शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोटातील कारचा मालक सलमान पोलिसांच्या ताब्यात; गाडी दुसऱ्याला विकल्याचा दावा! पोलिसांची चौकशी सुरू
2
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
3
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
4
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
5
Red Fort Blast Video: अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! स्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना?
6
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
7
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना
8
लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट! तपास यंत्रणा सतर्क
9
Delhi Red Fort Blast: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
कुणाचा हात तुटून पडला, कुणाचा कोथळा बाहेर आला; प्रत्यक्षदर्शीने सांगितली दिल्ली स्फोटाची हादरवून टाकणारी घटना
11
'त्या' जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार, शीतल तेजवानींना पोलिसांकडून क्लीन चिट
12
भयानक कोसळणार ...! मी १९७१ पासून सोने खरेदी करतोय, पण...; रॉबर्ट कियोसाकी यांच्या दाव्याने खळबळ 
13
दहशतवाद्यांच्या टोळीत महिला डॉक्टरही सामील, थेट पाकिस्तानशी कनेक्शन; कारमध्ये घेऊन फिरत होती एके ४७!
14
जडेजाला संघाबाहेर काढण्यात धोनी सगळ्यात पुढे असेल! माजी क्रिकेटरनं त्यामागचं कारणही सांगून टाकलं
15
भारताच्या शेजारी देशांत भरतो 'नवरीचा बाजार', खरेदी करण्यासाठी चीनमधून येतात लोक! काय आहे प्रकार?
16
राष्ट्रवादीने हटवले तरी रुपाली ठोंबरे पाटील 'प्रवक्त्या'च; पोस्ट करत म्हणाल्या, 'अजित पवारांना भेटून...'
17
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
18
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...
19
"मी तुझ्या बापाला मारलं, मृतदेह सुटकेसमध्ये..."; बायकोने नवऱ्याला संपवलं, लेकीला केला फोन
20
Honeymoon Destinations : गुलाबी थंडीत रोमँटिक हनिमून प्लॅन करताय? भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट!

चूक अधिकाऱ्यांची, फटका मागासवर्गीय विद्यार्थ्यांना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2021 11:43 IST

Nagpur News अभिमत आणि खासगी विद्यापीठात व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या हजारो मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मागील पाच वर्षांपासून शासनाच्या फ्रीशिप योजनेपासून वंचित राहावे लागत असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.

ठळक मुद्देपाच वर्षांपासून हजारो विद्यार्थी ‘फ्रीशिप’पासून वंचित मंत्रिमंडळाचा निर्णय अधिकाऱ्यांनी बदलविला

आनंद डेकाटे

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : अभिमत आणि खासगी विद्यापीठात व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या हजारो मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मागील पाच वर्षांपासून शासनाच्या फ्रीशिप योजनेपासून वंचित राहावे लागत असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. सामाजिक न्याय विभागातील काही अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे हा प्रकार घडला हे विशेष.

आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी राज्य शासनातर्फे २००६ पासून शैक्षणिक शुल्काची प्रतिपूर्ती (फ्रीशिप) योजना सुरु केली. सुरुवातीला राज्यातील उच्च व तंत्रशिक्षण विभागांतर्गत शासकीय तसेच अशासकीय अनुदानित व विनाअनुदानित महाविद्यालये, तंत्रनिकेतने आणि शासकीय विद्यापीठात विनाअनुदानित तत्त्वावर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना फ्रीशिप दिली जाते. १७ मार्च १०१६ मध्ये पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अभिमत विद्यापीठ व खासगी विद्यापीठातील अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांनाही ही योजना लागू ठेवण्यास मान्यता प्रदान करण्यात आली. इतकेच नव्हे तर या याेजनेसाठी यापुढे दरवर्षी मंत्रिमंडळाची मान्यता घेण्याची गरज राहणार नाही, असा धोरणात्मक निर्णय सुद्धा घेण्यात आला. परंतु मंत्रिमंडळाच्या या निर्णयानंतर ३१ मार्च २०१६ रोजी सामाजिक न्याय विभागाने यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला. त्यात खासगी विद्यापीठ व अभिमत विद्यापीठांना ही योजना लागू राहणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले. एकप्रकारे मंत्रिमंडळाचा निर्णय अधिकाऱ्यांनी बदलविला. त्यामुळे मागील पाच वर्षांपासून हजारो मागासवर्गीय विद्यार्थी फ्रीशिपपासून वंचित राहिले आहेत.

 

- राज्याबाहेर शिकणारे महाराष्ट्रातील विद्यार्थीही वंचित

फ्रीशिपची योजना ही राज्याबाहेर शिक्षण घेणाऱ्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनाही लागू होती; परंतु २०१६ पासून ती बंद करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातीलच महाराष्ट्राबाहेर शिक्षण घेणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांनाही मोठा फटका बसत आहे.

- राज्यपाल-मुख्यमंत्र्यांना पत्र

मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता मिळाल्यानंतरही जी.आर.मध्ये त्याचा अंतर्भाव झालेला नाही. ही अधिकाऱ्यांची चूक म्हणावी की जाणिवपूर्वक केलेला प्रकार होय. काहीही असले तरी या चुकीमुळे हजारो माागासवर्गीय विद्यार्थ्यांचे उच्चशिक्षण धोक्यात आले आहे. यासंदर्भात आम्ही राज्यपाल व मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. त्यांना फ्रीशिप मधील ही त्रुटी लक्षात आणून दिली आहे. तसेच खासगी व अभिमत विद्यापीठातील विद्यार्थ्यांनाही फ्रीशिप योजना लागू करावी, तसेच राज्याबाहेर शिक्षण घेणाऱ्यांनाही ती मिळावी, अशी मागणी केली आहे.

डॉ. सिद्धांत भरणे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॅशनल स्टुडंट्स फेडरेशन

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र