शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

दारूची तस्करी करणाऱ्या तीन महिलांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2019 22:54 IST

रेल्वे सुरक्षा दलाने गुरुवारी दारूची तस्करी करणाऱ्या तीन महिलांना रंगेहात अटक करून त्यांच्या कडून ४८८८ रुपये किमतीच्या दारूच्या १८८ बॉटल जप्त केल्या.

ठळक मुद्देरेल्वे सुरक्षा दलाची कारवाई : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सुपूर्द

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : रेल्वे सुरक्षा दलाने गुरुवारी दारूची तस्करी करणाऱ्या तीन महिलांना रंगेहात अटक करून त्यांच्या कडून ४८८८ रुपये किमतीच्या दारूच्या १८८ बॉटल जप्त केल्या.गुरुवारी दुपारी २.४५ वाजता रेल्वे सुरक्षा दलाच्या पथकातील सहायक उपनिरीक्षक सीताराम जाट, प्रधान आरक्षक शशिकांत गजभिये, अश्विनी मुळतकर, नीता माझी, सीताबर्डी पोलीस ठाण्याचे जयपाल राठोड, चंद्रशेखर गौतम, पंकज बागडे, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक केशव चौधरी, उपनिरीक्षक संजय मोरे, धनश्री डोंगरे हे रेल्वेस्थानकावर पाहणी करीत होते. त्यांना प्लॅटफार्म क्रमांक २ वर इटारसी एण्डकडील भागात उभ्या असलेल्या रेल्वेगाडी क्रमांक १६०३२ अंदमान एक्स्प्रेसच्या महिला कोचमध्ये ३ महिला हातात वजन असलेली पिशवी घेऊन संशयास्पद स्थितीत आढळल्या. पिशवीत काय आहे याची विचारणा केली असता त्यांनी समाधानकारक उत्तर दिले नाही. अधिक चौकशी केली असता त्यांनी पिशवीत दारूच्या बॉटल असल्याचे सांगितले. त्यांना आरपीएफ ठाण्यात आणून उपनिरीक्षक भुरासिंग बघेल यांच्या समोर हजर करण्यात आले. त्यांनी आपले नाव कविता वसंता बानोत (४०) रा. शिवाजी वॉर्ड धनसर पेट्रोल पंपाजवळ, बामनी बल्लारशाह, चंद्रपूर, रमा श्रीराम सहारे (६५) बुद्धनगर वॉर्ड कादरा टेकडी परिसर, बल्लारशाह आणि जुली गणेश बदावत (२४) साईबाबा वॉर्ड, बल्लारशाह चंद्रपूर असे सांगितले. त्यांच्याकडून दारूच्या ४८८८ रुपये किमतीच्या १८८ बॉटल जप्त करण्यात आल्या. निरीक्षक रवी जेम्स यांच्या आदेशानुसार जप्त करण्यात आलेली दारू राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सुपूर्द करण्यात आली. ही कारवाई रेल्वे सुरक्षा दलाचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त भवानी शंकर नाथ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

टॅग्स :liquor banदारूबंदीNagpur Railway Stationरेल्वे स्टेशन नागपूरArrestअटकWomenमहिलाSmugglingतस्करी