शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

मी नाही राहणार या घरात म्हणत 'त्या' तिघींनी सोडले घर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2021 16:11 IST

तीन अल्पवयीन मुलींनी पालकांच्या रागावर घर सोडले. पालक लग्नासाठी नाद लावतात, कॉलेजमध्ये जाऊ देत नाहीत या कारणामुळे त्यांनी घर सोडण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले.

ठळक मुद्देपालकांच्या रागावर मुलींनी सोडले घर लोहमार्ग पोलिसांनी केले आई-वडिलांच्या स्वाधीन

नागपूर : आई-बाबा छोट्या-छोट्या कारणावर बोलतात, रागवतात निघूनच जाते या घरातून.. असे म्हणत तीन अल्पवयीन मुलींनी त्यांचे घर सोडले. व्हॉट्सॲपवर मिळालेल्या छायाचित्रावरून लोहमार्ग पोलिसांनी पालकांच्या रागावर घर सोडून जात असलेल्या तीन मुलींचा शोध घेतला. व मुलींना ताब्यात घेऊन लोहमार्ग पोलिसांनी सुखरूप त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केले आहे.

आपल्या घरात दररोज काही न काही सुरुच असते. लहान-सहान गोष्टींवरुन आई-बाबा टोकत असतात, रागवतात. कसली रोजची कटकट म्हणत तिन मैत्रिणींनी आपलं घर सोड सोडण्याचे ठरवले. लोहमार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रायगड जिल्ह्यातील कर्जत पोलीस ठाण्यांतर्गत तीन अल्पवयीन मुलींनी पालकांच्या रागावर घर सोडले. १५, १६ आणि १७ वयोगटांतील या तिन्ही मुलींची चांगली मैत्री आहे. पालक लग्नासाठी नाद लावतात, कॉलेजमध्ये जाऊ देत नाहीत सतत बोलत असतात, या कारणामुळे त्यांनी घर सोडण्याचा निर्णय घेतला.

घरी कोणालाच न सांगता त्या रेल्वेस्थानकावर पोहोचल्या व मिळेल त्या गाडीत बसून त्यांनी प्रवास सुरू केला. दरम्यान, रात्र होऊनही मुली घरी न परतल्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला. त्या कुठेच आढळून आल्या नाहीत. अखेर त्यांनी कर्जत पोलीस ठाण्यात हरविल्याची तक्रार दाखल केली.

नागपूर लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या निरीक्षक मनीषा काशीद यांनाही कर्जत पोलिसांनी संपर्क साधून हरविलेल्या मुलींची माहिती दिली. तसेच त्यांना व्हॉट्सॲपवर छायाचित्र पाठविले. तीनही मुली विशाखापट्टणमला जात असल्याचे कर्जत पोलिसांनी सांगितले. विशाखापट्टणमला जाणारी गाडी दुपारी १.३० वाजता नागपूर रेल्वेस्थानकावर पोहोचणार होती. त्यापूर्वीच लोहमार्ग पोलिसांनी या गाडीत शोधाशोध करून तीनही मुलींना गाडीतून उतरविले. त्यांची चौकशी केली असता मध्य प्रदेशात जात असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर या तीनही मुलींना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMissingबेपत्ता होणं