शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
2
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
3
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
4
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
5
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
6
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
7
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
8
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
9
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
10
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
11
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
12
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
13
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
14
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
15
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
16
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
17
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
18
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
19
'मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो', कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
20
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी

विधानसभेसाठी 'बायोडाटा' नव्हे, कामगिरीवरच तिकीट : नड्डा, गडकरी यांचे संकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2019 20:51 IST

मागील पाच वर्षांतील कामगिरीच्या आधारावरच एखाद्याला तिकीट द्यायचे की नाकारायचे हे ठरविण्यात येईल, असे स्पष्ट संकेत भाजपचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जे.पी.नड्डा व केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी बुधवारी दिले.

ठळक मुद्देसंकल्प मेळाव्यातून फुंकले प्रचाराचे रणशिंग

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आगामी विधानसभा निवडणुकांसाठी भाजपकडून तिकिटासाठी दावेदारांची मोठी यादी आहे. अनेक जण मोठ्या नेत्यांकडे आशीर्वाद घेण्यासाठी जात आहेत तर बरेच लोक ‘बायोडाटा’ सादर करत आहेत. मात्र पक्षाकडे सर्वांचीच कुंडली आहे. मागील पाच वर्षांतील कामगिरीच्या आधारावरच एखाद्याला तिकीट द्यायचे की नाकारायचे हे ठरविण्यात येईल, असे स्पष्ट संकेत भाजपचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जे.पी.नड्डा व केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी बुधवारी दिले. नागपुरात संकल्प मेळाव्यादरम्यान दोघाही राष्ट्रीय नेत्यांनी विदर्भातील भाजप नेते-पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.कविवर्य सुरेश भट सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला राज्याचे भाजपाचे राष्ट्रीय सहसंघटनमंत्री व्ही.सतीश, राज्य प्रभारी सरोज पांडे, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, कृषिमंत्री अनिल बोंडे, आदिवासी विकासमंत्री अशोक उईके, गृहराज्यमंत्री डॉ.रणजित पाटील, ऊर्जा राज्यमंत्री मदन येरावार, विदर्भ विकास मंडळाचे अध्यक्ष आ.चैनसुख संचेती, माजी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर, माजी खासदार दत्ता मेघे व अजय संचेती, महापौर नंदा जिचकार, शहराध्यक्ष प्रवीण दटके, जिल्हाध्यक्ष डॉ.राजीव पोतदार यांच्यासह विदर्भातील आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी उपस्थित होते. भाजपाकडे आजच्या तारखेत नेतादेखील आहे आणि योग्य नीतीदेखील आहे. पक्षाकडून काही तरी मिळालेच पाहिजे ही अपेक्षा न बाळगता कार्यकर्त्यांनी विचारधारेवर कायम राहून काम केले पाहिजे. निवडणुकांच्या काळात दावेदारांकडे दोनच डोळे असतात, मात्र त्यांना हजारो डोळे पाहत असतात. त्यामुळे सर्वांनी पक्षाला आपले समजून काम केले पाहिजे. प्रत्येक नेत्याला आपल्या अंतर्गत येणाºया किमान पाच ‘बूथ’ची इत्थंभूत माहिती पाहिजे. जर नेता व्हायचे असेल तर ‘बूथ’वरदेखील काम केलेच पाहिजे व तळागाळापर्यंत पोहोचले पाहिजे, असे प्रतिपादन जे.पी.नड्डा यांनी केले.५४ दिवसात वाढले ६ कोटी सदस्यभाजपाच्या नोंदणीकृत सदस्यांची संख्या ११ कोटी होती. पक्षाने देशभरात सदस्यता मोहीम सुरु केली व ५४ दिवसात ही संख्या १७ कोटींवर गेली आहे, अशी माहिती जे.पी.नड्डा यांनी दिली. डावे पक्ष व भाजप हे दोनच पक्ष विचारसरणीवर चालत आहेत. इतर सर्व पक्षांमध्ये घराणेशाहीच सुरू असल्याचे प्रतिपादन करत त्यांनी कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसवर अप्रत्यक्षपणे टीका केली. कलम ३७० च्या आडून जम्मू-काश्मीरला देशापासून तोडण्याचा प्रयत्न सुरू होता व कॉंग्रेसचे नेतेदेखील यात सहभागी होते, असा आरोपदेखील त्यांनी लावला.गडकरींना विश्वास, युती होणारविधानसभेसाठी भाजप सेना युती होईल असे वाटते. भाजपला मागील वेळेपेक्षा राज्यात जास्त जागा मिळतील. विदर्भात १०० टक्के जागांवर विजय मिळेल व देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात परत राज्यात सरकार बनेल, असा विश्वास नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. केवळ सत्ता मिळविणे हे भाजपचे ध्येय नाही. राष्ट्र, समाज बदलायचे आहे. लोकशाहीला जिवंत ठेवायचे आहे, असेदेखील ते म्हणाले.भाजपमध्ये तिकीटवाटपासाठी कुठलाच ‘कोटा’ नाहीयावेळी नितीन गडकरी यांनी तिकीटवाटपादरम्यानच्या कार्यकर्त्यांच्या अपेक्षा व नाराजी यावर भाष्य केले. आता कार्यकर्ते निवडणुकीच्या 'मोड'मध्ये असून तिकीट कुणाला मिळणार याची चर्चा दिसून येते. आशीर्वाद मागणाऱ्यांची संख्या वाढली आहे. कार्यकर्त्यांनी तिकिटाची अपेक्षा करणे यात काहीच गैर नाही. परंतु भाजपमध्ये तिकीट वाटपासाठी कुठलाही 'कोटा' नाही. कार्याचे मूल्यांकन होऊन तिकीट वाटप होईल. ज्याला तिकीट मिळेल त्याच्या पाठीशी भक्कमपणे उभे रहा, असे आवाहन गडकरी यांनी केले.गडकरींनी टोचले नेत्यांचे कानभाषणादरम्यान गडकरी यांनी आपल्या नातेवाईकांसाठी तिकीट मागणाऱ्या नेत्यांचे कानदेखील टोचले. काही खासदार, आमदार आपल्यामुळेच विजय मिळत असल्याच्या तोऱ्यात वावरतात. मात्र खरा विजय कार्यकर्त्यांमुळे होतो. विजयाचा अहंकार कुणीही करु नये. काही नेते मुलगा, पत्नीसाठी तिकीट मागतात. परंतु भाजपमध्ये अशी नातेवाईकांना थेट तिकीट मिळतच नाहीत. तसे नेत्याचा मुलगा किंवा नातेवाईक असणे गुन्हा नाही. मात्र अशी मागणी जनतेने केली तरच कुटुंबीयांना तिकीट देण्याबाबत विचार होऊ शकतो, असे गडकरी यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :BJPभाजपाPoliticsराजकारण