शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

दहावीचे तीन टक्के गुण बुडणार; सरकार व शिक्षण मंडळाचा अजब निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2019 10:16 IST

राज्य सरकार व महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांनी शास्त्रीय कलेत पारंगत इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांबाबत अन्यायकारक धोरण अवलंबले आहे.

ठळक मुद्देशास्त्रीय कलेला फटका

आशिष दुबे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्य सरकार व महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांनी शास्त्रीय कलेत पारंगत इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांबाबत अन्यायकारक धोरण अवलंबले आहे. इयत्ता सातवीपूर्वी शास्त्रीय कलेची तिसरी (प्रवेशिका पूर्ण) व पाचवी (मध्यमा पूर्ण) या दोन्ही किंवा या दोनपैकी कोणतीही एक परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना इयत्ता दहावीमध्ये तीन टक्के अतिरिक्त गुण मिळणार नाही, असा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे संबंधित विद्यार्थ्यांचे तीन टक्के गुण बुडणार आहेत.‘लोकमत’ला मिळालेल्या माहितीनुसार, २४ नोव्हेंबर २०१७ रोजी जारी या शासन निर्णयाचे मंडळाद्वारे पालन केले जात असून त्यानुसार इयत्ता सातवीपूर्वी शास्त्रीय कला परीक्षा उत्तीर्ण झालेल्या दहावीच्या हजारो विद्यार्थ्यांचे अतिरिक्त गुणांचे प्रस्ताव फेटाळण्यात आले आहेत. मंडळाचे अधिकारी स्वत:ला या वादापासून दूर ठेवून सर्व जबाबदारी सरकारवर ढकलत आहेत.परंतु, अधिक चौकशी केल्यानंतर राज्य सरकार व मंडळ यांनी मिळून हा निर्णय घेतल्याचे कळले. सरकारने हा निर्णय घेण्यापूर्वी मंडळाच्या तज्ज्ञांचा सल्ला मागितला होता. त्यानंतर तज्ज्ञांनी सरकारची री ओढत सकारात्मक अहवाल दिला. असे असले तरी, मंडळाचे अधिकारी सुरुवातीला सरकारने हा निर्णय एकतर्फी घेतल्याचे सांगत होते. परंतु, त्यानंतर त्यांनी मंडळाच्या तज्ज्ञांनी सरकारला सल्ला दिला होता हे मान्य केले. असा अन्यायकारक निर्णय घेण्याचे कारण विचारले असता कुणीच तोंड उघडले नाही. इयत्ता सातवीपूर्वीचे विद्यार्थी समजदार नसतात. परीक्षा देण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणला जातो. त्यामुळे ते परीक्षेला बसतात. त्यांच्यासोबत अशी बळजबरी होऊ नये याकरिता हा निर्णय घेण्यात आला आहे अशी माहिती मंडळाचे अधिकाऱ्यांनी दिली. परंतु, संबंधित विषयाचे शिक्षकांना मंडळाचा हा युक्तिवाद मान्य नाही. संबंधित कलेत परिपक्व होतपर्यंत कोणत्याही विद्यार्थ्याला परीक्षेत बसवले जात नाही असे त्यांनी सांगितले व सरकारच्या निर्णयाचा विरोध केला. आरक्षित जागांवर प्रवेश नाही२०१० मधील शासन निर्णयानुसार, शास्त्रीय कला, चित्रकला, लोककला व क्रीडा प्रमाणपत्रधारक विद्यार्थ्यांसाठी इयत्ता अकरावीमध्ये २ ते ३ टक्के जागा आरक्षित ठेवल्या जातात. शास्त्रीय कलेच्या अतिरिक्त गुणासाठी अपात्र ठरणाºया विद्यार्थ्यांना या आरक्षणाचा लाभ मिळणार नाही. गेल्यावर्षी अशा हजारो विद्यार्थ्यांवर अन्याय झाला होता अशी माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :SSC Resultदहावीचा निकाल