शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
7
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
8
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
9
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
10
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
11
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
12
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
13
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
14
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
15
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
16
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
17
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
18
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
19
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
20
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी

चूक अधिकाऱ्यांची, फटका मागासवर्गीय विद्यार्थ्यांना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2021 11:43 IST

Nagpur News अभिमत आणि खासगी विद्यापीठात व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या हजारो मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मागील पाच वर्षांपासून शासनाच्या फ्रीशिप योजनेपासून वंचित राहावे लागत असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.

ठळक मुद्देपाच वर्षांपासून हजारो विद्यार्थी ‘फ्रीशिप’पासून वंचित मंत्रिमंडळाचा निर्णय अधिकाऱ्यांनी बदलविला

आनंद डेकाटे

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : अभिमत आणि खासगी विद्यापीठात व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या हजारो मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मागील पाच वर्षांपासून शासनाच्या फ्रीशिप योजनेपासून वंचित राहावे लागत असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. सामाजिक न्याय विभागातील काही अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे हा प्रकार घडला हे विशेष.

आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी राज्य शासनातर्फे २००६ पासून शैक्षणिक शुल्काची प्रतिपूर्ती (फ्रीशिप) योजना सुरु केली. सुरुवातीला राज्यातील उच्च व तंत्रशिक्षण विभागांतर्गत शासकीय तसेच अशासकीय अनुदानित व विनाअनुदानित महाविद्यालये, तंत्रनिकेतने आणि शासकीय विद्यापीठात विनाअनुदानित तत्त्वावर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना फ्रीशिप दिली जाते. १७ मार्च १०१६ मध्ये पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अभिमत विद्यापीठ व खासगी विद्यापीठातील अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांनाही ही योजना लागू ठेवण्यास मान्यता प्रदान करण्यात आली. इतकेच नव्हे तर या याेजनेसाठी यापुढे दरवर्षी मंत्रिमंडळाची मान्यता घेण्याची गरज राहणार नाही, असा धोरणात्मक निर्णय सुद्धा घेण्यात आला. परंतु मंत्रिमंडळाच्या या निर्णयानंतर ३१ मार्च २०१६ रोजी सामाजिक न्याय विभागाने यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला. त्यात खासगी विद्यापीठ व अभिमत विद्यापीठांना ही योजना लागू राहणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले. एकप्रकारे मंत्रिमंडळाचा निर्णय अधिकाऱ्यांनी बदलविला. त्यामुळे मागील पाच वर्षांपासून हजारो मागासवर्गीय विद्यार्थी फ्रीशिपपासून वंचित राहिले आहेत.

 

- राज्याबाहेर शिकणारे महाराष्ट्रातील विद्यार्थीही वंचित

फ्रीशिपची योजना ही राज्याबाहेर शिक्षण घेणाऱ्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनाही लागू होती; परंतु २०१६ पासून ती बंद करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातीलच महाराष्ट्राबाहेर शिक्षण घेणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांनाही मोठा फटका बसत आहे.

- राज्यपाल-मुख्यमंत्र्यांना पत्र

मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता मिळाल्यानंतरही जी.आर.मध्ये त्याचा अंतर्भाव झालेला नाही. ही अधिकाऱ्यांची चूक म्हणावी की जाणिवपूर्वक केलेला प्रकार होय. काहीही असले तरी या चुकीमुळे हजारो माागासवर्गीय विद्यार्थ्यांचे उच्चशिक्षण धोक्यात आले आहे. यासंदर्भात आम्ही राज्यपाल व मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. त्यांना फ्रीशिप मधील ही त्रुटी लक्षात आणून दिली आहे. तसेच खासगी व अभिमत विद्यापीठातील विद्यार्थ्यांनाही फ्रीशिप योजना लागू करावी, तसेच राज्याबाहेर शिक्षण घेणाऱ्यांनाही ती मिळावी, अशी मागणी केली आहे.

डॉ. सिद्धांत भरणे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॅशनल स्टुडंट्स फेडरेशन

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र