शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
2
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
3
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
4
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
5
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
6
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
7
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
8
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
9
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
10
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
11
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
12
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
13
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
14
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
15
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
16
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
17
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
18
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
19
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
20
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...

नागपुरात तीनदा झाले आहे पावसाळी विधिमंडळअधिवेशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 00:04 IST

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन ४ जुलैपासून नागपुरात सुरू होत आहे. हो नाही म्हणत शेवटी राज्य सरकारने यावर शिक्कामोर्तब केले. पण नागपुरात पावसाळी अधिवेशन होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी तीनदा पावसाळी अधिवेशन नागपुरात झाले आहे. विशेष म्हणजे प्रत्येक अधिवेशन किमान महिनाभर चालले आहे. या निर्णयावर नागपुरातील बहुतांश नेते खूश आहेत. यामुळे विदर्भाच्या विकासाला गती मिळेल. नागपूर कराराचेही पालन होईल, असे नेत्यांचे मत आहे तर काहींनी शेतकऱ्यांचे प्रश्न बाजूला पडतील, अशी शंका व्यक्त केली आहे.

ठळक मुद्दे प्रत्येक अधिवेशन महिनाभर चालले : नागपुरातील नेते खूश, काहींना शंका

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन ४ जुलैपासून नागपुरात सुरू होत आहे. हो नाही म्हणत शेवटी राज्य सरकारने यावर शिक्कामोर्तब केले. पण नागपुरात पावसाळी अधिवेशन होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी तीनदा पावसाळी अधिवेशन नागपुरात झाले आहे. विशेष म्हणजे प्रत्येक अधिवेशन किमान महिनाभर चालले आहे. या निर्णयावर नागपुरातील बहुतांश नेते खूश आहेत. यामुळे विदर्भाच्या विकासाला गती मिळेल. नागपूर कराराचेही पालन होईल, असे नेत्यांचे मत आहे तर काहींनी शेतकऱ्यांचे प्रश्न बाजूला पडतील, अशी शंका व्यक्त केली आहे.नागपूर करारांतर्गत महाराष्ट्रात सहभागी झाल्यानंतर नागपुरात विधिमंडळाचे एक अधिवेशन घेण्यास सुरुवात झाली. नागपुरात साधारणत: हिवाळी अधिवेशन होते. १९६१ मध्ये पहिल्यांदा नागपुरात पावसाळी अधिवेशन झाले होते. त्यावेळी १४ जुलै रोजी अधिवेशन सुरु होऊन ३० आॅगस्टपर्यंत चालले होते. यानंतर १९६६ मध्येही नागपुरात पावसाळी अधिवेशन झाले. त्यावेळी २९ आॅगस्ट ते ३० सप्टेंबर पर्यंत अधिवेशन चालले. यानंतर १९७१ मध्ये ६ सप्टेंबर ते ११ आॅक्टोबर पर्यंत पावसाळी अधिवेशन झाले होते यानंतर मात्र नागपुरात हिवाळी अधिवेशनच होत गेले.हिवाळी अधिवेशनाचा कालावधी नेहमीच कमी राहिला. त्यामुळे हे अधिवेशन नेहमीच विदर्भवाद्यांच्या निशाण्यावर राहिले. सरकार फक्त नावासाठी अधिवेशन घेते, आमदार, मंत्री, अधिकारी फक्त पिकनिकसाठी नागपुरात येतात, अशी टीका व्हायची. आता पावसाळी अधिवेशन होत असल्यामुळे ही तक्रार दूर होईल व किमान एक महिना कामकाज चालेल, अशी अपेक्षा आहे.हिवाळी अधिवेशनाचे काय ?नागपूर करारात किमान एक अधिवेशन नागपुरात घेण्याचा उल्लेख आहे. सूत्रांच्या मते पावसाळी अधिवेशन नागपुरात घेतल्यावर हिवाळी घ्यायचे की नाही याबाबतचा निर्णय पावसाळी अधिवेशनातच घेतला जाईल.चर्चेसाठी वेळ मिळणारपावसाळी अधिवेशन एक महिन्याचे असते. हिवाळी अधिवेशन साधारणत: दोन आठवडे चालते. पावसाळी अधिवेशन नागपुरात होत असल्यामुळे विदर्भातील समस्यांना प्राधान्य देण्यासाठी अधिक संधी मिळेल.आ. कृष्णा खोपडेसकारात्मक चर्चा व्हावी पावसाळी अधिवेशन नागपुरात घेण्याचे स्वागतच आहे. अधिवेशन किमान एक महिना चालावे. विकासाच्या मुद्यावर सकारात्मक चर्चा व्हावी. विदर्भातील उद्योग व रोजगारावरही चर्चा व्हावी. अनिस अहमद, माजी मंत्रीशेतकऱ्यांपासून पळतेय सरकारनागपुरात पावसाळी अधिवेशन घेऊन सरकार शेतकºयांच्या प्रश्नांपासून दूर पळण्याचा प्रयत्न करीत आहे. पावसाळी अधिवेशनादरम्यान शेतकरी पेरणीच्या कामात व्यस्त असतात. त्यामुळे त्यांचे प्रश्न समोर येत नाही. ते मोर्चे काढू शकत नाही. आता सरकारने या अधिवेशनात विदर्भाचे प्रश्न सोडविण्याला प्राधान्य द्यावे. नितीन राऊत, माजी मंत्रीविदर्भाचा फायदाच नागपुरात हिवाळी अधिवेशन असो की पावसाळी अधिवेशन, विदर्भाच्या प्रश्नांना सरकारतर्फे प्राधान्य दिले जाते. मुंबईच्या तुलनेत नागपुरात कमी पाऊस पडतो. त्यामुळे लोकांचीही गैरसोय होणार नाही.आ. सुधाकर देशमुख

टॅग्स :Vidhan Bhavanविधान भवनnagpurनागपूर