहान झाला आहे. जंगलात पुरेसे खाद्य मिळत नसल्याने ते खाद्य व पाण्याच्या शेतात गावाकडे येतात. त्यातून शेतकरी व मजुरांवरील त्यांच्या हल्ल्यात वाढत आहेत. जंगलालगतच्या पठारी भागात चरायला जाणारी गुरे या हिंस्त्र पशूंच्या पथ्यावर पडतात. वाघाच्या हल्ल्यात श्रीराम मुक्ता बिटने (वय ७२, रा. राहटी, ता. कारंजा घाडगे, जिल्हा वर्धा) या गुराख्याचा १ जुलै राेजी मृत्यू झाला. वाघाने त्याचे डाेके शरीरापासून वेगळे केले हाेते. महिनाभरापूर्वी वाघाने नांदाेरा शिवारात एका, तर त्यापूर्वी दाेन शेतकऱ्यांचा बळी घेतला.

......

वाघाने दाेघांचा बळी घेतल्यानंतर काेंढाळी वनपरिक्षेत्रातील घुबडी, खापा, घोटीवाडा, कावडीमेट, किनकीडोडा या भागात कार्यरत असलेल्या सर्व वन अधिकारी व कर्मचाऱ्यांना अलर्ट करण्यात आले आहे. या भागात गस्त वाढविली आहे. सीमावर्ती भागातील शेतकरी, मजूर व इतरांनी अंधार हाेण्यापूर्वी घरी परत यावे. रात्रीच्या वेळी अथवा पहाटेच्या सुमारास कुणीही त्यांच्या जंगलालतच्या शेतात जाऊ नये.

- फरीद आझमी, वनपरिक्षेत्र अधिकारी,

काेंढाळी, ता. काटाेल.