शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

नागपुरात तीनदा झाले आहे पावसाळी विधिमंडळअधिवेशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 00:04 IST

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन ४ जुलैपासून नागपुरात सुरू होत आहे. हो नाही म्हणत शेवटी राज्य सरकारने यावर शिक्कामोर्तब केले. पण नागपुरात पावसाळी अधिवेशन होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी तीनदा पावसाळी अधिवेशन नागपुरात झाले आहे. विशेष म्हणजे प्रत्येक अधिवेशन किमान महिनाभर चालले आहे. या निर्णयावर नागपुरातील बहुतांश नेते खूश आहेत. यामुळे विदर्भाच्या विकासाला गती मिळेल. नागपूर कराराचेही पालन होईल, असे नेत्यांचे मत आहे तर काहींनी शेतकऱ्यांचे प्रश्न बाजूला पडतील, अशी शंका व्यक्त केली आहे.

ठळक मुद्दे प्रत्येक अधिवेशन महिनाभर चालले : नागपुरातील नेते खूश, काहींना शंका

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन ४ जुलैपासून नागपुरात सुरू होत आहे. हो नाही म्हणत शेवटी राज्य सरकारने यावर शिक्कामोर्तब केले. पण नागपुरात पावसाळी अधिवेशन होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी तीनदा पावसाळी अधिवेशन नागपुरात झाले आहे. विशेष म्हणजे प्रत्येक अधिवेशन किमान महिनाभर चालले आहे. या निर्णयावर नागपुरातील बहुतांश नेते खूश आहेत. यामुळे विदर्भाच्या विकासाला गती मिळेल. नागपूर कराराचेही पालन होईल, असे नेत्यांचे मत आहे तर काहींनी शेतकऱ्यांचे प्रश्न बाजूला पडतील, अशी शंका व्यक्त केली आहे.नागपूर करारांतर्गत महाराष्ट्रात सहभागी झाल्यानंतर नागपुरात विधिमंडळाचे एक अधिवेशन घेण्यास सुरुवात झाली. नागपुरात साधारणत: हिवाळी अधिवेशन होते. १९६१ मध्ये पहिल्यांदा नागपुरात पावसाळी अधिवेशन झाले होते. त्यावेळी १४ जुलै रोजी अधिवेशन सुरु होऊन ३० आॅगस्टपर्यंत चालले होते. यानंतर १९६६ मध्येही नागपुरात पावसाळी अधिवेशन झाले. त्यावेळी २९ आॅगस्ट ते ३० सप्टेंबर पर्यंत अधिवेशन चालले. यानंतर १९७१ मध्ये ६ सप्टेंबर ते ११ आॅक्टोबर पर्यंत पावसाळी अधिवेशन झाले होते यानंतर मात्र नागपुरात हिवाळी अधिवेशनच होत गेले.हिवाळी अधिवेशनाचा कालावधी नेहमीच कमी राहिला. त्यामुळे हे अधिवेशन नेहमीच विदर्भवाद्यांच्या निशाण्यावर राहिले. सरकार फक्त नावासाठी अधिवेशन घेते, आमदार, मंत्री, अधिकारी फक्त पिकनिकसाठी नागपुरात येतात, अशी टीका व्हायची. आता पावसाळी अधिवेशन होत असल्यामुळे ही तक्रार दूर होईल व किमान एक महिना कामकाज चालेल, अशी अपेक्षा आहे.हिवाळी अधिवेशनाचे काय ?नागपूर करारात किमान एक अधिवेशन नागपुरात घेण्याचा उल्लेख आहे. सूत्रांच्या मते पावसाळी अधिवेशन नागपुरात घेतल्यावर हिवाळी घ्यायचे की नाही याबाबतचा निर्णय पावसाळी अधिवेशनातच घेतला जाईल.चर्चेसाठी वेळ मिळणारपावसाळी अधिवेशन एक महिन्याचे असते. हिवाळी अधिवेशन साधारणत: दोन आठवडे चालते. पावसाळी अधिवेशन नागपुरात होत असल्यामुळे विदर्भातील समस्यांना प्राधान्य देण्यासाठी अधिक संधी मिळेल.आ. कृष्णा खोपडेसकारात्मक चर्चा व्हावी पावसाळी अधिवेशन नागपुरात घेण्याचे स्वागतच आहे. अधिवेशन किमान एक महिना चालावे. विकासाच्या मुद्यावर सकारात्मक चर्चा व्हावी. विदर्भातील उद्योग व रोजगारावरही चर्चा व्हावी. अनिस अहमद, माजी मंत्रीशेतकऱ्यांपासून पळतेय सरकारनागपुरात पावसाळी अधिवेशन घेऊन सरकार शेतकºयांच्या प्रश्नांपासून दूर पळण्याचा प्रयत्न करीत आहे. पावसाळी अधिवेशनादरम्यान शेतकरी पेरणीच्या कामात व्यस्त असतात. त्यामुळे त्यांचे प्रश्न समोर येत नाही. ते मोर्चे काढू शकत नाही. आता सरकारने या अधिवेशनात विदर्भाचे प्रश्न सोडविण्याला प्राधान्य द्यावे. नितीन राऊत, माजी मंत्रीविदर्भाचा फायदाच नागपुरात हिवाळी अधिवेशन असो की पावसाळी अधिवेशन, विदर्भाच्या प्रश्नांना सरकारतर्फे प्राधान्य दिले जाते. मुंबईच्या तुलनेत नागपुरात कमी पाऊस पडतो. त्यामुळे लोकांचीही गैरसोय होणार नाही.आ. सुधाकर देशमुख

टॅग्स :Vidhan Bhavanविधान भवनnagpurनागपूर