शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

नागपुरात तीनदा झाले आहे पावसाळी विधिमंडळअधिवेशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 00:04 IST

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन ४ जुलैपासून नागपुरात सुरू होत आहे. हो नाही म्हणत शेवटी राज्य सरकारने यावर शिक्कामोर्तब केले. पण नागपुरात पावसाळी अधिवेशन होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी तीनदा पावसाळी अधिवेशन नागपुरात झाले आहे. विशेष म्हणजे प्रत्येक अधिवेशन किमान महिनाभर चालले आहे. या निर्णयावर नागपुरातील बहुतांश नेते खूश आहेत. यामुळे विदर्भाच्या विकासाला गती मिळेल. नागपूर कराराचेही पालन होईल, असे नेत्यांचे मत आहे तर काहींनी शेतकऱ्यांचे प्रश्न बाजूला पडतील, अशी शंका व्यक्त केली आहे.

ठळक मुद्दे प्रत्येक अधिवेशन महिनाभर चालले : नागपुरातील नेते खूश, काहींना शंका

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन ४ जुलैपासून नागपुरात सुरू होत आहे. हो नाही म्हणत शेवटी राज्य सरकारने यावर शिक्कामोर्तब केले. पण नागपुरात पावसाळी अधिवेशन होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी तीनदा पावसाळी अधिवेशन नागपुरात झाले आहे. विशेष म्हणजे प्रत्येक अधिवेशन किमान महिनाभर चालले आहे. या निर्णयावर नागपुरातील बहुतांश नेते खूश आहेत. यामुळे विदर्भाच्या विकासाला गती मिळेल. नागपूर कराराचेही पालन होईल, असे नेत्यांचे मत आहे तर काहींनी शेतकऱ्यांचे प्रश्न बाजूला पडतील, अशी शंका व्यक्त केली आहे.नागपूर करारांतर्गत महाराष्ट्रात सहभागी झाल्यानंतर नागपुरात विधिमंडळाचे एक अधिवेशन घेण्यास सुरुवात झाली. नागपुरात साधारणत: हिवाळी अधिवेशन होते. १९६१ मध्ये पहिल्यांदा नागपुरात पावसाळी अधिवेशन झाले होते. त्यावेळी १४ जुलै रोजी अधिवेशन सुरु होऊन ३० आॅगस्टपर्यंत चालले होते. यानंतर १९६६ मध्येही नागपुरात पावसाळी अधिवेशन झाले. त्यावेळी २९ आॅगस्ट ते ३० सप्टेंबर पर्यंत अधिवेशन चालले. यानंतर १९७१ मध्ये ६ सप्टेंबर ते ११ आॅक्टोबर पर्यंत पावसाळी अधिवेशन झाले होते यानंतर मात्र नागपुरात हिवाळी अधिवेशनच होत गेले.हिवाळी अधिवेशनाचा कालावधी नेहमीच कमी राहिला. त्यामुळे हे अधिवेशन नेहमीच विदर्भवाद्यांच्या निशाण्यावर राहिले. सरकार फक्त नावासाठी अधिवेशन घेते, आमदार, मंत्री, अधिकारी फक्त पिकनिकसाठी नागपुरात येतात, अशी टीका व्हायची. आता पावसाळी अधिवेशन होत असल्यामुळे ही तक्रार दूर होईल व किमान एक महिना कामकाज चालेल, अशी अपेक्षा आहे.हिवाळी अधिवेशनाचे काय ?नागपूर करारात किमान एक अधिवेशन नागपुरात घेण्याचा उल्लेख आहे. सूत्रांच्या मते पावसाळी अधिवेशन नागपुरात घेतल्यावर हिवाळी घ्यायचे की नाही याबाबतचा निर्णय पावसाळी अधिवेशनातच घेतला जाईल.चर्चेसाठी वेळ मिळणारपावसाळी अधिवेशन एक महिन्याचे असते. हिवाळी अधिवेशन साधारणत: दोन आठवडे चालते. पावसाळी अधिवेशन नागपुरात होत असल्यामुळे विदर्भातील समस्यांना प्राधान्य देण्यासाठी अधिक संधी मिळेल.आ. कृष्णा खोपडेसकारात्मक चर्चा व्हावी पावसाळी अधिवेशन नागपुरात घेण्याचे स्वागतच आहे. अधिवेशन किमान एक महिना चालावे. विकासाच्या मुद्यावर सकारात्मक चर्चा व्हावी. विदर्भातील उद्योग व रोजगारावरही चर्चा व्हावी. अनिस अहमद, माजी मंत्रीशेतकऱ्यांपासून पळतेय सरकारनागपुरात पावसाळी अधिवेशन घेऊन सरकार शेतकºयांच्या प्रश्नांपासून दूर पळण्याचा प्रयत्न करीत आहे. पावसाळी अधिवेशनादरम्यान शेतकरी पेरणीच्या कामात व्यस्त असतात. त्यामुळे त्यांचे प्रश्न समोर येत नाही. ते मोर्चे काढू शकत नाही. आता सरकारने या अधिवेशनात विदर्भाचे प्रश्न सोडविण्याला प्राधान्य द्यावे. नितीन राऊत, माजी मंत्रीविदर्भाचा फायदाच नागपुरात हिवाळी अधिवेशन असो की पावसाळी अधिवेशन, विदर्भाच्या प्रश्नांना सरकारतर्फे प्राधान्य दिले जाते. मुंबईच्या तुलनेत नागपुरात कमी पाऊस पडतो. त्यामुळे लोकांचीही गैरसोय होणार नाही.आ. सुधाकर देशमुख

टॅग्स :Vidhan Bhavanविधान भवनnagpurनागपूर