शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
3
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
4
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
5
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
6
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
7
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
8
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
9
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
10
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
11
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
12
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
13
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
14
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
15
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
16
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
17
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
18
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
19
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
20
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल

‘फिट इंडिया’त तीन हजारावर शाळा अनफिट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 04:06 IST

नागपूर : कोरोना काळात सर्वांच्या शारीरिक क्षमतेचा कस लागला. प्रतिकार क्षमतेअभावी अनेकांचा कोरोनाने बळी घेतला. या पार्श्वभूमीवर केंद्र ...

नागपूर : कोरोना काळात सर्वांच्या शारीरिक क्षमतेचा कस लागला. प्रतिकार क्षमतेअभावी अनेकांचा कोरोनाने बळी घेतला. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने ‘फिट इंडिया’ मोहीम सुरू केली आहे. जिल्ह्यातून या मोहिमेला मिळालेला प्रतिसाद मात्र अत्यंत निराशाजनक आहे. जिल्ह्यातील ३७१६ शाळांपैकी केवळ ५७४ शाळांनीच सहभाग नोंदविला आहे. खेळांकडे पाहण्याचा समाजाचा आणि शाळांचा दृष्टिकोन अत्यंत उदासीन असल्याचे यावरून स्पष्ट झाले आहे.

जिल्ह्यात पहिली ते बारावीच्या ३७१६ शाळा आहेत. सर्वच शाळांनी फिट इंडियामध्ये सहभाग घेणे अपेक्षित आहे. प्रत्यक्ष परिस्थिती तशी नाही. या अभियानासाठी फेब्रुवारी महिन्यापासून मोहीम सुरू झाली आहे. पण या मोहिमेत नोंदणी करण्यासाठी क्रीडा शिक्षकांच्या बैठका क्रीडा विभागाने अथवा शिक्षण विभागाने घेतल्या नाहीत. शाळांना पत्र पाठविले पण त्याचे महत्व मुख्याध्यापकांना कळले नाही. या अभियानात नोंदणी करण्यासाठी १५ डिसेंबरपर्यंत मुदत होती. नोंदणी अत्यल्प झाल्याने ती मुदत २७ डिसेंबरपर्यंत वाढवून देण्यात आली. तरीही अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. जिल्हा क्रीडा विभागाने सर्व शाळांच्या प्राचार्य, मुख्याध्यापकांनाही पत्र पाठविले आहे. त्यात नोंदणी न करणाऱ्या शाळांकडून खुलासा मागविण्याचे आदेश दिले आहे. पण लॉकडाऊनमध्ये अनेक शाळा बंद आहे. शाळांमध्ये शिक्षकांची ५० टक्केच उपस्थिती आहे. अनेक शाळांमध्ये क्रीडा शिक्षक राहिलेला नाही. त्याचा फटका फिट इंडिया अभियानाला बसला आहे.

दृष्टिक्षेपात

एकूण शाळा - ३७१६

नोंदणी - ५७४

- या आहेत अडचणी

१) स्कूल का मेल आयडी क्लर्कला माहिती असते. मुख्याध्यापकही त्यावरच अवलंबून असतो. नोंदणी करताना ओटीपी मेलवर येतो. बहुतांश वेळा बरेच प्रयत्न केल्यानंतर ओटीपी येतो. त्यासाठी क्लर्क अथवा मुख्याध्यापक बसून असणे गरजेचे आहे. सध्या ५० टक्के शिक्षकांची उपस्थिती असल्याने कधी मुख्याध्यापक, कधी क्लार्क तर कधी क्रीडा शिक्षक नसतो.

२) प्रायव्हेट स्कूलमध्ये लॉकडाऊनमध्ये बहुतांश स्कूलने क्रीडा शिक्षकांना काढले आहे.

३) चार वर्षापूर्वी क्रीडा शिक्षकाचे पद व्यपगत केले होते. क्रीडा शिक्षकाला विषय शिक्षकात समाविष्ट केले. ज्या शाळेची पटसंख्या ५०० वर संख्या आहे. तिथेच क्रीडा शिक्षक आहे. इतर शाळांमध्ये क्रीडा शिक्षकच नाही.

- शारीरिक शिक्षकांची पदेच कमी केली ५०० च्यावर पटसंख्या असेल तरच शारीरिक शिक्षक ठेवला आहे. शाळांमध्ये क्रीडा शिक्षकच नसल्यामुळे दुसरा विषय शिक्षक हे कसा करेल, मुख्याध्यापक एका शिक्षकाला हे काम सोपवून देतात. त्यामुळे क्रीडा संदर्भात फारसे गांभीर्याने घेतले जात नाही.

भारत रेहपाडे, जिल्हाध्यक्ष, शिक्षक भारती

- आम्ही नोंदणीसाठी सर्व बीईओंच्या बैठकी घेतल्या. त्यांना नोंदणी करण्यासंदर्भात आवाहनही केले आहे. नोंदणी अत्यल्प झाल्याने मुदतही वाढविण्यात आली आहे. नोंदणी न केलेल्या शाळांकडून आम्ही खुलासाही मागणार आहोत.

अविनाश पुंडे, जिल्हा क्रीडा अधिकारी