शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
3
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
4
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
5
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
6
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
7
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
8
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
9
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
10
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
11
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
12
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
13
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
14
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
15
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
16
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
17
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
18
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
19
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
20
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत

मोफत धान्यासाठी ई-पॉसवर अंगठा, वाढविणार कोरोनाचा धोका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:06 IST

नागपूर : राज्य सरकारने वाढत्या कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी १५ एप्रिलपासून लॉकडाऊन लावले. लॉकडाऊनमध्ये गरीब आणि दारिद्र्य रेषेखालील कुटुंबीयांची उपासमार ...

नागपूर : राज्य सरकारने वाढत्या कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी १५ एप्रिलपासून लॉकडाऊन लावले. लॉकडाऊनमध्ये गरीब आणि दारिद्र्य रेषेखालील कुटुंबीयांची उपासमार होऊ नये म्हणून शिधापत्रिकाधारकांना प्रतिव्यक्ती ५ किलो धान्य मोफत देण्याचा निर्णय घेतला. १ मेपासून मोफत धान्याचे वितरण करण्याचे प्रशासनाने निर्देश दिले आहे. पण धान्य वितरणात ई-पॉस मशीनचा मोठा खोडा आहे. मशीनवर शिधापत्रिकाधारकांना अंगठा लावायचा आहे. पण शिधापत्रिकाधारकांचा अंगठा, कोरोनाचा धोका वाढविणार अशी भीती रेशन दुकानदारांना आहे. कोरोना काळात पॉस मशीनवरील धान्याचे वितरण बंद करावे, अशी मागणी सातत्याने रेशन दुकानदार करीत आहेत. परंतु शासनाचे त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने नागपूर जिल्ह्यातील रेशन दुकानदारांनी वितरण बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

मार्च २०२० मध्ये केंद्र सरकारने लॉकडाऊन लावले. त्यावेळी रेशन दुकान अनेक कुटुंबीयांसाठी आधार ठरले. तेव्हाही अन्न सुरक्षा योजनेंतर्गत सरकारने ५ किलो धान्य मोफत वाटले. आता राज्य सरकारने लॉकडाऊन लावले आहे. गरिबांची उपासमार होऊ नये म्हणून मोफत धान्य वितरण होणार आहे. सरकारने पुन्हा १५ दिवस लॉकडाऊन वाढविला आहे. त्यामुळे शिधापत्रिकाधारकांच्या पोटापाण्याची सोय मोफत धान्य देऊन केली आहे. नागपूर जिल्ह्यात १३०० रेशन दुकाने आहेत. नागपूर जिल्ह्यातील रेशन दुकानदारांनी धान्याच्या वितरणास नकार दिला आहे. गेल्या वर्षभरात अनेक दुकानदार पॉझिटिव्ह आले आहे. काहींचा मृत्यूही झाला आहे. त्याला पॉस मशीन कारणीभूत असल्याचे रेशन दुकानदारांचे म्हणणे आहे. त्यामुळे शासनाने दुकानदारांना नॉमिनी करून द्यावे अशी मागणी रेशन दुकानदार संघटनांची आहे.

शिधापत्रिकाधारक

ग्रामीण

अंत्योदय - ७७,०७८

प्राधान्य - ३,१५,०८२

शहर

अंत्योदय - ४४,६८८

प्राधान्य - ३,३१,७६६

- रेशन वितरण करणार नाही

आम्ही १ मे रोजी ई-पॉस मशीन पुरवठा कार्यालयात जमा करणार आहोत. आम्ही वर्षभरापासून सरकारकडे रेशन दुकानदारांना पॉस मशीनद्वारे डीलर नॉमिनी करून द्यावी अशी मागणी करीत आहोत. त्याचबरोबर आम्हालाही विमा कवच द्यावे, अशी आमची मागणी आहे. पण शासनाचे लक्षच नाही. त्यामुळे आजपासून रेशन वितरण करणार नाही.

गुड्डु अग्रवाल, अध्यक्ष, रेशन दुकानदार संघ

- अजून मोफत धान्याची उचल व्हायची आहे

मे महिन्याच्या नियमित धान्याची उचल करण्याचा शुक्रवारचा शेवटचा दिवस होता. मोफत धान्याची उचल १ मे पासून करणार होतो. पण १ मे रोजी महाराष्ट्र दिन असल्याने एफसीआयला सुटी असते. दुसऱ्या दिवशी रविवार आला आहे. त्यामुळे सोमवारनंतरच उचल होईल. शिवाय केंद्र सरकारकडून पॉस मशीनमध्ये धान्याचे फीडिंग व्हायचे आहे. रेशन दुकानदारांकडून संपाचा इशारा दिला आहे. त्यासंदर्भात विभागाच्या सचिवांसोबत व्हीसी झाली. राज्य सरकार रेशन दुकानदारांच्या मागणीसंदर्भात केंद्र सरकारशी चर्चा करीत आहे. त्यावर सकारात्मक निर्णय होईल. विभागाचीही रेशन दुकानदार संघटनांसोबत चर्चा झाली आहे. त्यांनी धान्य वितरणास सकारात्मकता दर्शविली आहे. असे काही होणार नाही, धान्याचे वितरण सुरळीत होईल.

रोहिणी पाठराबे, शहर पुरवठा अधिकारी