शहरं
Join us  
Trending Stories
1
'तेव्हा पाकिस्तानशी मैत्री नव्हती, मग सिंधू पाणी करार का केला?', जयशंकर यांनी विरोधकांना घेरले
2
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
3
इन्स्टावर तरुणांना मेसेज पाठवायची, आणखी एका महिलेचे पाकिस्तान कनेक्शन उघड, शमा प्रवीण एटीएसच्या ताब्यात
4
रशियात भीषण भूकंपानंतर महाप्रलय; त्सुनामीमुळे प्रशांत महासागर खवळला, भारताला बसू शकतो फटका?
5
Video: मोठी दुर्घटना टळली! इंडो तिबेटियन पोलीस दलाची बस नदीत कोसळली, शस्त्रे गेली वाहून
6
पत्नी, सासूला संपवण्याचा कट रचला; दगडाने ठेचून हत्या केली अन् मृतदेह बागेत पुरला, मग...
7
IND vs ENG : 'वसाहतवाद' युगात आहात का? इरफान पठाणनं 'इंग्रज' पिच क्युरेटरवर असा काढला राग
8
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
9
शांत सुरक्षित निवृत्तीची तयारी, लगेचच सुरुवात केलेली बरी...
10
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
11
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
12
"PM मोदींकडून अपेक्षा होती पण त्यांनी..."; पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या शुभमच्या पत्नीने व्यक्त केली नाराजी
13
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 
14
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
15
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
16
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
17
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
18
महागड्या गाड्याही पडतील फिक्या! अ‍ॅडवॉन्स फिचर्ससह बाजारात येतोय महिंद्राचा पिकअप ट्रक, पाहा टीझर
19
Surya Grahan: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!
20
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग

दहावीचे तीन टक्के गुण बुडणार; सरकार व शिक्षण मंडळाचा अजब निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2019 10:16 IST

राज्य सरकार व महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांनी शास्त्रीय कलेत पारंगत इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांबाबत अन्यायकारक धोरण अवलंबले आहे.

ठळक मुद्देशास्त्रीय कलेला फटका

आशिष दुबे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्य सरकार व महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांनी शास्त्रीय कलेत पारंगत इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांबाबत अन्यायकारक धोरण अवलंबले आहे. इयत्ता सातवीपूर्वी शास्त्रीय कलेची तिसरी (प्रवेशिका पूर्ण) व पाचवी (मध्यमा पूर्ण) या दोन्ही किंवा या दोनपैकी कोणतीही एक परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना इयत्ता दहावीमध्ये तीन टक्के अतिरिक्त गुण मिळणार नाही, असा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे संबंधित विद्यार्थ्यांचे तीन टक्के गुण बुडणार आहेत.‘लोकमत’ला मिळालेल्या माहितीनुसार, २४ नोव्हेंबर २०१७ रोजी जारी या शासन निर्णयाचे मंडळाद्वारे पालन केले जात असून त्यानुसार इयत्ता सातवीपूर्वी शास्त्रीय कला परीक्षा उत्तीर्ण झालेल्या दहावीच्या हजारो विद्यार्थ्यांचे अतिरिक्त गुणांचे प्रस्ताव फेटाळण्यात आले आहेत. मंडळाचे अधिकारी स्वत:ला या वादापासून दूर ठेवून सर्व जबाबदारी सरकारवर ढकलत आहेत.परंतु, अधिक चौकशी केल्यानंतर राज्य सरकार व मंडळ यांनी मिळून हा निर्णय घेतल्याचे कळले. सरकारने हा निर्णय घेण्यापूर्वी मंडळाच्या तज्ज्ञांचा सल्ला मागितला होता. त्यानंतर तज्ज्ञांनी सरकारची री ओढत सकारात्मक अहवाल दिला. असे असले तरी, मंडळाचे अधिकारी सुरुवातीला सरकारने हा निर्णय एकतर्फी घेतल्याचे सांगत होते. परंतु, त्यानंतर त्यांनी मंडळाच्या तज्ज्ञांनी सरकारला सल्ला दिला होता हे मान्य केले. असा अन्यायकारक निर्णय घेण्याचे कारण विचारले असता कुणीच तोंड उघडले नाही. इयत्ता सातवीपूर्वीचे विद्यार्थी समजदार नसतात. परीक्षा देण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणला जातो. त्यामुळे ते परीक्षेला बसतात. त्यांच्यासोबत अशी बळजबरी होऊ नये याकरिता हा निर्णय घेण्यात आला आहे अशी माहिती मंडळाचे अधिकाऱ्यांनी दिली. परंतु, संबंधित विषयाचे शिक्षकांना मंडळाचा हा युक्तिवाद मान्य नाही. संबंधित कलेत परिपक्व होतपर्यंत कोणत्याही विद्यार्थ्याला परीक्षेत बसवले जात नाही असे त्यांनी सांगितले व सरकारच्या निर्णयाचा विरोध केला. आरक्षित जागांवर प्रवेश नाही२०१० मधील शासन निर्णयानुसार, शास्त्रीय कला, चित्रकला, लोककला व क्रीडा प्रमाणपत्रधारक विद्यार्थ्यांसाठी इयत्ता अकरावीमध्ये २ ते ३ टक्के जागा आरक्षित ठेवल्या जातात. शास्त्रीय कलेच्या अतिरिक्त गुणासाठी अपात्र ठरणाºया विद्यार्थ्यांना या आरक्षणाचा लाभ मिळणार नाही. गेल्यावर्षी अशा हजारो विद्यार्थ्यांवर अन्याय झाला होता अशी माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :SSC Resultदहावीचा निकाल