शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

वाघाचा हल्ला किरकोळ घटना नाही, जखमीला १ लाख रुपये भरपाई द्या, हायकोर्टाचे वन विभागाला आदेश

By राकेश पांडुरंग घानोडे | Updated: May 28, 2023 18:47 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने वाघाच्या हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या महिलेला एक लाख रुपये भरपाई अदा करण्याचा आदेश वन विभागाला दिला.

नागपूर : वाघाचा हल्ला ही किरकोळ घटना होऊच शकत नाही, असे स्पष्ट मत मुंबईउच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठाने व्यक्त करून वाघाच्या हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या महिलेला एक लाख रुपये भरपाई अदा करण्याचा आदेश वन विभागाला दिला. हे प्रकरण चंद्रपूर जिल्ह्यातील आहे. त्यावर न्यायमूर्तिद्वय रोहित देव व वृषाली जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली.

कविता वामन कोकोडे (३७) असे जखमी महिलेचे नाव असून ती वाकल, ता. सिंदेवाही येथील रहिवासी आहेत. कविता व्यवसायाने मजूर आहे. ती अर्थार्जनासाठी शेतामध्ये मजुरी करीत होती. २४ जानेवारी २०१७ रोजी ती तूर कापण्यासाठी शेतात गेली होती. दरम्यान, पूर्णपणे वाढ झालेल्या वाघाने तिच्यावर हल्ला केला. आजूबाजूचे मजूर मदतीसाठी धावल्यामुळे वाघ जंगलात पळून गेला व ती बचावली. परंतु, तेव्हापर्यंत वाघाने तिला गंभीररित्या जखमी केले. परिणामी, ती बेशुद्ध पडली होती. चंद्रपूर येथील सरकारी रुग्णालयात चार दिवस उपचार केल्यानंतर तिची प्रकृती सुधारली, पण ती घरगुती व मजुरीचे काम करण्यास असक्षम झाली आहे.

कविताने २८ नोव्हेंबर २०१६ रोजीच्या शासन निर्णयानुसार वन विभागाला भरपाईकरिता अर्ज सादर केला होता. परंतु, वाघाच्या हल्ल्यामुळे किरकोळ जखमा झाल्याचा निष्कर्ष काढून तिला केवळ दहा हजार रुपये भरपाई मंजूर करण्यात आली. त्याविरुद्ध कविताने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाने ती याचिका अंशत: मंजूर करून तिला एक लाख रुपये भरपाईसाठी पात्र ठरविले. कवितातर्फे ॲड. संदीप बहीरवार यांनी बाजू मांडली.

वन विभागाला फटकारलेवाघाचा हल्ला परतवून लावल्यामुळे कविताला राज्य सरकारने शौर्य प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले आहे. असे असताना वन विभागाने तिला केवळ दहा हजार रुपये भरपाई दिली. हा निर्णय धक्कादायक आहे, अशा शब्दांत न्यायालयाने वन विभागाला फटकारले. वाघाचा हल्ला साधारण घटना होऊच शकत नाही. वन विभागाने केवळ जखमा पाहिल्या, कविताला बसलेला मानसिक धक्का विचारात घेतला नाही, असेही न्यायालय म्हणाले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयMumbaiमुंबईnagpurनागपूर