शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा का दिला? अमित शाह म्हणाले, 'जास्त ताणून काहीतरी...'
2
अमित साटम मुंबई भाजपाचे नवे अध्यक्ष; महापालिकेत नवा रेकॉर्ड करणार, CM देवेंद्र फडणवीसांचा दावा
3
अमेरिका ७, चीन ४, भारत १.., ही कोणती यादी, जिथे फक्त दोनच दिग्गजांचं आहे वर्चस्व; यातून काय मिळताहेत संकेत?
4
लहान गुंतवणुकीतून कोट्यधीश होण्यासाठी SIP का आहे बेस्ट? 'हे' ८ मुद्दे ठरतात गेमचेंजर
5
गर्लफ्रेंडशी शरीरसंबंध प्रस्थापित करताना पुरूषाचा मृत्यू, कोर्टाने प्रेमिकेला ठोठवला दंड
6
वराह म्हणजे डुक्कर नाही, तर ते यज्ञरूप आहे; वराह जयंतीनिमित्त जाणून घ्या विष्णूंचे अवतारकार्य
7
गुडन्यूज! परिणीती चोप्रा होणार आई, लग्नाच्या दोन वर्षांनंतर कुणीतरी येणार येणार गं...
8
सरकारच्या एक निर्णयाने अडचणीत आली ₹6,98,44,77,87,200 ची कंपनी; कोण आहेत ड्रीम-11 चे मालक हर्ष जैन? अंबानी कुटुंबाशी खास नातं!
9
एक मुलगा छातीवर बसला, दुसऱ्याने हात-पाय बांधले; रिटायर्ड DSP ना मारहाण; हिसकावलं ATM
10
चौथ्या स्टेजच्या कर्करोगाशी झुंजतेय अभिनेत्री तनिष्ठा चॅटर्जी, तिला सतावतेय ९ वर्षांच्या मुलीची चिंता
11
Prithvi Shaw : संघ बदलला अन् फार्मात आला! पृथ्वी शॉच्या भात्यातून आली आणखी एक कडक खेळी
12
Nikki Murder Case : हुंड्यासाठी निक्कीला जाळून मारलं; पती, सासूनंतर आता दीर आणि सासऱ्यालाही अटक
13
हरितालिका व्रत २०२५: ‘हे’ नियम अवश्य पाळावेत; व्रत पूजनानंतर म्हणावी हरितालिका आरती
14
Latur Crime: लातूर हादरले! नदीत सापडलेल्या सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह; घटना समोर कशी आली?
15
१० वेळा बॉयफ्रेंडसोबत पळाली, आता विवाहित महिलेने ठेवला १५-१५ चा अजब फॉर्म्युला; ऐकून सगळेच हैराण
16
TCS ते इन्फोसिस-विप्रोपर्यंत IT कंपन्यांचे शेअर्स रॉकेट; निफ्टी-सेन्सेक्सही वधारले; का आली अचानक तेजी?
17
"रीलस्टार म्हणजे अभिनेते नाहीत", हास्यजत्रेत प्रसाद ओकचं वक्तव्य; धनंजय पोवार म्हणाला...
18
भाजपा राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी 'बडा' मंत्री शर्यतीत, दोन वर्षांनी घेतली मोहन भागवतांची भेट
19
जगद्गुरू रामभद्राचार्यांनी प्रेमानंद महाराजांना दिले खुले आव्हान; 'संस्कृताचा एक श्लोक तरी...'
20
Bigg Boss 19 : "वाटलं नव्हतं बिग बॉसची ऑफर येईल...", मराठमोळ्या प्रणित मोरेला अजूनही बसत नाहीये विश्वास

ट्रॉली उलटून तीन कामगार ठार

By admin | Updated: April 9, 2016 03:08 IST

विजेचे खांब घेऊन जात असलेल्या ट्रॅक्टरची ट्रॉली उलटल्याने तीन कामगारांचा दबून घटनास्थळीच मृत्यू झाला.

चार गंभीर : बोरीघिवारी शिवारातील घटनाकोदामेंढी : विजेचे खांब घेऊन जात असलेल्या ट्रॅक्टरची ट्रॉली उलटल्याने तीन कामगारांचा दबून घटनास्थळीच मृत्यू झाला. अन्य चार कामगार गंभीर जखमी झाले. ही घटना मौदा तालुक्यातील तोंडली - वायगाव मार्गावरील बोरी (घिवारी) शिवारात शुक्रवारी सकाळी ११.४५ वाजताच्या सुमारास घडली. मृत तिन्ही कामगार कोदामेंढीचे असल्याने गुडीपाडव्याच्या दिवशी गावात शोककळा पसरली. विकास वसंता मोहनकर (२१), सुजीत कचरू सलामे (२५) आणि कार्तिक गेंदलाल वरखडे (२२) तिघेही रा. कोदामेंढी, ता. मौदा अशी मृत कामगारांची नावे असून, जखमींमध्ये राजकुमार बिरशा पंधरे (४०, रा. कोदामेंढी, ता. मौदा), धनराज पूरण गाडेकर (४७, रा. शिवाडौली, ता. मौदा), देवचंद अंकला चटवापाच (४५, रा. शिवाडौली, ता. मौदा) व अतुल तुळशीराम हटवार (२०, रा. कोदामेंढी, ता. मौदा) या चार कामगारांचा समावेश आहे. मौदा तालुक्यात विजेचे खांब बदलविण्याचे काम सुरू आहे. सदर कामाचे कंत्राट रुद्रानी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला देण्यात आले आहे. यातील काही कामांचे कंत्राट जय बजरंग इलेक्ट्रिकल्स कंपनीने रुद्रानी कंपनीकडून घेतले आहे. हे सर्व कामगार या कंपनीकडे खांब उभारण्याचे काम करायचे. दरम्यान, वायगाव शिवारात खांब उभारण्याचे काम सुरू असल्याने या कामगारांनी एमएच- ४०/ए-२७४४ क्रमांकाच्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये विजेच्या खांबासह इतर साहित्य टाकले आणि ते स्वत: ट्रॉलीमध्ये बसून कोदामेंढीहून तोंडली मार्गे वायगावला जाण्यास निघाले. हा ट्रॅक्टर कोदामेंढी येथील कृष्णा मसराम यांच्या मालकीचा आहे. माहिती कळताच नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. त्यांनी ट्रॉलीखाली दबलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यात विकास, सुजीत आणि कार्तिक या तिघांचा डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने घटनास्थळीच मृत्यू झाला. जखमी अतुलला नागपूर येथील मेडिकल हॉस्पिटलमध्ये तर उर्वरित तिघांना भंडारा येथील शासकीय रुग्णालयात भरती करण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर व धोक्याबाहेर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. उत्तरीय तपासणी आटोपल्यानंतर सायंकाळी तिघांच्या पार्थिवावर कोदामेंढी येथील स्मशानभूमीत सामूहिक अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे कोदामेंढी येथे शोककळा पसरली होती. (वार्ताहर)रोडच्या उताराने केला घातया ट्रॉलीमध्ये एका बाजूला चार आणि दुसऱ्या बाजूला तीन असे एकूण सिमेंटचे सात खांब ठेवण्यात आले होते. सारंग मेश्राम हा ट्रॅक्टर चालवित होता. हा ट्रॅक्टर बोरी (घिवारी) शिवारात पोहोचताच ज्या बाजूला चार खांब ठेवण्यात आले होते, त्या बाजूने ट्रॉली उलटली. विशेष म्हणजे, या चार खांबांच्या बाजूने रोडला अधिक उतार होता. ट्रॉली उलटताच ट्रॅक्टर रोडवर आडवा झाला आणि सातही कामगार ट्रॉलीखाली दबल्या गेले. त्यात तिघांचा मृत्यू झाला.