शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर महापालिकेत २० वर्षांनंतर पुन्हा तीनसदस्यीय प्रभाग; विकासकामांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 22:15 IST

Nagpur News तब्बल २० वर्षांनंतर पुन्हा एकदा २०२२ मध्ये होऊ घातलेली नागपूर महापालिकेची निवडणूक तीनसदस्यीय प्रभाग पद्धतीने होईल.

 

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : तब्बल २० वर्षांनंतर पुन्हा एकदा २०२२ मध्ये होऊ घातलेली नागपूर महापालिकेची निवडणूक तीनसदस्यीय प्रभाग पद्धतीने होईल. २००२ मध्ये तीनसदस्यीय प्रभागात काँग्रेस-राष्ट्रवादीला सत्ता मिळाली होती. पण, नागरिकांना विकासकामांबाबत आलेले अनुभव चांगले नव्हते. चारसदस्यीय प्रभाग पद्धतीतही नागपूरकरांनी असेच अनुभव घेतले. नगरसेवक एकमेकांवर विषय ढकलतात. जबाबदारी निश्चित होत नाही. एकसदस्यीय वॉर्ड पद्धतीमुळे या कटकटीतून नागरिकांची सुटका होईल, अशी आशा होती. मात्र, राज्य सरकारने तीनसदस्यीय प्रभाग केल्याने याचा विकासकामांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. (Three-member ward again after 20 years; Hit the development work) (nagpur municipal corporation)

२००२ मध्ये नागपुरात तीनसदस्यीय प्रभाग पद्धती होती. त्यावेळी बहुसदस्यीय प्रभाग पद्धत उमेदवार व मतदारांसाठीही नवी होती. काँग्रेस-राष्ट्रवादीला राज्यातील सत्तेचा फायदा झाला. काँग्रेसला सर्वाधिक ५१ जागा मिळाल्या. भाजपला ४७, राष्ट्रवादी काँग्रेसला ९, शिवसेना ६, बसपा ९ तर १२ अपक्ष नगरसेवक निवडून आले होते. मनपात काँग्रेस-राष्ट्रवादी व बसपाने एकत्र येत सत्ता स्थापन केली. तीनसदस्यीय पद्धतीमुळे नागरिकांची निराशा झाली. २००७ मध्ये एकसदस्यीय वॉर्ड होताच काँग्रेस-राष्ट्रवादीला फटका बसला. भाजपने बाजी मारून सत्ता काबीज केली. त्यानंतर २०१२ मध्ये दोनसदस्यीय प्रभाग, तर २०१७ सदस्यीय प्रभाग पद्धती अस्तित्वात आली. २००७ पासून मनपात भाजपची सत्ता कायम आहे.

राज्यात शिवसेना-भाजप युतीची सत्ता असताना २०१७ मध्ये चारसदस्यीय प्रभाग पद्धत लागू करण्यात आली. २०१९ मध्ये महाविकास आघाडीचे सरकार सत्तारूढ झाल्यानंतर एकसदस्यीय वॉर्ड पद्धतीने महापालिका निवडणुका घेण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु आता निवडणुकीच्या तोंडावर हा निर्णय बदलून तीनसदस्यीय प्रभागाची घोषणा करण्यात आली. बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीत नगरसेवकांवर जबाबदारी निश्चित राहत नाही. लहानसहान कामांसाठी नागरिकांना भटकंती करावी लागते. यामुळे या निर्णयावर सामान्य नागरिकांनीही नाराजी व्यक्त केली आहे.

वॉर्डाची पुनर्रचना करावी लागणार

- निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार महापालिका प्रशासनाने एकसदस्यीय वॉर्ड पद्धतीची पुनर्रचना करण्याला सुरुवात केली होती. ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात असतानाच तीनसदस्यीय प्रभाग पद्धतीनुसार निवडणुका होणार असल्याने प्रशासनाला पुन्हा त्यानुसार प्रभागरचना करावी लागणार आहे.

 

अशी बदलली प्रभागरचना

वर्ष - प्रभागपद्धती

२००२- तीनसदस्यीय प्रभाग

२००७- एकसदस्यीय वॉर्ड

२०१२ - दोनसदस्यीय प्रभाग

२०१७ - चारसदस्यीय प्रभाग

२०१९ - हिवाळी अधिवेशनात एकसदस्यीय प्रभाग जाहीर

२०२१ - तीनसदस्यीय प्रभाग पद्धतीचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

 

तीन निवडणुकांत १५ जागा वाढल्या

लोकसंख्यावाढीसोबतच नगरसेवकांची संख्या वाढल्याने वाॅर्डांची रचना वेळोवेळी बदलण्यात आली. २००७ मध्ये महापालिकेत १३६ नगरसेवक होते. २०१२ मध्ये १४५ होते. तर २०१७ च्या निवडणुकीत नगरसेवकांची संख्या १५१ झाली. २०२२ च्या निवडणुकीत पुन्हा नगरसेवकांची संख्या १५ ने वाढण्याची शक्यता आहे. असे झाल्यास मनपात १६६ नगरसेवक राहतील.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका