शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

नागपूरच्या इंदोरा बाराखोली येथील खुनात तिघांना जन्मठेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2019 23:08 IST

सत्र न्यायालयाने मंगळवारी तीन आरोपींना खुनाच्या गुन्ह्यामध्ये दोषी ठरवून जन्मठेप व प्रत्येकी ५० हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास एक वर्ष अतिरिक्त कारावास अशी शिक्षा सुनावली. न्यायाधीश ए. एस. काझी यांनी हा निर्णय दिला. ही घटना जरीपटका पोलिसांच्या हद्दीतील आहे.

ठळक मुद्देसत्र न्यायालयाचा निर्णय : प्रत्येकी ५० हजार रुपये दंड

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सत्र न्यायालयाने मंगळवारी तीन आरोपींना खुनाच्या गुन्ह्यामध्ये दोषी ठरवून जन्मठेप व प्रत्येकी ५० हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास एक वर्ष अतिरिक्त कारावास अशी शिक्षा सुनावली. न्यायाधीश ए. एस. काझी यांनी हा निर्णय दिला. ही घटना जरीपटका पोलिसांच्या हद्दीतील आहे.विश्वास राजेश दहीवले (३०), सूरज राजू मानवटकर (२३) व कमलेश कालीचरण पाटील (३०) अशी आरोपींची नावे आहेत. दहीवले न्यू इंदोरा, मानवटकर महादुला तर, पाटील पुलगाव, जि. वर्धा येथील रहिवासी आहे. मयताचे नाव राकेश बापुराव रामटेके (४५) होते. तो बाराखोली येथे रहात होता. २९ सप्टेंबर २०१५ रोजी रात्री ११ च्या सुमारास आरोपींनी रामटेकेला दारू पिण्यासाठी पैसे मागितले. त्यावरून त्यांचा रामटेकेसोबत वाद झाला. दरम्यान, आरोपींनी रामटेकेला लाकडी स्टम्प व दांड्याने जबर मारहाण केली. त्यामुळे रामटेके गंभीर जखमी होऊन ठार झाला. रामटेकेची पत्नी वैशालीने आरोपींविरुद्ध जरीपटका पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यावरून तिन्ही आरोपींना ३० सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली. पोलीस निरीक्षक बी. पी. सावंत यांनी प्रकरणाचा तपास करून आरोपींविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. न्यायालयात सरकारच्या वतीने सहाय्यक सरकारी वकील अभय जिकार यांनी काम पाहिले. 

 

टॅग्स :Life Imprisonmentजन्मठेपSessions Courtसत्र न्यायालयMurderखून