शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
4
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
5
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
6
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
7
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
8
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
9
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
10
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
11
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
12
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
13
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
14
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
15
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
16
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
17
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
18
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
19
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
20
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी

दहावीचे तीन टक्के गुण बुडणार; सरकार व शिक्षण मंडळाचा अजब निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2019 10:16 IST

राज्य सरकार व महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांनी शास्त्रीय कलेत पारंगत इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांबाबत अन्यायकारक धोरण अवलंबले आहे.

ठळक मुद्देशास्त्रीय कलेला फटका

आशिष दुबे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्य सरकार व महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांनी शास्त्रीय कलेत पारंगत इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांबाबत अन्यायकारक धोरण अवलंबले आहे. इयत्ता सातवीपूर्वी शास्त्रीय कलेची तिसरी (प्रवेशिका पूर्ण) व पाचवी (मध्यमा पूर्ण) या दोन्ही किंवा या दोनपैकी कोणतीही एक परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना इयत्ता दहावीमध्ये तीन टक्के अतिरिक्त गुण मिळणार नाही, असा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे संबंधित विद्यार्थ्यांचे तीन टक्के गुण बुडणार आहेत.‘लोकमत’ला मिळालेल्या माहितीनुसार, २४ नोव्हेंबर २०१७ रोजी जारी या शासन निर्णयाचे मंडळाद्वारे पालन केले जात असून त्यानुसार इयत्ता सातवीपूर्वी शास्त्रीय कला परीक्षा उत्तीर्ण झालेल्या दहावीच्या हजारो विद्यार्थ्यांचे अतिरिक्त गुणांचे प्रस्ताव फेटाळण्यात आले आहेत. मंडळाचे अधिकारी स्वत:ला या वादापासून दूर ठेवून सर्व जबाबदारी सरकारवर ढकलत आहेत.परंतु, अधिक चौकशी केल्यानंतर राज्य सरकार व मंडळ यांनी मिळून हा निर्णय घेतल्याचे कळले. सरकारने हा निर्णय घेण्यापूर्वी मंडळाच्या तज्ज्ञांचा सल्ला मागितला होता. त्यानंतर तज्ज्ञांनी सरकारची री ओढत सकारात्मक अहवाल दिला. असे असले तरी, मंडळाचे अधिकारी सुरुवातीला सरकारने हा निर्णय एकतर्फी घेतल्याचे सांगत होते. परंतु, त्यानंतर त्यांनी मंडळाच्या तज्ज्ञांनी सरकारला सल्ला दिला होता हे मान्य केले. असा अन्यायकारक निर्णय घेण्याचे कारण विचारले असता कुणीच तोंड उघडले नाही. इयत्ता सातवीपूर्वीचे विद्यार्थी समजदार नसतात. परीक्षा देण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणला जातो. त्यामुळे ते परीक्षेला बसतात. त्यांच्यासोबत अशी बळजबरी होऊ नये याकरिता हा निर्णय घेण्यात आला आहे अशी माहिती मंडळाचे अधिकाऱ्यांनी दिली. परंतु, संबंधित विषयाचे शिक्षकांना मंडळाचा हा युक्तिवाद मान्य नाही. संबंधित कलेत परिपक्व होतपर्यंत कोणत्याही विद्यार्थ्याला परीक्षेत बसवले जात नाही असे त्यांनी सांगितले व सरकारच्या निर्णयाचा विरोध केला. आरक्षित जागांवर प्रवेश नाही२०१० मधील शासन निर्णयानुसार, शास्त्रीय कला, चित्रकला, लोककला व क्रीडा प्रमाणपत्रधारक विद्यार्थ्यांसाठी इयत्ता अकरावीमध्ये २ ते ३ टक्के जागा आरक्षित ठेवल्या जातात. शास्त्रीय कलेच्या अतिरिक्त गुणासाठी अपात्र ठरणाºया विद्यार्थ्यांना या आरक्षणाचा लाभ मिळणार नाही. गेल्यावर्षी अशा हजारो विद्यार्थ्यांवर अन्याय झाला होता अशी माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :SSC Resultदहावीचा निकाल