शहरं
Join us  
Trending Stories
1
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
2
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
3
आजचे राशीभविष्य,०४ नोव्हेंबर २०२५: वडीलधाऱ्यांकडून लाभ, दुपार नंतर प्रतिकूलतेशी तोंड द्यावे लागेल
4
ठाण्यातील दोस्ती कम्पाउंडमधील ८ इमारतींचे पाडकाम सुरू; दीड हजार रहिवाशांचा आक्रोश
5
इंडिया मेरिटाईम वीक-२०२५: ‘जेएनपीए’चे जागतिक स्तरावरील १९ कंपन्यांशी २ लाख काेटींचे करार
6
पाळीव प्राण्यांना सन्मानाने ‘शेवटचा निरोप’; विशेष अंत्यविधी केंद्रांच्या उभारणीलाही सुरुवात
7
कडक! सलमान खानचं गजब ट्रान्सफॉर्मेशन, ६० वर्षांचा होणार भाईजान; बॉडी दाखवत म्हणाला...
8
अलिबाग-रोहा मार्गावर पूल कोसळला; वाहतूक पूर्ण ठप्प; राेजच्या प्रवाशांचे हाल
9
मुंब्रा दुर्घटना: रेल्वेच्या २ अभियंत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; ४ महिन्यांनंतर कारवाई
10
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
11
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
12
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
13
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
14
मुंबई अपहरण प्रकरण: रोहित आर्याचे एन्काउंटर; माजी मंत्री केसरकर यांची हाेणार चौकशी
15
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
16
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
17
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
18
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
19
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
20
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या

मी नाही राहणार या घरात म्हणत 'त्या' तिघींनी सोडले घर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2021 16:11 IST

तीन अल्पवयीन मुलींनी पालकांच्या रागावर घर सोडले. पालक लग्नासाठी नाद लावतात, कॉलेजमध्ये जाऊ देत नाहीत या कारणामुळे त्यांनी घर सोडण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले.

ठळक मुद्देपालकांच्या रागावर मुलींनी सोडले घर लोहमार्ग पोलिसांनी केले आई-वडिलांच्या स्वाधीन

नागपूर : आई-बाबा छोट्या-छोट्या कारणावर बोलतात, रागवतात निघूनच जाते या घरातून.. असे म्हणत तीन अल्पवयीन मुलींनी त्यांचे घर सोडले. व्हॉट्सॲपवर मिळालेल्या छायाचित्रावरून लोहमार्ग पोलिसांनी पालकांच्या रागावर घर सोडून जात असलेल्या तीन मुलींचा शोध घेतला. व मुलींना ताब्यात घेऊन लोहमार्ग पोलिसांनी सुखरूप त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केले आहे.

आपल्या घरात दररोज काही न काही सुरुच असते. लहान-सहान गोष्टींवरुन आई-बाबा टोकत असतात, रागवतात. कसली रोजची कटकट म्हणत तिन मैत्रिणींनी आपलं घर सोड सोडण्याचे ठरवले. लोहमार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रायगड जिल्ह्यातील कर्जत पोलीस ठाण्यांतर्गत तीन अल्पवयीन मुलींनी पालकांच्या रागावर घर सोडले. १५, १६ आणि १७ वयोगटांतील या तिन्ही मुलींची चांगली मैत्री आहे. पालक लग्नासाठी नाद लावतात, कॉलेजमध्ये जाऊ देत नाहीत सतत बोलत असतात, या कारणामुळे त्यांनी घर सोडण्याचा निर्णय घेतला.

घरी कोणालाच न सांगता त्या रेल्वेस्थानकावर पोहोचल्या व मिळेल त्या गाडीत बसून त्यांनी प्रवास सुरू केला. दरम्यान, रात्र होऊनही मुली घरी न परतल्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला. त्या कुठेच आढळून आल्या नाहीत. अखेर त्यांनी कर्जत पोलीस ठाण्यात हरविल्याची तक्रार दाखल केली.

नागपूर लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या निरीक्षक मनीषा काशीद यांनाही कर्जत पोलिसांनी संपर्क साधून हरविलेल्या मुलींची माहिती दिली. तसेच त्यांना व्हॉट्सॲपवर छायाचित्र पाठविले. तीनही मुली विशाखापट्टणमला जात असल्याचे कर्जत पोलिसांनी सांगितले. विशाखापट्टणमला जाणारी गाडी दुपारी १.३० वाजता नागपूर रेल्वेस्थानकावर पोहोचणार होती. त्यापूर्वीच लोहमार्ग पोलिसांनी या गाडीत शोधाशोध करून तीनही मुलींना गाडीतून उतरविले. त्यांची चौकशी केली असता मध्य प्रदेशात जात असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर या तीनही मुलींना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMissingबेपत्ता होणं