शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
2
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
3
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
4
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
5
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
6
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
7
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
10
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
11
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
12
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
13
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
14
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
15
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
16
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
17
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
18
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
19
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
20
काँग्रेस नेते शशी थरुर अचानक रशिया दौऱ्यावर; रशियन परराष्ट्र मंत्र्यांची घेतली भेट, कारण काय?

ट्रॉली उलटून तीन कामगार ठार

By admin | Updated: April 9, 2016 03:08 IST

विजेचे खांब घेऊन जात असलेल्या ट्रॅक्टरची ट्रॉली उलटल्याने तीन कामगारांचा दबून घटनास्थळीच मृत्यू झाला.

चार गंभीर : बोरीघिवारी शिवारातील घटनाकोदामेंढी : विजेचे खांब घेऊन जात असलेल्या ट्रॅक्टरची ट्रॉली उलटल्याने तीन कामगारांचा दबून घटनास्थळीच मृत्यू झाला. अन्य चार कामगार गंभीर जखमी झाले. ही घटना मौदा तालुक्यातील तोंडली - वायगाव मार्गावरील बोरी (घिवारी) शिवारात शुक्रवारी सकाळी ११.४५ वाजताच्या सुमारास घडली. मृत तिन्ही कामगार कोदामेंढीचे असल्याने गुडीपाडव्याच्या दिवशी गावात शोककळा पसरली. विकास वसंता मोहनकर (२१), सुजीत कचरू सलामे (२५) आणि कार्तिक गेंदलाल वरखडे (२२) तिघेही रा. कोदामेंढी, ता. मौदा अशी मृत कामगारांची नावे असून, जखमींमध्ये राजकुमार बिरशा पंधरे (४०, रा. कोदामेंढी, ता. मौदा), धनराज पूरण गाडेकर (४७, रा. शिवाडौली, ता. मौदा), देवचंद अंकला चटवापाच (४५, रा. शिवाडौली, ता. मौदा) व अतुल तुळशीराम हटवार (२०, रा. कोदामेंढी, ता. मौदा) या चार कामगारांचा समावेश आहे. मौदा तालुक्यात विजेचे खांब बदलविण्याचे काम सुरू आहे. सदर कामाचे कंत्राट रुद्रानी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला देण्यात आले आहे. यातील काही कामांचे कंत्राट जय बजरंग इलेक्ट्रिकल्स कंपनीने रुद्रानी कंपनीकडून घेतले आहे. हे सर्व कामगार या कंपनीकडे खांब उभारण्याचे काम करायचे. दरम्यान, वायगाव शिवारात खांब उभारण्याचे काम सुरू असल्याने या कामगारांनी एमएच- ४०/ए-२७४४ क्रमांकाच्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये विजेच्या खांबासह इतर साहित्य टाकले आणि ते स्वत: ट्रॉलीमध्ये बसून कोदामेंढीहून तोंडली मार्गे वायगावला जाण्यास निघाले. हा ट्रॅक्टर कोदामेंढी येथील कृष्णा मसराम यांच्या मालकीचा आहे. माहिती कळताच नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. त्यांनी ट्रॉलीखाली दबलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यात विकास, सुजीत आणि कार्तिक या तिघांचा डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने घटनास्थळीच मृत्यू झाला. जखमी अतुलला नागपूर येथील मेडिकल हॉस्पिटलमध्ये तर उर्वरित तिघांना भंडारा येथील शासकीय रुग्णालयात भरती करण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर व धोक्याबाहेर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. उत्तरीय तपासणी आटोपल्यानंतर सायंकाळी तिघांच्या पार्थिवावर कोदामेंढी येथील स्मशानभूमीत सामूहिक अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे कोदामेंढी येथे शोककळा पसरली होती. (वार्ताहर)रोडच्या उताराने केला घातया ट्रॉलीमध्ये एका बाजूला चार आणि दुसऱ्या बाजूला तीन असे एकूण सिमेंटचे सात खांब ठेवण्यात आले होते. सारंग मेश्राम हा ट्रॅक्टर चालवित होता. हा ट्रॅक्टर बोरी (घिवारी) शिवारात पोहोचताच ज्या बाजूला चार खांब ठेवण्यात आले होते, त्या बाजूने ट्रॉली उलटली. विशेष म्हणजे, या चार खांबांच्या बाजूने रोडला अधिक उतार होता. ट्रॉली उलटताच ट्रॅक्टर रोडवर आडवा झाला आणि सातही कामगार ट्रॉलीखाली दबल्या गेले. त्यात तिघांचा मृत्यू झाला.