शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत 'फिदायिन' हल्ला?; लाल किल्ल्याजवळ स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर
2
पकडले जाण्याच्या भीतीने उमरने उडवली स्फोटकांनी भरलेली कार; पुलवामा हल्ल्याच्या दिवशी विकली गाडी
3
भाजप, काँग्रेसची नगराध्यक्ष उमेदवारांची यादी ५ दिवसांत, आज भाजपची तर उद्या काँग्रेसची मुंबईत होणार महत्त्वपूर्ण बैठक
4
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
5
आजचे राशीभविष्य, ११ नोव्हेंबर २०२५: कामे नक्की पूर्ण होतील, पण 'या' राशीने आळस टाळा !
6
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
7
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
8
दिल्लीत स्फोट; मुंबईत अलर्ट, मुंबईच्या पाचही प्रवेशद्वारांसह सागरी सुरक्षेत वाढ; रेल्वे स्थानके, महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी
9
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
10
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
11
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती चिंताजनक, ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
12
देशातील ७०% कैदी अजूनही दोषी नाहीत, केवळ ८% जणांनाच मिळाली कायदेशीर मदत
13
व्हिडीओत संपादनात चूक, दिशाभूल केल्याचा ठपका, बीबीसीचे प्रमुख संचालक, वृत्त प्रमुखांचा राजीनामा
14
पासवर्ड बदला, अन्यथा डल्ला, ७६ लाख लोकांचा आहे एकच पासवर्ड; पासवर्ड चोरल्यास बसू शकतो फटका
15
निवड समितीसोबतचा पंगा मोहम्मद शमीला भोवणार? कसोटी संघातील पुनरागमन अनिश्चित काळ लांबणीवर जाण्याची शक्यता
16
कंपनीला कर्मचाऱ्यांनीच घातला दीड कोटीचा गंडा, बनावट कॅश व्हाऊचरची छपाई, अतिरिक्त पगार
17
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
18
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
19
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
20
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल

कर्जमाफीमुळे विदर्भातील तीन जिल्हा बँकांना जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2017 11:05 IST

गेल्या १५ वर्षांपासून आर्थिकदृष्ट्या दुर्बल झालेल्या व बंद पडायच्या बेतात असलेल्या तीन जिल्हा बँकांना छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या कर्जमाफीमुळे जीवदान मिळाले आहे.

ठळक मुद्देबुलडाणा, वर्धा व नागपूर बँका आता बंद होणार नाहीत

सोपान पांढरीपांडे।आॅनलाईन लोकमतनागपूर : गेल्या १५ वर्षांपासून आर्थिकदृष्ट्या दुर्बल झालेल्या व बंद पडायच्या बेतात असलेल्या तीन जिल्हा बँकांना छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या कर्जमाफीमुळे जीवदान मिळाले आहे. या बँक म्हणजे बुलडाणा जिल्हा बँक, वर्धा जिल्हा बँक व नागपूर जिल्हा बँक या आहेत.२००२ साली नागपूर जिल्हा बँकेने सरकारी कर्जरोखे खरेदीत १२४.६० कोटी व वर्धा जिल्हा बँकेने ३० कोटी गमाविले होते. त्या रोखे घोटाळ्यामुळे या दोन्ही बँकांची आर्थिक स्थिती नाजूक झाली होती तर बुलडाणा बँकेत चुकीच्या कर्जवाटपामुळे तोटा झाला होता. परिणामी या तिन्ही बँका १५ वर्षांपासून प्रशासकाच्या ताब्यात आहेत.नाजूक आर्थिक स्थितीमुळे तिथले कर्जवाटप बंद झाले होते व बँका बंद करायच्या बेतात आल्या होत्या. या बँकांना रिझर्व्ह बँकेचे लायसन्स मिळावे म्हणून २०१६ साली राज्य सरकारने नागपूर जिल्हा बँकेला १५६ कोटी, बुलडाणा जिल्हा बँकेला २०७ कोटी व वर्धा जिल्हा बँकेला १६१ कोटीचे पॅकेज दिले होते. त्यामुळे या जिल्हा बँकांचा संचित तोटा कमी झाला होता. पण जीवदान मिळाले नव्हते. ते आता शेतकरी कर्जमाफीमुळे मिळाले आहे.नागपूर जिल्हा बँकेची कृषी कर्जाची थकबाकी ३०६ कोटी आहे व संचित तोटा २२१ कोटी होता. नागपूर जिल्हा बँकेने एकूण ३८४४४ शेतकऱ्यांचे कर्ज माफ व्हावे म्हणून अर्ज केले होते. त्यापैकी २०१८४ अर्ज मंजूर होऊन बँकेला १३७.५४ कोटी मिळाले आहेत व डिसेंबर अखेरपर्यंत अजूनही रक्कम मिळणार असल्याचे प्रशासक संजय कदम यांनी सांगितले.बुलडाणा जिल्हा बँकेची कृषीकर्जाची थकबाकी २४४ कोटी व संचित तोटा २४८ कोटी होता. बँकेने ४७६८३ शेतकऱ्यांचे कर्ज माफ व्हावे म्हणून अर्ज केला होता. त्यापैकी २८१६२ शेतकऱ्यांचे १२९.३६ कोटी बँकेला मिळाले आहे अशी माहिती प्रशासक डॉ. अशोक खरात यांनी दिली.वर्धा जिल्हा बँकेची कृषिकर्ज थकबाकी १३६ कोटी आहे व संचित तोटा २८३ कोटी होता. बँकेला ५१२० शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे २५.१७ कोटी मिळाले आहेत अशी माहिती प्रशासक संजय कोरडे यांनी दिली.या तिन्ही बँकांना कर्जमाफीच्या केवळ दोन टप्प्यात ही रक्कम मिळाली आहे. अजून डिसेंबर अखेरपर्यंत आणखी दोन ते तीन टप्प्यात कर्जमाफी होणार आहे. त्यामुळे नेमकी किती रक्कम मिळाली हे जानेवारीत कळू शकेल. पण पहिल्या दोन टप्प्यांच्या कर्जमाफीमुळे तरलता निधीची पूर्तता झाली आहे. त्यामुळे या बँका आता बंद पडणार नाहीत, असे तिन्ही प्रशासकांनी सांगितले.

टॅग्स :bankबँक