शहरं
Join us  
Trending Stories
1
Census 2027 : केंद्र सरकारकडून जनगणनेची अधिसूचना जारी! ३५ लाखांहून अधिक कर्मचारी काम करणार, अ‍ॅपचा वापर होणार
2
'अनेक वळा लोक अशा गोष्टींकडे लक्ष देत नाहीत', कुंडमळ घटनेबद्दल CM फडणवीसांनी मांडली भूमिका
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात बिघाड; फ्लाईटने हवेतून यु-टर्न घेतला, हाँगकाँगला गेले
4
"इराणने मला जिवे मारण्याचा प्रयत्न केला, बेडरूमवर डागलं क्षेपणास्त्र’’, इस्राइलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी केला दावा   
5
टाटा मोटर्सचे शेअर्स ५% ने घसरले, जर तुम्हीही गुंतवणूक केली असेल तर 'ही' महत्त्वाची गोष्ट जाणून घ्या
6
Kedarnath Helicopter Crash:'हेलिकॉप्टर थोडे वळले, मागे गेले आणि मग...', केदारनाथ हेलिकॉप्टर अपघाताचे खरे कारण समोर आले
7
अमृता सुभाष अन् अनिता दातेच्या 'जारण'ची वाढती लोकप्रियता, १० दिवसातली कमाई किती?
8
Air India Plane Crash: ९२ जणांचे DNA नमुने जुळले, पण ८७ जणांचीच पटली ओळख; कारण...
9
संजय कपूरच्या निधनानंतर करिश्माला बसणार मोठा फटका! दर महिन्याला मिळणारी रक्कम होणार बंद?
10
'पाकिस्तान इस्रायलवर अणु बॉम्ब टाकेल', इराणी अधिकाऱ्याच्या दाव्यानंतर पाक स्पष्टच बोलला!
11
Israel Iran War: इस्रायलचा इराणवर बॉम्बवर्षाव; ४०६ जण ठार!
12
Govandi Accident: ‘मुझे अब पापा कौन कहेंगे?’ गोवंडी अपघातात मुलांना गमावलेल्या वडिलांनी फोडला टाहो!
13
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
14
Lufthansa Hyderabad Flight : 'Lufthansa'च्या विमानाला हैदराबादमध्ये उतरण्याची परवानगी नाकारली, जर्मनीला परतलं; नेमकं प्रकरण काय?
15
Mumbai: गिरगावमध्ये रस्त्याला भगदाड, बेस्ट बस पाच फूट खोल खड्यात, व्हिडीओ बघा
16
Astrology: जुलैअखेर पर्यंत अस्मानी-सुलतानी संकटांचे सावट; दररोज करा 'हे' उपाय!
17
काय आहे लोडिंग फॅक्टर, घर घेताना अनेकदा तुमच्यापासून लपवून ठेवतात लोक; मोठ्या प्रमाणात होतं नुकसान
18
ST Bus Pass: सरकारनं विद्यार्थ्यांना केलं खूश, एसटी पासबाबत घेतला महत्त्वाचा निर्णय
19
डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षभरात कमावले ₹५,१०० कोटी, कुठून आला त्यांच्याकडे इतका पैसा?
20
इराण-इस्रायल संघर्षामुळे पाकिस्तानवर रडण्याची वेळ! पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले, काय आहेत दर?

राष्ट्रीय लोक न्यायालयात तीन लाख प्रकरणे निकाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 11:25 IST

गेल्या २२ एप्रिल रोजी झालेल्या राष्ट्रीय लोक न्यायालयामध्ये राज्यातील २ लाख ९१ हजार ३२२ प्रकरणे निकाली काढण्यात यश मिळाले आहे. यासंदर्भातील आकडेवारी नुकतीच जाहीर करण्यात आली.

ठळक मुद्देराज्याची आकडेवारी जाहीर सातारा जिल्ह्याची सर्वोत्कृष्ट कामगिरी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गेल्या २२ एप्रिल रोजी झालेल्या राष्ट्रीय लोक न्यायालयामध्ये राज्यातील २ लाख ९१ हजार ३२२ प्रकरणे निकाली काढण्यात यश मिळाले आहे. यासंदर्भातील आकडेवारी नुकतीच जाहीर करण्यात आली.राज्यभरात आयोजित लोक न्यायालयांमध्ये एकूण १० लाख ११ हजार २९९ प्रकरणे न्यायनिवाड्यासाठी ठेवण्यात आली. त्यापैकी न्यायालयात प्रलंबित असलेली २ लाख ४६ हजार ३६८ व न्यायालयात दाखल होण्यापूर्वीची ४४ हजार ९५४ प्रकरणे पॅनल सदस्यांचे यशस्वी समुपदेशन व पक्षकारांचा सामंजस्यपणा यामुळे निकाली निघाली. परिणामी, न्यायालयांवरील कामाचा मोठा भार हलका झाला. सातारा जिल्ह्याने सर्वोत्कृष्ट कामगिरी करून सर्वाधिक ८१ हजार ३१५ प्रकरणे कायमची संपवली. न्यायालयात दाखल झालेली व दाखल होण्यासाठी आलेली अनेक प्रकरणे किरकोळ स्वरूपाची असतात किंवा बऱ्याच प्रकरणांमध्ये वादग्रस्त मुद्यांमुळे तातडीने निकाल देणे शक्य होत नाही. अशा परिस्थितीत पक्षकारांमध्ये सहमतीने तडजोड झाल्यास प्रकरणे लवकर निकाली निघू शकतात. त्यामुळे पक्षकारांचा वेळ, पैसा व मनस्ताप वाचतो. ही बाब लक्षात घेता देशभरात वेळोवेळी लोक न्यायालये आयोजित करून त्यात तडजोडीयोग्य प्रकरणे निकालाकरिता ठेवली जातात. पक्षकारांना नोटीस पाठवून त्याची माहिती दिली जाते. पॅनलपुढे पक्षकारांचे समुपदेशन केले जाते. त्यातून खटला सहमतीने निकाली निघतो. निवाडा सहमतीवर आधारित राहात असल्याने संबंधित सर्व पक्षकार आनंदी होतात. निवाड्यामुळे नुकसान झाल्याची भावना मनात निर्माण होत नाही. लोक न्यायालयातील निवाडा अंतिम असतो. त्याविरुद्ध कोठेही अपील करता येत नाही. परिणामी, प्रकरणे कायमची संपुष्टात येतात.

५५८ कोटींची तडजोडअपघात दावे, विमा दावे, धनादेश अनादर इत्यादी आर्थिक प्रकरणांमध्ये एकूण ५५८ कोटी ४ लाख ४४ हजार ४१७ रुपयांची तडजोड झाली. सांगली जिल्ह्यात सर्वाधिक ५२ कोटी १४ लाख २१ हजार ७७६ रुपयांची प्रकरणे निकाली निघाली. अनेक दावेदारांना पॅनल सदस्यांपुढे तडजोडीची रक्कम देण्यात आली. इतर दावेदारांना निवाड्यातील आदेशानुसार रक्कम मिळणार आहे.

टॅग्स :Courtन्यायालय