शहरं
Join us  
Trending Stories
1
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
2
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
3
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
4
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
5
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
6
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
7
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
8
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
9
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
10
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
11
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
12
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
13
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
14
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
15
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
16
आजचा अग्रलेख: चटका लावणारा चकवा
17
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
18
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
19
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
20
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...

पाच वर्षात राज्यातील वाघांच्या संख्येत ६४ टक्यांनी वाढ : वनविभागाचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 00:27 IST

राज्यातील वाघांच्या संख्येमध्ये मागील पाच वर्षात ६४ टक्यांनी वाढ झाल्याचा दावा वनविभागाने केला आहे. २०१४ साली राज्यात १९० वाघ होते. त्यात वाढ होवून आता २०१९ मध्ये ३१२ इतके झाले आहेत. या सोबतच देशातील वाघांच्या संख्येतही वाढ झाल्याची नोंद आहे. २०१८ च्या व्याघ्रगणनेनंतर देशात २ हजार ९६७ वाघांची नोंद घेण्यात आली आहे.

ठळक मुद्दे१९० वरून व्याघ्रसंख्या पोहचली ३१२ वर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यातील वाघांच्या संख्येमध्ये मागील पाच वर्षात ६४ टक्यांनी वाढ झाल्याचा दावा वनविभागाने केला आहे. २०१४ साली राज्यात १९० वाघ होते. त्यात वाढ होवून आता २०१९ मध्ये ३१२ इतके झाले आहेत. या सोबतच देशातील वाघांच्या संख्येतही वाढ झाल्याची नोंद आहे. २०१८ च्या व्याघ्रगणनेनंतर देशात २ हजार ९६७ वाघांची नोंद घेण्यात आली आहे.महाराष्ट्रात २००६ साली १०३ वाघ होते. ते २०१० मध्ये वाढून १६८ झाले. २०१४ साली झालेल्या व्याघ्र गणनेत ही संख्या आणखी वाढून १९० झाली. तर मागील चार वर्षात राज्यातील वाघांच्या संख्येत अंदाजे ६५ टक्के वाढ होऊन आता ही संख्या ३१२ इतकी झाली आहे. वाघांच्या संख्येत महाराष्ट्र देशात पाचव्या स्थानावरून चौथ्या स्थानावर आला आहे.राज्यात बोर, मेळघाट, पेंच, नवेगाव नागझिरा आणि सह्याद्री, ताडोबा-अंधारी असे सहा व्याघ्र प्रकल्प आहेत. या क्षेत्रात स्थानिकांच्या सहभागातून वाघांचे संरक्षण आणि संवर्धन करण्याला वन विभागाने प्राधान्य दिले आहे.देशातील वाघांची संख्या २ हजार ९६७भारतीय वन्यजीव संस्था, डेहरादून आणि राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण यांच्या संयुक्तविद्यमाने देशात दर चार वर्षांनी व्याघ्र गणना करण्यात येते. त्यानुसार देशात पहिली व्याघ्र गणना २००६ साली झाली, तेव्हा देशात १ हजार ४११ वाघ होते. सन २०१० साली दुसऱ्या गणनेमध्ये १ हजार ७०६, सन २०१४ साली तिसºया गणनेमध्ये २ हजार २२६ वाघ होते. आता २०१८ च्या व्याघ्रगणनेनंतर देशात २ हजार ९६७ वाघांची नोंद झाली आहे.व्याघ्रप्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील गावांमधील स्थानिकांचे वनावरचे अवलंबित्व कमी व्हावे, मानव वन्यजीव संघर्ष कमी व्हावा याउद्देशाने डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजना राबविली जात आहे. योजनेमध्ये समाविष्ट गावांमध्ये जन, जल, जमीन आणि जंगल याची उत्पादकता वाढवतांना मानव वन्यजीव संघर्ष कमी करण्याच्या उद्देशाने प्रयत्न करण्यात येतात. त्याचे हे फलित आहे.सुधीर मुनगंटीवार, वनमंत्रीव्याघ्रसंवर्धन आणि राज्येराज्य             पूर्वीची संख्या           आताची संख्यामध्यप्रदेश       ३०८                      ५२६कर्नाटक         ४०६                     ५२४उत्तराखंड       ३४०                     ४४२महाराष्ट           १९०                     ३१२तामिळनाडू     २२९                     २६४

टॅग्स :Tigerवाघforest departmentवनविभाग