शहरं
Join us  
Trending Stories
1
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
2
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
3
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
4
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
5
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
6
जुगाराच्या व्यसनामुळे बनला 'चोर'; वडिलांशी खोटं बोलून मित्रांच्या नावाने घेतलं ३३ लाखांचं कर्ज
7
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
8
मेट्रोचे सर्व टप्पे २०२६च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरता खुले होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
“आता रिकामे ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या, चुकलो असेन तर...”; धनंजय मुंडेंची भरसभेत विनंती
10
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
11
VIDEO: आईची माया! सिंहीणने रेडकूवर घातली झडप, म्हशीने शिंगाने लावलं उडवून अन् पुढे...
12
बगरम हवाई तळावर अमेरिकेचा 'डोळा'; ट्रम्प यांना आता का हवंय अफगाणिस्तानचं 'एअरफील्ड'?
13
ज्या सुटकेसवर बसून रील बनवलं, त्यातच तिला भरून नदीत फेकलं; लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
14
कहो ना कहो...! इमरान हाश्मीसमोर गाताना राघव जुयालच्या डोळ्यात आलेलं पाणी, म्हणाला...
15
आजपासून स्वस्त झालं Rail Neer; जीएसटी रिव्हिजननंतर रेल्वेनं कमी केली MRP
16
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
17
स्टार क्रिकेटपटूने निवृत्ती घेतली मागे, आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये करणार पुनरागमन  
18
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
19
"५० हजार देतो, शरीरसंबंध ठेव", मुलाच्या वयाच्या निर्मात्याने अभिनेत्रीकडे केलेली धक्कादायक मागणी
20
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली

काेअर झाेनमधील पर्यटनबंदीला व्याघ्र प्रकल्पांचाच खाेडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2022 08:20 IST

Nagpur News देशातील सर्व व्याघ्र प्रकल्पांच्या काेअर झाेनमधील पर्यटन पूर्णपणे बंद करण्याबाबत राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण (एनटीसीए)चा आदेश सर्व प्रकल्पांच्या प्रशासनाकडे धडकला आहे.

ठळक मुद्देवाघांचा प्रश्न, महसूल बुडण्याची भीती

निशांत वानखेडे

नागपूर : देशातील सर्व व्याघ्र प्रकल्पांच्या काेअर झाेनमधील पर्यटन पूर्णपणे बंद करण्याबाबत राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण (एनटीसीए)चा आदेश सर्व प्रकल्पांच्या प्रशासनाकडे धडकला आहे. काेअर झाेनमध्ये पर्यटनाचा अतिरेक हाेत असल्याने व्याघ्र प्रकल्पाच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासला जात असल्याचे कारण त्यात आहे. मात्र, प्रकल्पांमध्ये आदेशाची अंमलबजावणी दिसत नसल्याने वन विभागाच्या अधिकाऱ्यांनाच ताे आदेश मान्य नाही का, असा सवाल निर्माण हाेत आहे.

केंद्रीय वने व पर्यावरणमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ५ जानेवारी २०२२ ला एनटीसीएची १९ वी बैठक पार पडली. या बैठकीत व्याघ्र प्रकल्पातील पर्यटन प्रबंधनाचे नियम कठाेरपणे लागू करण्याचे सूचित करण्यात आले. प्रकल्पांचे मुख्य क्षेत्र म्हणजे काेअर क्षेत्रात पूर्णपणे ‘नाे एन्ट्री झाेन’ असावे, असे आदेशात सांगण्यात आले. उर्वरित क्षेत्रातच पर्यटनाला परवानगी देण्यात यावी, असे आदेश काढण्यात आले आहेत. १५ फेब्रुवारीदरम्यान एनटीसीएचे आदेश देशातील सर्व व्याघ्र प्रकल्पांकडे पाेहोचले. मात्र, व्याघ्र प्रकल्पांमध्ये याबाबत सकारात्मकता दिसून येत नाही.

वाघ संवर्धन याेजनेतच समावेश

-व्याघ्र प्रकल्पांच्या व्याघ्र संवर्धन याेजनेच्या (टीसीपी) नियमावलीमध्ये आधीच वाघांच्या संवर्धनासह काेअर झाेनमधील पर्यटन टप्प्याटप्प्याने बंद करण्याच्या नियमाचा समावेश आहे.

-यासह बफर क्षेत्राच्या पर्यटनासाठी केवळ इलेक्ट्रिक वाहनांनाच प्रवेश आहे.

-रिसाॅर्टचे नियमन तसेच वनक्षेत्राला लागून असलेल्या गावातील नागरिकांना राेजगाराला प्राधान्य देण्यास सांगण्यात आले आहे.

-सुरक्षित क्षेत्रात पर्यटनाचा अतिरेक.

-व्याघ्र प्रकल्पाच्या काेअर झाेनमध्ये केवळ २० टक्के पर्यटनाला परवानगी असून, टप्प्याटप्प्याने तेही बंद करण्यास सांगितले आहे.

-सुरक्षित पर्यटनाच्या आड काेअर क्षेत्रात माेठ्या प्रमाणात पर्यटनाला परवानगी देण्यात आली. हळूहळू पर्यटन लाॅबी तयार झाली.

-काेअर क्षेत्रात पर्यटनाचा अतिरेक झाला. काेअर झाेनजवळच श्रीमंतांचे रिसाॅर्ट तयार झाले.

-आतातर रात्रीचे पर्यटनही सुरू करण्याचा घाट घातला जात असून, यामुळे वन्यप्रेमींमध्ये असंताेष आहे.

म्हणून मानव-वन्यजीव संघर्ष

केंद्रीय वने, पर्यावरण व हवामान बदल मंत्रालयाच्या समितीचे सदस्य सुरेश चाेपणे यांच्या मते पर्यटनाच्या अतिरेकामुळे व्याघ्र संवर्धनाच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासला जात आहे. व्याघ्र संवर्धन हा मूळ उद्देश बाजूला पडून पर्यटन व महसूल याला प्राधान्य मिळत आहे. मानवी हालचाली वाढल्याने वाघांच्या व इतर वन्यजीवांच्या अधिवासावर फरक पडला.

टॅग्स :Tigerवाघ