शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

कर्जमाफीमुळे विदर्भातील तीन जिल्हा बँकांना जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2017 11:05 IST

गेल्या १५ वर्षांपासून आर्थिकदृष्ट्या दुर्बल झालेल्या व बंद पडायच्या बेतात असलेल्या तीन जिल्हा बँकांना छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या कर्जमाफीमुळे जीवदान मिळाले आहे.

ठळक मुद्देबुलडाणा, वर्धा व नागपूर बँका आता बंद होणार नाहीत

सोपान पांढरीपांडे।आॅनलाईन लोकमतनागपूर : गेल्या १५ वर्षांपासून आर्थिकदृष्ट्या दुर्बल झालेल्या व बंद पडायच्या बेतात असलेल्या तीन जिल्हा बँकांना छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या कर्जमाफीमुळे जीवदान मिळाले आहे. या बँक म्हणजे बुलडाणा जिल्हा बँक, वर्धा जिल्हा बँक व नागपूर जिल्हा बँक या आहेत.२००२ साली नागपूर जिल्हा बँकेने सरकारी कर्जरोखे खरेदीत १२४.६० कोटी व वर्धा जिल्हा बँकेने ३० कोटी गमाविले होते. त्या रोखे घोटाळ्यामुळे या दोन्ही बँकांची आर्थिक स्थिती नाजूक झाली होती तर बुलडाणा बँकेत चुकीच्या कर्जवाटपामुळे तोटा झाला होता. परिणामी या तिन्ही बँका १५ वर्षांपासून प्रशासकाच्या ताब्यात आहेत.नाजूक आर्थिक स्थितीमुळे तिथले कर्जवाटप बंद झाले होते व बँका बंद करायच्या बेतात आल्या होत्या. या बँकांना रिझर्व्ह बँकेचे लायसन्स मिळावे म्हणून २०१६ साली राज्य सरकारने नागपूर जिल्हा बँकेला १५६ कोटी, बुलडाणा जिल्हा बँकेला २०७ कोटी व वर्धा जिल्हा बँकेला १६१ कोटीचे पॅकेज दिले होते. त्यामुळे या जिल्हा बँकांचा संचित तोटा कमी झाला होता. पण जीवदान मिळाले नव्हते. ते आता शेतकरी कर्जमाफीमुळे मिळाले आहे.नागपूर जिल्हा बँकेची कृषी कर्जाची थकबाकी ३०६ कोटी आहे व संचित तोटा २२१ कोटी होता. नागपूर जिल्हा बँकेने एकूण ३८४४४ शेतकऱ्यांचे कर्ज माफ व्हावे म्हणून अर्ज केले होते. त्यापैकी २०१८४ अर्ज मंजूर होऊन बँकेला १३७.५४ कोटी मिळाले आहेत व डिसेंबर अखेरपर्यंत अजूनही रक्कम मिळणार असल्याचे प्रशासक संजय कदम यांनी सांगितले.बुलडाणा जिल्हा बँकेची कृषीकर्जाची थकबाकी २४४ कोटी व संचित तोटा २४८ कोटी होता. बँकेने ४७६८३ शेतकऱ्यांचे कर्ज माफ व्हावे म्हणून अर्ज केला होता. त्यापैकी २८१६२ शेतकऱ्यांचे १२९.३६ कोटी बँकेला मिळाले आहे अशी माहिती प्रशासक डॉ. अशोक खरात यांनी दिली.वर्धा जिल्हा बँकेची कृषिकर्ज थकबाकी १३६ कोटी आहे व संचित तोटा २८३ कोटी होता. बँकेला ५१२० शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे २५.१७ कोटी मिळाले आहेत अशी माहिती प्रशासक संजय कोरडे यांनी दिली.या तिन्ही बँकांना कर्जमाफीच्या केवळ दोन टप्प्यात ही रक्कम मिळाली आहे. अजून डिसेंबर अखेरपर्यंत आणखी दोन ते तीन टप्प्यात कर्जमाफी होणार आहे. त्यामुळे नेमकी किती रक्कम मिळाली हे जानेवारीत कळू शकेल. पण पहिल्या दोन टप्प्यांच्या कर्जमाफीमुळे तरलता निधीची पूर्तता झाली आहे. त्यामुळे या बँका आता बंद पडणार नाहीत, असे तिन्ही प्रशासकांनी सांगितले.

टॅग्स :bankबँक