शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणं युद्धासारखंच!
2
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
3
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
4
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
5
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
6
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
7
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
8
पहलगाम हल्ल्यानंतर भारतात होणारी मोठी स्पर्धा पुढे ढकलली
9
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
10
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
11
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
12
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
13
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
14
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
15
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   
16
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
17
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
18
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
19
जिद्द असावी तर अशी! अंगणवाडी ते IAS अधिकारी; ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास
20
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान

नागपुरातील तीन पोलीस कर्मचाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2019 00:40 IST

दोन युवकांना पोलीस कर्मचाऱ्यांनी मारहाण केली. याप्रकरणी तक्रार मिळताच तीन पोलीस कर्मचाऱ्यांची तातडीने पोलीस मुख्यालयात बदली करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्रतापनगर परिसरात एका अल्पवयीन मुलाने भरधाव वेगाने कार चालवून दोन वासरांना चिरडले होते. याप्रकरणी पोलिसांनी कारवाई केली. त्या मुलाला सोडवण्यासाठी पोलीस ठाण्यात गेलेल्या दोन युवकांना पोलीस कर्मचाऱ्यांनी मारहाण केली. याप्रकरणी तक्रार मिळताच तीन पोलीस कर्मचाऱ्यांची तातडीने पोलीस मुख्यालयात बदली करण्यात आली.शनिवारी बदली करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये सुरेश आठवले, सुधीर गुडधे आणि ज्ञानचंद दयाप्रसाद यादव यांचा समावेश असल्याचे सांगितले जाते.मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी रात्री १० वाजता १७ वर्षीय अल्पवयीन मुलाने भरधाव वेगाने कार चालवून रस्त्याच्या काठाने बसलेल्या गाईच्या दोन वासरांना धडक दिली. यात दोन्ही वासरांचा मृत्यू झाला. याप्रकरणी प्रतापनगर पोलिसांनी कार चालक मुलाला पकडून ठाण्यात आणले. त्याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली. परंतु अल्पवयीन मुलाच्या मदतीसाठी सारंग आणि कीर्तीकुमार नावाचे दोन कार्यकर्ते प्रतापनगर ठाण्यात पोहोचले. या दोन्ही कार्यकर्त्यांना पोलीस कर्मचाऱ्यांनी विनाकारण मारहाण केल्याचा आरोप आहे. यानंतर एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याने पोलीस ठाण्यात जाऊन दोषी पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी केली. याप्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. यानंतर डीसीपी विवेक मसाळ यांनी तिन्ही पोलीस कर्मचाऱ्यांची तातडीने मुख्यालयात बदली केली.

 

टॅग्स :PoliceपोलिसTransferबदली